शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

२६ बसेसवर २ लाखाचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:25 IST

नागपूर : रस्ता अपघातांमध्ये दरवर्षी जवळपास १२ हजार प्रवाशांचा मृत्यू होतो. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याची ...

नागपूर : रस्ता अपघातांमध्ये दरवर्षी जवळपास १२ हजार प्रवाशांचा मृत्यू होतो. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याची दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालय, (आरटीओ) नागपूर ग्रामीणने कारवाईचा बडगा उगारला आहे. आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करीत असलेल्या २६ बसेवर कारवाई करीत १ लाख ९४ हजार २५० रुपयांचा दंड आकारला आहे. विशेष म्हणजे, यात खासगीसोबतच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसचा समावेश आहे.

राष्ट्रीय महामार्गासह, राज्य मार्ग व इतर सर्व प्रमुख मार्गांवर अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विशेष म्हणजे, शहरात वाहतूक पोलीस नियंत्रित करीत असलेल्या सर्वच चौकात अवैध प्रवासी वाहतूक चालते. काळ्यापिवळ्या व्हॅनमध्ये चालकासह आठ प्रवाशांची अनुमती आहे. मात्र प्रत्यक्षात १२ ते १५ प्रवासी त्यात कोंबले जातात. चालकाशेजारी एक आसन असताना तेथे तिघांना बसविले जाते. चालकाला गिअर बदलणे, ब्रेक दाबणे व स्टिअरिंग फिरविणे सुद्धा त्यामुळे अत्यंत अवघड असते. परिणामी अपघाताची शक्यता वाढते. तीन, पाच आसनी रिक्षा व मिनीडोअर वाहनांचीही अशीच स्थिती आहे. तर जिल्हाबाहेर व आंतर राज्य वाहतूकमध्येही आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जातात. विशेष म्हणजे, चालकाच्या बाजूला, बसच्या मध्यभागात टेबल टाकून व उभ्याने प्रवाशांची वाहतूक केली जाते. याची दखल घेत ग्रामीण आरटीओ कार्यालयाने सर्व सीमा तपासणी नाक्यांवर बसची तपासणी करण्याचा सूचना भरारी पथकाला दिल्या. त्यानुसार २६ बसेसवर कारवाई करण्यात आली. यात १६ बसेस मध्य प्रदेशातील आहेत. या शिवाय, ऑक्टोबर ते १० डिसेंबर या कालावधीत २५९ ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करीत ८० लाख ९० हजार ८४३ दंड आकारला आहे.

-कारवाईचा वेग वाढविणार

अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. जादा मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा वेग वाढविला जाणार आहे.

-बजरंग खारमाटे

प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर