शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘ईव्हीएम’विरुद्ध २ला सर्वपक्षीय एल्गार

By admin | Updated: February 28, 2017 01:57 IST

महापालिका निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ करून निवडणुकीचे निकाल मॅनेज करण्यात आले आहे.

मोर्चा धडकणार : महापालिका निवडणूक रद्द करण्याची मागणीनागपूर : महापालिका निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ करून निवडणुकीचे निकाल मॅनेज करण्यात आले आहे. त्यामुळे ही निवडणूक रद्द करून बॅलेटद्वारे फेरनिवडणूक घेण्यात यावी, यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहे. याविरोधात लढा उभारण्यासाठी ‘लोकशाही बचोओ’ समिती स्थापन करण्यात आली आहे.भालदारपुरा येथील केजीएन सभागृहात यासंदर्भात सोमवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, मुस्लीम लीग, बहुजन समाज पार्टी, हलबा आघाडी यासह अपक्ष उमेदवार उपस्थित होते. २ मार्चला सकाळी ११ वाजता चिटणीस पार्क ते संविधान चौक असा भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक रद्द करण्याची मागणी करणार आहे.यावेळी काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष शेख हुसेन, शिवसेनेचेसतीश हरडे, तौसिफ खान, किशोर पराते, सुरेश जग्यासी, मिलिंद सोनटक्के, सुशील बालपांडे, रमण ठवकर, अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी पराभूत सदस्यांनी आपली भूमिका मांडली. सबळ पुराव्यानिशी न्यायालयात जाण्यावर चर्चा करण्यात आली. प्रदीप अग्रवाल यांनी कायदेशीर बाजूंची माहिती देऊ न पुराव्यासह न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला.(प्रतिनिधी)राष्ट्रध्वजाने करणार आंदोलनाची सुरुवातआंदोलनात कोणत्याही एका पक्षाचा झेंडा राहणार नाही. राष्ट्रध्वज हाती घेऊन आंदोलन क रण्यात येणार आहे. यावेळी ईव्हीएम हटाओ, देश बचाओ, असा सर्वांचा एकच नारा राहणार आहे. कार्यकर्ते आपापल्या भागातून बॅनरसह आंदोलनात सहभागी होणार आहेत.मोजणीत मतदान वाढलेमहापालिका निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ केल्याने अनेक प्रभागात धक्कादायक प्रकार घडले. प्रभाग क्रमांक १ मधील मतदानातील घोळाची सुरेश जग्यासी, माधुरी सोनटक्के, मीना यादव व सूरज आवळे यांनी माहिती दिली. प्रत्यक्षात ३१,११० मतदान झाले असताना मतमोजणीत मात्र ३२,४१७ झाले. १३७० मते कशी वाढली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीतील ईव्हीएम मशिनीवर तीव्र आक्षेप घेऊन या सर्व निवडणुका रद्द करून, पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अशी मागणी अतुल सेनाड यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली. अमेरिकासारख्या प्रगत देशाने ईव्हीएम मशीन नाकारून बॅलेट पेपरवरील निवडणूक सुरू केली आहे. मात्र आपल्या देशात अजूनही त्याच ईव्हीएमचा वापर केला जात आहे. फेरनिवडणुकीसंदर्भात निवेदन निवडणूक आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी संजय बारई, महेश महाडिक व सुनील वाघमारे उपस्थित होते. ईव्हीएममध्ये घोळ महापालिका निवडणुकीतील ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे उमेदवार नितीन नागदेवते यांनी पत्रपरिषदेत केला. मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीन चुकीच्या क्रमाने लावण्यात आल्या होत्या. नारा येथील मतदान कें द्रावर एक तास ईव्हीएम मशीन बंद पडली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात घोळ झाला. तरी ईव्हीएम मशीनद्वारे झालेल्या या सर्व निवडणुका रद्द करून, बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घेण्यात याव्या, अशी त्यांनी मागणी केली. अन्यथा आपण न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कविता लांडगे व मनीष बन्सोड उपस्थित होते.