शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू होणार एसटीच्या २५० फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:10 IST

नागपूर : ग्रामीण भागातील शाळा, कॉलेज सुरू झाले आहेत. परंतु एसटीच्या बसेसच बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत कसे जायचे, असा ...

नागपूर : ग्रामीण भागातील शाळा, कॉलेज सुरू झाले आहेत. परंतु एसटीच्या बसेसच बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत कसे जायचे, असा प्रश्न पडला आहे. विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने नव्या वर्षात १ जानेवारीपासून विद्यार्थ्यांसाठी २५० फेऱ्या सुरू करण्याची तयारी केली आहे.

ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी शाळेत, कॉलेजमध्ये जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करतात. परंतु कोरोनामुळे एसटीने अद्याप विद्यार्थ्यांसाठी बसेस सुरू केल्या नव्हत्या. नववी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत कसे जावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. खासगी वाहनांनी शाळेत जाणे विद्यार्थ्यांना परवडत नाही. एसटी महामंडळाच्या आगारातून संबंधित विद्यार्थी पास घेऊन शाळेत ये-जा करतात. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी एकूण ६५३ फेऱ्या चालविण्यात येतात. १५ दिवसांपूर्वी १२५ फेऱ्या सुरू करण्यात आल्या. परंतु अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी बस सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार एक जानेवारीपासून विद्यार्थ्यांसाठी २५० नव्या फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. मानव विकास प्रकल्पांतर्गत विद्यार्थिनींसाठी काटोल तालुक्यात ७ आणि रामटेक तालुक्यात ७ बसेस चालविण्यात येतात. परंतु सध्या या बसेस सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

...............

विद्यार्थ्यांसाठी बसेस उपलब्ध करून देणार

ग्रामीण भागात नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. शेकडो विद्यार्थी एसटी बसनेच शाळेत जातात. त्यांच्या सुविधेसाठी एसटीने १ जानेवारीपासून २५० फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हायस्कूल आणि उच्च माध्यमिक शाळांकडून मागणी झाल्यास आणखी बसफेऱ्या सुरू करण्यात येतील.

-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग