शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

नागपूर-मुंबई दरम्यान उन्हाळ्यात २४ विशेष रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 11:56 AM

उन्हाळ्यात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी पाहून आणि प्रतीक्षायादी वाढल्यामुळे रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई-नागपूर दरम्यान २४ सुपरफास्ट विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्यात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी पाहून आणि प्रतीक्षायादी वाढल्यामुळे रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई-नागपूर दरम्यान २४ सुपरफास्ट विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०१०७४ नागपूर-मुंबई विशेष रेल्वेगाडी प्रत्येक रविवारी नागपूरवरून १४ एप्रिल ते ३० जून दरम्यान दुपारी ४ वाजता सुटेल. ही गाडी वर्ध्याला सायंकाळी ५.०८, धामणगावला ६, चांदूरला ६.२३, बडनेराला ७.२८, मूर्तिजापूरला ८.०८, अकोला ८.४५, शेगाव ९.१५, मलकापूर रात्री १० वाजता आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी ८.२० वाजता पोहोचले. रेल्वेगाडी क्रमांक ०२०२१ मुंबई-नागपूर सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून प्रत्येक रविवारी १४ एप्रिल ते ३० जून दरम्यान रात्री १२.२० वाजता सुटेल. ही गाडी अकोला सकाळी ९.३८, मूर्तिजापूरला १०.०८, बडनेरा १०.५८, चांदूर ११.२६, धामणगावला ११.३८, वर्धा १२.१५ आणि नागपूरला दुपारी २.३० वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यात एकूण १७ कोच राहतील. यात १२ स्लिपर, ३ साधारण द्वितीय आणि २ एसएलआर कोचचा समावेश आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वेगाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे