शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

विदर्भात २९६१ पॉझिटिव्ह, ६५ मृत्यू; सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या दुप्पट होण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 21:07 IST

गुरुवारी एकाच दिवशी २९६१ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ६५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

ठळक मुद्देरुग्णसंख्या ६३१९६ मृत्यूसंख्या १७८२ नागपुरात १७२७चंद्रपूरमध्ये २२२, गोंदियात १८९ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात दुप्पट रुग्णसंख्या जाण्याचे चिन्ह दिसून येऊ लागले आहेत. गुरुवारी एकाच दिवशी २९६१ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ६५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ६३१९६ झाली असून मृतांची संख्या १७८२ वर पोहचली आहे. सर्वाधिक रुग्ण नागपुरसह चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ व गोंदिया जिल्ह्यात आढळून आले आहेत.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. आज पुन्हा एकदा रुग्णसंख्येचा उच्चांक गाठत १७२७ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ४५ रुग्णांच्या मृत्यू झाले. रुग्णसंख्या ३४४३२वर गेली असून मृतांची संख्या ११७७झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. २२२ रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३१६७ झाली आहे. तीन रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ३८वर गेली आहे.

गोंदिया जिल्ह्यातही रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. १८९ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दोन रुग्णांचे बळी गेले आहेत. रुग्णसंख्या १८७४ तर मृत्यूची संख्या २६ झाली आहे. बुलढाण्यात १८५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या ३५१४ झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात रोजची रुग्णसंख्या शंभरावर जात असताना मृत्यूच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे.  १२४ रुग्ण पॉझिटिव्ह तर सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या १८७४तर मृतांची संख्य १०२वर गेली आहे.

भंडारा जिल्ह्यात १६७ रुग्ण व तीन रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णसंख्या १६०७ तर मृत्यूची संख्या २८ झाली आहे. अमरावती जिल्ह्यात ८८ रुग्णांचे निदान झाले असून रुग्णांची संख्या ६२०२ झाली आहे. वर्धा जिल्ह्यात ८९ रुग्ण व चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या १२९४ झाली असून २९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. वाशिम जिल्ह्यात ७६ रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या १९३८वर गेली आहे.

अकोला जिल्ह्यातही ७६रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या ४२२७ झाली असून एका रुग्णाच्या मृत्यूने बळींची संख्या १६०वर पोहचली आहे. सर्वात कमी रुग्णांची नोंद गडचिरोली जिल्ह्यात झाली. १८ रुग्ण पॉझटिव्ह आले. येथील रुग्णसंख्या १२१४झाली आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस