शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

नागपूर विभागात आठ महिन्यात शिवशाहीचे १९ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:28 IST

जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत एसटीच्या नागपूर विभागात शिवशाही बसेसचे तब्बल १९ अपघात झाल्याची नोंद असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.

ठळक मुद्देप्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्हएसटी महामंडळाने उपाययोजना करण्याची गरज

दयानंद पाईकराव ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एसटी महामंडळाच्या ताफ्यात प्रवाशांच्या सुविधेसाठी वातानुकूलित शिवशाही बसेस दाखल झाल्या. शिवशाही बसेसला प्रवाशांनी पसंतीही दर्शविली. परंतु अपघातांच्या बाबतीत मात्र शिवशाही बसेस सुरक्षित नसल्याचे दिसत आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत एसटीच्या नागपूर विभागात शिवशाही बसेसचे तब्बल १९ अपघात झाल्याची नोंद असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.एसटी महामंडळाने आधुनिकीकरणाकडे वाटचाल करीत प्रवाशांना दर्जेदार सेवा पुरविण्यासाठी शिवशाही बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल केल्या. खासगी वाहतुकीच्या स्पर्धेला तोंड देण्याच्या उद्देशाने महामंडळाने उचललेले हे पाऊल यशस्वी ठरले आणि प्रवाशांचाही शिवशाही बसेसला प्रतिसाद मिळाला. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शिवशाही बसेसवर प्रश्नचिन्ह लागले आहे. एसटीच्या नागपूर विभागात एकूण ५६ शिवशाही बसेस आहेत. यात एसटीच्या मालकीच्या २९ आणि खासगी वाहतूकदाराच्या २७ बसेसचा समावेश आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या आठ महिन्यांच्या कालावधीत एसटीच्या नागपूर विभागात शिवशाही बसेसचे तब्बल १९ अपघात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यात जानेवारी महिन्यात २, फेब्रुवारीत २, मार्च १, एप्रिल ३, मे १, जून २, जुलै २, ऑगस्ट २, सप्टेंबर २ आणि ऑक्टोबर महिन्यात २ अपघात घडले आहेत. शिवशाही बसेसच्या अपघातांची ही आकडेवारी पाहून प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. शिवशाहीची सेवा प्रवाशांसाठी चांगली आहे. परंतु अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एसटी महामंडळाने ठोस उपाययोजना केल्यास या बसेसकडे प्रवाशांचा ओढा वाढू शकतो, हेही तेवढेच खरे आहे.

खासगी बसेसवर अकुशल चालकशिवशाही बसेसच्या अपघातांचा आढावा घेतला असता या बसेसवर अकुशल चालक असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली. खासगी वाहतूकदाराकडून चालकाची नेमणूक करताना त्यांना ४८ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येत नाही. चालकाला विश्रांतीची योग्य वेळ मिळते की नाही, याची शहानिशा करण्यात येत नाही. याशिवाय शिवशाही बसेसचा वेग अधिक असल्यामुळे या गाड्या नियंत्रित होत नाहीत.नेहमीच चालकांची चूक नसते‘रस्त्यावर अनेक वाहने धावतात. अपघात झाल्यानंतर नेहमीच शिवशाही बसेसच्या चालकाची चूक असते असे नाही. अनेकदा दुसरी वाहने शिवशाही बसेसवर येऊन आदळतात. खराब रस्तेही याला कारणीभूत आहेत. त्यामुळे चालकांवर दोष देणे चुकीचे आहे.’-संजय रामटेके, प्रभारी विभागीय नियंत्रक, नागपूर विभाग

टॅग्स :Shivshahiशिवशाही