शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

फेरबदलाचे २४ प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित : मनपाकडून पाठपुरावा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 20:44 IST

मागील पाच वर्षापासून महापालिकेचे एकूण २४ फेरबदलाचे प्रस्ताव हे राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. महापालिकेच्या नगर रचना विभागाकडून याचा योग्य पाठपुरावा होत नसल्यामुळे प्रस्तावांवर अद्यापही निर्णय झाला नाही.

ठळक मुद्देकामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

  लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागील पाच वर्षापासून महापालिकेचे एकूण २४ फेरबदलाचे प्रस्ताव हे राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. महापालिकेच्या नगर रचना विभागाकडून याचा योग्य पाठपुरावा होत नसल्यामुळे प्रस्तावांवर अद्यापही निर्णय झाला नाही. कर्मचाऱ्यांच्या अशा कामचुकारपणामुळे महापालिकेला नुकसान सहन करावे लागते, अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी मंगळवारी मनपाच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत दिले.

माजी स्थायी समिती सभापती विजय झलके यांनी सभागृहात या संदर्भात लक्षवेधी मांडली होती. त्यावर प्रशासनाने दिलेल्या निवेदनातून ही बाब पुढे आली आहे. राज्य शासनाकडे असलेल्या फेरबदलाच्या प्रस्तांवामध्ये ४ खासगी तर २० सार्वजनिक आहेत. शासनाकडे असलेल्या प्रस्तावांवर सतत पाठपुरावा करणे गरजेचे असते. वेळोवेळी पत्रव्यवहार करावा लागतो. परंतु, यात मनपाची यंत्रणा अपयशी झाल्याचे एकूणच चित्र आहे. खासगी प्रस्तावाला पाठपुराव्याची आवश्यकता नसते. परंतुु, सर्वजनिक प्रस्तावाचा पाठपुरावा करावा लागतो. असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, नियमानुसार लक्षवेधी सूचना सादर केल्यानंतर केवळ प्रशासनाचेच निवेदन होत असते. यावर चर्चा करता येत नसल्यामुळे या विषयासंदर्भात अन्य नियमांचा आधार घेऊन चर्चेसाठी विषय सभागृहात आणावा, अशी सूचना महापौरांनी केली. शिवाय, प्रशासनाने झलके यांना विषयासंदर्भात लेखी स्वरुपात माहिती देण्याचे निर्देश दिले.

शहर विकास योजनेचा प्रशासनाकडून पाठपुरावा होत नाही. ५ वर्षात एकही प्रस्ताव मंजूर न होणे हे त्याचे द्योतक आहे. निर्देश देऊनही कर्मचारी काम करत नाहीत. अशा कामचुकारांमुळे मनपाचे नुकसान होते. अशा कामचुकारावर कारवाई करावी, असेही निर्देश महापौरांनी सभागृहात दिले.

कोविडवर ३० जूनला चर्चा

कोविड नियंत्रणासंदर्भात मनपा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचा विस्तृत अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. दोन दिवसात तो सर्व नगरसेवकांना उपलब्ध करा. त्याचा अभ्यास केल्यानंतर यावर ३० जूनला विशेष सभेत चर्चा केली जाणार असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली. नगरसेविका आभा पांडे यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून कोविड दरम्यान झालेल्या अनियमिततेवर चर्चेची मागणी केली होती. त्यावर विस्तृत चर्चा करण्याच्या प्रस्तावाला सदस्यांनी स्वीकृती दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाMayorमहापौर