शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

मुसळधार पावसामुळे एस.टी.च्या २०० फेऱ्या रद्द; हजारो प्रवासी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2022 21:06 IST

Nagpur News एस.टी. महामंडळाने नागपूर विभागाच्या विविध मार्गांवरील सुमारे २०० फेऱ्या रद्द केल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील एस.टी.ची वाहतूक व्यवस्था कोलमडल्यासारखी झाली आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील प्रवाशांची कोंडी

 

नागपूर : तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागचे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण झाला असून धोका लक्षात घेता, एस.टी. महामंडळाने नागपूर विभागाच्या विविध मार्गांवरील सुमारे २०० फेऱ्या रद्द केल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील एस.टी.ची वाहतूक व्यवस्था कोलमडल्यासारखी झाली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस थांबायला तयार नाही. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. महामार्गाला जोडून असलेल्या शहरी भागातील वाहतूक सुरळीत असली तरी ग्रामीण भागातील नद्या-नाले तुडुंब भरले असून गावोगावचे पूल, रपट्यातील पाणीही धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. त्यामुळे प्रवाशांची ने-आण करणे धोक्याचे ठरले आहे. ते लक्षात घेता एस.टी.ने नागपूर विभागातील १६२० पैकी २०० वर फेऱ्या रद्द केल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या मते नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी बस सुरू आहे. मात्र, अनेक जिल्ह्यांतील ग्रामीण भागांत पुराचा धोका असल्याने ग्रामीण भागातील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, बस रद्द झाल्याने ठिकठिकाणच्या हजारो प्रवाशांची तीव्र कोंडी झाली आहे. गावात पाहुणे म्हणून आलेल्यांना आणि गावातून बाहेर गेलेल्यांना आपल्या गावी परतण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.

बसस्थानकांवर प्रचंड गर्दी

अनेक ठिकाणच्या बसगाड्या पावसामुळे विलंबाने पोहोचत आहेत; तर ज्या गावाला जायचे, त्या मार्गावरील नदी, नाल्यांच्या पावसाचा अंदाज घेऊन बस सोडण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतल्याने आणि अनेक ठिकाणच्या फेऱ्या रद्द केल्याने त्या गावाला जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांची बसस्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे. जेथे जायचे आहे, त्या गावची बस कधी लागेल, त्याची निश्चिती नसल्याने अधिकाऱ्यांकडूनही व्यवस्थित माहिती मिळत नाही. त्यामुळे अनेक प्रवासी तासनतास बसस्थानकावर ताटकळत आहेत.

काय माहीत बापा... कधी येईन त एसटी

आवश्यक कामानिमित्त नागपुरात आलेल्या आणि आता ज्या गावाला जायचे आहे, तेथे बस उपलब्ध नसल्याने स्थानकावर ताटकळत असलेल्या प्रवाशांपैकी काहींसोबत ‘लोकमत’ने चर्चा केली. त्यांची प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे आहे.

१) महादेव दाऊत्रे (रा. तूर कुही)

१४ मैलला जायचे आहे. दीड ते दोन तासांपासून वाट बघतो आहे बसची. कधी येईल माहीत नाही. कुणी व्यवस्थित सांगतही नाही.

२) लक्ष्मीबाई जीवराहे (रा. पेंच नवेगाव, खैरी)

कोंढाळीजवळच्या दुधाळ्याला जायचे आहे. ११ वाजता आली. आता २ वाजत आले. अजून किती वेळ लागन, माहीत नाही.

३) रशीदभाई शेख (रा. नागपूर)

चांदूर बाजारला जायचे आहे. १२ च्या सुमारास येथे आले. ३ वाजता गाडी लागेल म्हणतात. काही खरं नाही, असंही म्हणतात. महत्त्वाचे काम आहे. जाणे आवश्यक आहे. काय करू समजत नाही.

४) पुष्पाबाई येवले (रा. वणी)

वणीला जायचे आहेजी. दोन-अडीच घंटे झाले. कधी बस लागंन ते कुणी सांगतच नाही. जीव सारा वैतागून गेला.

५) गजानन काळबांडे (रा. नागपूर)

रंगारी (मध्यप्रदेश) येथे जायचे आहे. एक वाजता आलो. आता लागन, आता लागन, बस असंच सांगताहे. कंटाळून गेलो. आता म्हणते तीन वाजता बस आहे म्हणून. बघतो आता.

प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. ज्या मार्गावर धोका आहे, अशाच ठिकाणी बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. पाण्याचा धोका नसलेल्या ठिकाणी बस सुरू आहे. पुराचा धोका टळताच बसफेरी सुरू करण्यात येईल.

-गजानन नागुलवार

विभागीय नियंत्रक, एस.टी. महामंडळ, नागपूर

----

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक