शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

२६ बालमजुरांची तस्करी : दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमधून घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 01:03 IST

दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसने २६ बालकांना कामासाठी नेत असल्याची घटना मंगळवारी दुपारी २.५५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली. दरम्यान रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींनी या बालकांना गाडीखाली उतरवून ताब्यात घेतले. या बालकांना शासकीय मुलांच्या बालगृहात ठेवण्यात आले असून बुधवारी त्यांना चाईल्ड वेलफेअर कमिटीसमोर हजर करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा दल, रेल्वे चाईल्ड लाईनची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसने २६ बालकांना कामासाठी नेत असल्याची घटना मंगळवारी दुपारी २.५५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली. दरम्यान रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींनी या बालकांना गाडीखाली उतरवून ताब्यात घेतले. या बालकांना शासकीय मुलांच्या बालगृहात ठेवण्यात आले असून बुधवारी त्यांना चाईल्ड वेलफेअर कमिटीसमोर हजर करण्यात येणार आहे.रेल्वेगाडी क्रमांक १२७९२ दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसने मोठ्या प्रमाणात बालमजुरांची तस्करी होत असल्याची माहिती रेल्वे चाईल्ड लाईनला मिळाली. रेल्वे चाईल्ड लाईनने ही माहिती रेल्वे सुरक्षा दलाला दिली. खरोखर या गाडीत बालमजूर आहेत का हे पाहण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने नरखेडवरून दोन जवानांना गाडीत पाठविले. या जवानांनी कोच क्रमांक एस ८, ९, १०, ११ आणि मागील जनरल कोचमध्ये बालक प्रवास करीत असल्याची माहिती आरपीएफच्या अधिकाऱ्यांना दिली. ही गाडी दुपारी २.५५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर येताच २६ बालकांना गाडीखाली उतरविले. यावेळी रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक सुरक्षा आयुक्त दीपकसिंग चौहान, स्टेशन संचालक दिनेश नागदेवे, प्रवासी सुविधा पर्यवेक्षक प्रवीण रोकडे, उपस्टेशन व्यवस्थापक राजू इंगळे, वाणिज्य विभागाचे कर्मचारी आणि २० आरपीएफ जवानांचा ताफा प्लॅटफार्मवर हजर होता. या बालकांना रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींनी आरपीएफ ठाण्यात आणले. तेथे त्यांच्यासाठी जेवण बोलविण्यात आले. विविध कामासाठी विविध ठिकाणी नेण्यात येत असल्याची माहिती बालकांनी चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींना दिली. हे बालक बिहार, दानापूर, खगरिया, मध्य प्रदेशातील शहडोल, झिरीया अशा विविध भागातील आहेत. ही कारवाई वरदान इंडियन असोसिएशन फॉर द प्रमोशन ऑफ अ‍ॅडॉप्शनच्या अध्यक्ष डॉ. मंगला देशकर, सचिव सरोज कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कामासाठी नेत होते बालकांनादानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये ताब्यात घेतलेल्या मुलांना विविध कामांसाठी नेण्यात येत होते. यात सिकंदराबादला मेट्रोचे पाईप तयार करण्यासाठी ११ बालकांना नेण्यात येत होते. तीन बालकांना सिकंदराबादच्या पाईप कंपनीत आणि दोन बालकांना फळांचे लोडींग करण्यासाठी नेण्यात येत होते तर दोन बालकांना पेंटिंगच्या कामासाठी सिकंदराबादला नेण्यात येत होते.

पुन्हा आढळले नऊ बालकदानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमधील बालकांना गाडीखाली उतरविण्याच्या कारवाईसाठी या गाडीला २० मिनिटे अधिक उशीर झाला. दरम्यान या गाडीत आणखी बालमजूर असल्याची शंका असल्यामुळे आरपीएफने दोन जवानांना या गाडीत पाठविले होते. जवानांना या गाडीत आणखी नऊ बालक आढळले. त्यातील पाच बालक अल्पवयीन असून त्यांना बल्लारशाह रेल्वेस्थानकावर गाडीखाली उतरविण्यात आले. तेथे या बालकांना चंद्रपूर रेल्वे चाईल्ड लाईनच्या स्वाधीन करण्यात आले.

बहुतांश बालकांचा जन्म १ जानेवारीचाताब्यात घेण्यात आलेल्या २६ पैकी १६ बालकांजवळ आढळलेल्या आधारकार्डवर त्यांची जन्मतारीख १ जानेवारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एक सारखी जन्मतारीख असल्यामुळे या बालकांजवळील आधारकार्ड बनावट असल्याची शंका रेल्वे चाईल्ड लाईनने व्यक्त केली आहे.

बेस किचनचे भोजन निघाले निकृष्ट दर्जाचे बालकांना रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींनी आरपीएफ ठाण्यात आणल्यानंतर त्यांची आस्थेने चौकशी करण्यात आली. यातील बहुतांश बालकांना भूक लागल्यामुळे त्यांच्यासाठी आयआरसीटीसीच्या जनाहारमधून भोजन बोलविण्यात आले. परंतु दोन घास तोंडात टाकताच बालकांनी या भोजनाकडे पाठ फिरविली. भोजन का करीत नसल्याचे विचारताच या बालकांनी शिळ्या अन्नाची दुर्गंधी येत असल्याचे सांगितले. त्यावर रेल्वे सुरक्षा दलाने हे भोजन तपासले असता हे भोजन निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाले. यावरून जनाहारमध्ये प्रवाशांना निकृष्ट भोजन पुरविण्यात येत असल्याची बाब स्पष्ट झाली.

टॅग्स :Human Traffickingमानवी तस्करीrailwayरेल्वे