शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार नवीन सूचना

By admin | Updated: November 11, 2015 02:24 IST

उपराजधानीची स्मार्ट सिटीसाठी निवड व्हावी यासाठी स्मार्ट सिटी अभियानाचा दुसरा टप्पा ७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात आला.

स्मार्ट सिटीचा दुसरा टप्पा : आता आॅनलाईन सूचना स्वीकारणारनागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीसाठी निवड व्हावी यासाठी स्मार्ट सिटी अभियानाचा दुसरा टप्पा ७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात आला. शहराच्या विविध भागातील नागरिकांसोबत संवाद साधून त्यांच्या स्मार्ट सूचनांचा स्वीकार करण्यात आला. तीन दिवसाात २० हजार नागरिकांनी सूचना केल्या आहेत. आता आॅनलाईन सूचनांचा स्वीकार केला जाणार आहे. एखादी समस्या असल्यास तिचा निपटारा करण्यासाठी नागरिकांनाच उपाययोजना सांगण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी अर्जाचा नमुना तयार करून त्यातील विविध प्रश्नावर नागरिकांनी आपले अभिप्राय नोंदवावयाचे होते. यात नागरिकांचा अधिकाधिक सहभाग असावा यासाठी प्रत्येक झोनमध्ये दोन ते तीन रोड शो करण्यात आले. तसेच शहरातील २० ठिकाणी दर दोन तासांनी रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच दिवशी १० हजार नागरिकांनी अर्ज भरून सूचना केल्या. दुसऱ्या दिवशी ७ हजार तर तिसऱ्या दिवशी ३ हजार नागरिकांनी स्मार्ट सिटीसाठी सूचना केल्या आहे. तीन दिवसाच्या कालावधीत शहराच्या विविध भागात सकाळी ८ वाजतापासून रात्री ८ वाजेपर्यंत अर्ज भरून घेण्याचे काम करण्यात आले. पहिल्या टप्प्यात घरोघरी जाऊन लोकांच्या सूचना व कल्पना जाणून घेण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात प्रामुख्याने बाजार व वर्दळीच्या ठिकाणावर लक्ष केंद्रित करण्यात आले. मोहिमेला लोकांकडून प्रतिसाद मिळाला.दुसऱ्या टप्प्यात पॅन सिटी इंटरव्हेन्शवर काम करण्यात आले. विश्लेषणात्मक सर्वेचे काम सुरू आहे. लवकरच स्मार्ट अ‍ॅप बनविण्यात येईल.दुसऱ्या टप्प्यात ३० हजार लोकांच्या सूचना अपेक्षित होत्या. परंतु २० हजार लोकांच्या सूचना आल्या. आॅनलाईन सूचना स्वीकारल्या जात आहे. यात हा आकडा पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात २ लाख १६ हजार ८५० नागरिकांकडून अर्ज भरून घेण्यात आले. यात सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश होता . (प्रतिनिधी)१५ डिसेंबरपर्यंत अहवालस्मार्ट सिटीत नागपूर शहराचा समावेश व्हावा यासाठी महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू आहे. शहरातील नागरिकांकडून प्राप्त सूचनातून चांगल्या सूचनांचा स्वीकार केला जाणार आहे. याबाबतचा अहवाल १५ डिसेंबरपर्यंत सादर करावयाचा आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे.