शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
3
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
4
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
5
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
6
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
7
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
8
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
9
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
10
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
11
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
12
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
13
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
14
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
15
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...
16
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
17
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
18
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
19
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
20
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण

एकाच रात्रीत २६ फिडर ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:24 AM

राज्यभरात पाऊ स सुरू असल्याने विजेची मागणी कमी झाल्याने भारनियमन कमी झाल्याचा दावा वीज वितरणाची जबाबदारी असलेल्या महावितरण कंपनीने केला आहे.

ठळक मुद्देविद्युत विभाग नागरिकांच्या जीवावर उठला : अंधारात रात्र काढली, तांत्रिक त्रुटीमुळे राज्यात वीजसंकट

कमल शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरात पाऊ स सुरू असल्याने विजेची मागणी कमी झाल्याने भारनियमन कमी झाल्याचा दावा वीज वितरणाची जबाबदारी असलेल्या महावितरण कंपनीने केला आहे. नागपूर जिल्ह्याला भारनियमनातून वगळण्यात आल्याचाही दावा केला जातो. अशा गोष्टी ऐकायला चांगल्या वाटतात. प्रत्यक्षात हा दावा तांत्रिक त्रुटी लपविण्यासाठी केला जात आहे. मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू असून यासाठी तांत्रिक बिघाड असल्याचे कारण पुढे केले जात आहे. प्रत्यक्षात यामागील वास्तव वेगळेच आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात वीज पुरवठा कसा, याची माहिती घेतली असता जिल्ह्यातील २६ फिडर रविवारी रात्री उशिरापर्यंत ठप्प पडले होते. एका फिडरवर साधारणत: एक हजार जोडण्या असतात. याचा विचार करता २६ हजार जोडण्याचा वीज पुरवठा बंद होता. यामुळे लाखो लोकांना रात्र उकाड्यात काढावी लागली.रात्री उशिरा ते सोमवारी दुपारपर्यंत वीज पुरवठा ठप्प होता. पावसामुळे तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याचा दावा केला जात आहे. परंतु वीज कंपन्यांनी मान्सूनपूर्व तयारीच्या नावाखाली एप्रिल ते जून या कालावधीत मोठ्या प्रमाणात भारनियमन केले होते. त्याचवेळी दक्षता घेतली असती तर आज ही वेळ आली नसती. झाडे पडल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याचे कारण सांगितल्याने यात तथ्य आहे. एक-दीड तासात वीज पुरवठा सुरळीत होईल, असा दावा महावितरण व एसएनडीएल यांच्याकडून केला जातो. प्रत्यक्षात रात्रभर वीज न आल्याने नागरिकांना रात्र उकाड्यात काढावी लागली.बंद संचावरही प्रश्नचिन्हकोळशाचा पुरवठा होत नसल्याचे कारण पुढे करून वीज उत्पादक कंपन्या राज्यात भारनियमन करीत आहे. परंतु कोळशाही कमतरता हे एक निमित्त आहे. वास्तविक राज्यातील वीज निर्मितीचे १८ संच ठप्प आहेत. यात महाजनकोच्या वीज निर्मिती केंद्रातील १२ संचाचा समावेश आहे. यातील तीन संच वार्षिक दुरुस्तीसाठी तर दोन कोळशाचा पुरवठा नसल्याने बंद आहे. तारापूर अणुऊर्जा संयंत्र तांत्रिक कारणामुळे प्रभावित झाला आहे. यातील १६० मेगावॅट क्षमतेचे एक रिएक्टर रिफिलिंग व ५४० मेगावॅट क्षमतेचे तांत्रिक कारणामुळे तर एक दुरुस्तीला काढले आहे. खासगी वीज निर्मिती केंद्रांना तांत्रिक कारणांचा सामना करावा लागत आहे. तांत्रिक कारणामुळे मोठ्याप्रमाणात संच बंद असताना वार्षिक देखभाल करण्याच्या नावाखाली संच बंद का ठेवण्यात आले. असा प्रश्न निर्माण झाला आहे. यात काहीतरी काळेबेरे आहे. अधिकारी स्वत:ची चूक लपविण्यासाठी राज्याला भारनियमनाच्या संकटात लोटत आहे.इथे बंद होता वीज पुरवठावीज वितरण कंपनी एसएनडीएलच्या माहितीनुसार त्यांचे २० फिडर बंद होते. यात सोमवारी क्वॉर्टर, भंडारा रोड, वैशालीनगर, मंगळवारी, सदर, मकरधोकडा, वाडी, गांजाखेत, वर्धमाननगर, रामगिरी, लाल इमली, घाट रोड, रामबाग, भगवान नगर, विश्वकर्मानगर, बाबुळखेडा, भक्ती विहार, आमदार निवास, सूतगिरणी, जानकीनगर आदी भागाला वीज पुरवठा करणाºया फिडरचा समावेश होता. महावितरणच्या क्षेत्रातील चिंचभुवन फिडरवरील भागासोबतच बुटीबोरी परिसरात रात्री अडीच वाजेपासून सकाळी ११ पर्यंत वीज पुरवठा बंद होत. तसेच छत्रपती चौक, पांडे ले-आऊ ट, रेल्वे फिरडशी संबंधित भागात अनेक तास वीज पुरवठा खंडित होता.