शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

नागपूर विभागात वर्षभरात शेतकऱ्यांची २५१ आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:10 IST

नागपूर विभागातील शेतकरी आत्महत्येची समस्या अद्यापही कायम आहे. विभागात मागील पाच वर्षांत १५०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांत शेतकरी आत्महत्यांमध्ये घट : १५०० हून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विभागातील शेतकरी आत्महत्येची समस्या अद्यापही कायम आहे. विभागात मागील पाच वर्षांत १५०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. दरवर्षी शेतकरी आत्महत्येचा आकडा घटत असून २०१९ मध्ये वर्षभरात २५१ शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. यापैकी ४१ टक्के शेतकऱ्यांचे कुटुंबीयच मदतीसाठी पात्र ठरले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी महितीच्या अधिकारांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यासंदर्भात विचारणा केली होती. वर्ष २०१५ ते २०१९ या कालावधीत नागपूर विभागात किती शेतकऱ्यांची आत्महत्या झाली, किती शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली व किती प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत नागपूर जिल्ह्यात २५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली व तेवढे अर्ज मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. यातील केवळ १०५ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली तर तब्बल २९.०८ टक्के म्हणजेच ७३ प्रकरणे अपात्र ठरली. तर तेवढीच प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. पात्र कुटुंबीयांना एकूण १ कोटी ५ लाख रुपयांची मदत देण्यात आली.२०१५ मध्ये सर्वाधिक आत्महत्याप्राप्त झालेल्या माहितीनुसार २०१५ ते २०१९ या ५ वर्षांच्या कालावधीत नागपूर विभागात तब्बल १ हजार ५९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील ९०१ म्हणजेच ५६.६० टक्के प्रकरणे मदतीसाठी प्राप्त ठरली तर ६१७ प्रकरणांना अपात्र ठरविण्यात आले. तर ७४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.सप्टेंबर, जून महिन्यात सर्वाधिक आत्महत्या२०१९ साली झालेल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये सर्वाधिक ३० आत्महत्या या सप्टेंबर महिन्यात झाल्या. तर त्याखालोखाल जून महिन्यात २८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. ऑगस्ट व नोव्हेंबर महिन्यात प्रत्येकी २४ शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता