शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

२०२२ पर्यंत राज्यात उभारणार १९.४ लाख घरे; प्रकाश मेहता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 21:14 IST

राज्यातील ३८२ शहरात पंतप्रधान आवास योजना-सर्वांसाठी घरे राबविण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. सन २०२२ सालापर्यंत राज्यात १९ लाख ४ हजार घरे उभारण्यात येतील अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सोमवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली.

ठळक मुद्देपंतप्रधान आवास योजनेसाठी कोणतेही अर्ज स्वीकारलेले नाही

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यातील ३८२ शहरात पंतप्रधान आवास योजना-सर्वांसाठी घरे राबविण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. सन २०२२ सालापर्यंत राज्यात १९ लाख ४ हजार घरे उभारण्यात येतील अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सोमवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली.राज्यातील महापालिका निवडणुकीपूर्वी पंतप्रधान आवास योजनेसाठी गरजू लोकांकडून अर्ज भरून घेण्यात आले होते. या अर्जांचे पुढे काय झाले असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला होता. यावर पंतप्रधान आवास योजनेसाठी राज्य शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारण्यात आलेले नाहीत, अशी माहिती मेहता यांनी दिली.महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास अधिनियम १९७६ अन्वये प्राधिकरणाचे उद्दिष्ट वाढविण्यात आले आहे. सोलापूर व चंद्रपूर येथे विशेष नियोजन प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. योजना प्रत्यक्षात राबविण्यासाठी विविध वित्तीय संस्थाकडून कर्ज उभारण्यात येत आहे. त्या व्यतिरिक्त अग्रीम अंशदान, प्राधिकरणाचा स्वत:चा निधी शासन अनुदान यातूनही गृहनिर्माण योजना प्रत्यक्षात राबविण्यात येतात. ही कामे प्रादेशिक महामंडळामार्फत राबविण्यात येतात. म्हाडाअंतर्गत कार्यरत असलेल्या प्रादेशिक मंडळामार्फत मार्च २०१७ पर्यंत एकूण ६ लाख ६४ हजार ९५४ सदनिका बांधण्यात आलेल्या आहेत. २०१७-१८ या वर्षासाठी १४ हजार ४४० सदनिकाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती प्रकाश मेहता यांनी दिली.मुंबई शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचे जीपीएस लेडार तंत्रज्ञानावर आधारित सर्वेक्षण प्राधिकरणाकडून क रण्यात आले आहे. बायोमेट्रिक सर्वेक्षण प्रगतिपथावर आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या माध्यमातून शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाने या संबंधात स्टेट बँक आॅफ इंडियाशी समझोता करार के ला आहे. नगर विकास विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार नागरी जमीन अधिनियमानुसार औद्योगिक विभागातील घटकांना मोकळ्या जमिनी औद्योगिक वापरासाठी संपादनातून सूट देण्यात आली आहे. नऊ नागरी समूहांमध्ये एकूण २८१६.५३ हेक्टर जमीन क्षेत्रास औद्योगिक प्रयोजनासाठी सूट देण्यात आल्याची माहिती मेहता यांनी दिली.गुन्हे दाखल असलेल्यांना काळ्या यादीत टाकणारविकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या ज्या विकासकांवर गुन्हे दाखल आहेत, अशा विकासकांना काळ्या यादीत टाकण्यात येईल, अशी माहिती मेहता यांनी प्रश्नाच्या उत्तरात दिली.

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Prakash Mehtaप्रकाश मेहता