शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
4
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
5
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
6
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
7
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
8
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
9
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
11
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
12
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
13
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
14
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
15
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
16
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
17
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
18
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या

‘ईव्हीएम’विरुद्ध २ला सर्वपक्षीय एल्गार

By admin | Updated: February 28, 2017 01:57 IST

महापालिका निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ करून निवडणुकीचे निकाल मॅनेज करण्यात आले आहे.

मोर्चा धडकणार : महापालिका निवडणूक रद्द करण्याची मागणीनागपूर : महापालिका निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ करून निवडणुकीचे निकाल मॅनेज करण्यात आले आहे. त्यामुळे ही निवडणूक रद्द करून बॅलेटद्वारे फेरनिवडणूक घेण्यात यावी, यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहे. याविरोधात लढा उभारण्यासाठी ‘लोकशाही बचोओ’ समिती स्थापन करण्यात आली आहे.भालदारपुरा येथील केजीएन सभागृहात यासंदर्भात सोमवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, मुस्लीम लीग, बहुजन समाज पार्टी, हलबा आघाडी यासह अपक्ष उमेदवार उपस्थित होते. २ मार्चला सकाळी ११ वाजता चिटणीस पार्क ते संविधान चौक असा भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक रद्द करण्याची मागणी करणार आहे.यावेळी काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष शेख हुसेन, शिवसेनेचेसतीश हरडे, तौसिफ खान, किशोर पराते, सुरेश जग्यासी, मिलिंद सोनटक्के, सुशील बालपांडे, रमण ठवकर, अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी पराभूत सदस्यांनी आपली भूमिका मांडली. सबळ पुराव्यानिशी न्यायालयात जाण्यावर चर्चा करण्यात आली. प्रदीप अग्रवाल यांनी कायदेशीर बाजूंची माहिती देऊ न पुराव्यासह न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला.(प्रतिनिधी)राष्ट्रध्वजाने करणार आंदोलनाची सुरुवातआंदोलनात कोणत्याही एका पक्षाचा झेंडा राहणार नाही. राष्ट्रध्वज हाती घेऊन आंदोलन क रण्यात येणार आहे. यावेळी ईव्हीएम हटाओ, देश बचाओ, असा सर्वांचा एकच नारा राहणार आहे. कार्यकर्ते आपापल्या भागातून बॅनरसह आंदोलनात सहभागी होणार आहेत.मोजणीत मतदान वाढलेमहापालिका निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ केल्याने अनेक प्रभागात धक्कादायक प्रकार घडले. प्रभाग क्रमांक १ मधील मतदानातील घोळाची सुरेश जग्यासी, माधुरी सोनटक्के, मीना यादव व सूरज आवळे यांनी माहिती दिली. प्रत्यक्षात ३१,११० मतदान झाले असताना मतमोजणीत मात्र ३२,४१७ झाले. १३७० मते कशी वाढली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीतील ईव्हीएम मशिनीवर तीव्र आक्षेप घेऊन या सर्व निवडणुका रद्द करून, पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अशी मागणी अतुल सेनाड यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली. अमेरिकासारख्या प्रगत देशाने ईव्हीएम मशीन नाकारून बॅलेट पेपरवरील निवडणूक सुरू केली आहे. मात्र आपल्या देशात अजूनही त्याच ईव्हीएमचा वापर केला जात आहे. फेरनिवडणुकीसंदर्भात निवेदन निवडणूक आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी संजय बारई, महेश महाडिक व सुनील वाघमारे उपस्थित होते. ईव्हीएममध्ये घोळ महापालिका निवडणुकीतील ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे उमेदवार नितीन नागदेवते यांनी पत्रपरिषदेत केला. मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीन चुकीच्या क्रमाने लावण्यात आल्या होत्या. नारा येथील मतदान कें द्रावर एक तास ईव्हीएम मशीन बंद पडली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात घोळ झाला. तरी ईव्हीएम मशीनद्वारे झालेल्या या सर्व निवडणुका रद्द करून, बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घेण्यात याव्या, अशी त्यांनी मागणी केली. अन्यथा आपण न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कविता लांडगे व मनीष बन्सोड उपस्थित होते.