शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नागपूर शहरातील ११३ रोडवर २७०४ धोकादायक वीजखांब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 21:10 IST

ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. रुंदीकरणाच्या कामामुळे शहरातील ११३ रोडवरील २७०४ वीजखांब, ३६८ डीपी/टीपी/एफपी व १०० ट्रान्सफॉर्मर धोकादायक झाले आहेत. ते वाहतुकीस अडथळा ठरत आहेत.

ठळक मुद्देमनपाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : स्थानांतरणासाठी मागितली मुदतवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. रुंदीकरणाच्या कामामुळे शहरातील ११३ रोडवरील २७०४ वीजखांब, ३६८ डीपी/टीपी/एफपी व १०० ट्रान्सफॉर्मर धोकादायक झाले आहेत. ते वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. तसेच, अपघाताला निमंत्रण देत आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ स्थानांतरित करणे आवश्यक झाले आहे.महानगरपालिकेने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली. यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. ती याचिका न्यायालयाने स्वत:च दाखल करून घेतली आहे. सुरुवातीला केवळ १९ रोडवरील धोकादायक वीजखांब व ट्रान्सफॉर्मरचा मुद्दा न्यायालयासमक्ष होता. दरम्यान, न्यायालयाने शहरात होत असलेली रोड रुंदीकरणाची कामे लक्षात घेता अन्य रोडचे सर्वेक्षण करून धोकादायक वीजखांब व ट्रान्सफॉर्मर शोधण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, महानगरपालिका व महावितरण यांनी मिळून रोडचे सर्वेक्षण केले. त्यातून त्यांना ११३ रोडवरील २७०४ वीजखांब, ३६८ डीपी/टीपी/एफपी व १०० ट्रान्सफॉर्मर धोकादायक असल्याचे आढळून आले. त्यात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व एमएसआरडीसी यांच्या अखत्यारितील प्रत्येकी १ रोडचा तर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील १५ रोडचा समावेश आहे. इतर रोड महापालिकेच्या अधिकार क्षेत्रात आहेत. हे सर्व धोकादायक वीजखांब, ट्रान्सफॉर्मर व अन्य वीज उपकरणे सुरक्षित ठिकाणी स्थानांतरित करण्यासाठी महानगरपालिकेने न्यायालयाला चार महिन्यांची मुदत वाढवून मागितली आहे.न्यायालयाच्या आदेशावरून महानगरपालिकेने महावितरणच्या मदतीने सुरुवातीच्या १९ रोडवरील वीजखांब व ट्रान्सफॉर्मर स्थानांतरित करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यापैकी २ रोडवरील काम पूर्ण झाले आहे. इतर रोडवरील काम प्रगतिपथावर आहे. हे काम करण्यासाठी रोज ६ ते ८ तास वीजपुरवठा बंद ठेवणे आवश्यक आहे. परंतु, नागरिक वीजपुरवठा बंद ठेवण्याला विरोध करतात. पाऊसही कामात अडथळा निर्माण करीत आहे. त्यामुळे कामाला गती मिळाली नाही, असे महापालिकेने न्यायालयाला सांगितले आहे.प्रगती अहवाल देण्याचा आदेशधोकादायक वीजखांब व ट्रान्सफॉर्मर हटविण्याच्या कामाचा रोडनिहाय प्रगती अहवाल सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी महापालिकेला दिला. याकरिता महापालिकेला दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला. तसेच, न्यायालयाने महानगरपालिकेचे प्रतिज्ञापत्रही रेकॉर्डवर घेतले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदुरकर व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या प्रकरणात अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र असून मनपातर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक तर, नासुप्रतर्फे अ‍ॅड. गिरीश कुंटे यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयelectricityवीजNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका