शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नागपूर विभागात आठ महिन्यात शिवशाहीचे १९ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:28 IST

जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत एसटीच्या नागपूर विभागात शिवशाही बसेसचे तब्बल १९ अपघात झाल्याची नोंद असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.

ठळक मुद्देप्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्हएसटी महामंडळाने उपाययोजना करण्याची गरज

दयानंद पाईकराव ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एसटी महामंडळाच्या ताफ्यात प्रवाशांच्या सुविधेसाठी वातानुकूलित शिवशाही बसेस दाखल झाल्या. शिवशाही बसेसला प्रवाशांनी पसंतीही दर्शविली. परंतु अपघातांच्या बाबतीत मात्र शिवशाही बसेस सुरक्षित नसल्याचे दिसत आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत एसटीच्या नागपूर विभागात शिवशाही बसेसचे तब्बल १९ अपघात झाल्याची नोंद असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.एसटी महामंडळाने आधुनिकीकरणाकडे वाटचाल करीत प्रवाशांना दर्जेदार सेवा पुरविण्यासाठी शिवशाही बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल केल्या. खासगी वाहतुकीच्या स्पर्धेला तोंड देण्याच्या उद्देशाने महामंडळाने उचललेले हे पाऊल यशस्वी ठरले आणि प्रवाशांचाही शिवशाही बसेसला प्रतिसाद मिळाला. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शिवशाही बसेसवर प्रश्नचिन्ह लागले आहे. एसटीच्या नागपूर विभागात एकूण ५६ शिवशाही बसेस आहेत. यात एसटीच्या मालकीच्या २९ आणि खासगी वाहतूकदाराच्या २७ बसेसचा समावेश आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या आठ महिन्यांच्या कालावधीत एसटीच्या नागपूर विभागात शिवशाही बसेसचे तब्बल १९ अपघात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यात जानेवारी महिन्यात २, फेब्रुवारीत २, मार्च १, एप्रिल ३, मे १, जून २, जुलै २, ऑगस्ट २, सप्टेंबर २ आणि ऑक्टोबर महिन्यात २ अपघात घडले आहेत. शिवशाही बसेसच्या अपघातांची ही आकडेवारी पाहून प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. शिवशाहीची सेवा प्रवाशांसाठी चांगली आहे. परंतु अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एसटी महामंडळाने ठोस उपाययोजना केल्यास या बसेसकडे प्रवाशांचा ओढा वाढू शकतो, हेही तेवढेच खरे आहे.

खासगी बसेसवर अकुशल चालकशिवशाही बसेसच्या अपघातांचा आढावा घेतला असता या बसेसवर अकुशल चालक असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली. खासगी वाहतूकदाराकडून चालकाची नेमणूक करताना त्यांना ४८ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येत नाही. चालकाला विश्रांतीची योग्य वेळ मिळते की नाही, याची शहानिशा करण्यात येत नाही. याशिवाय शिवशाही बसेसचा वेग अधिक असल्यामुळे या गाड्या नियंत्रित होत नाहीत.नेहमीच चालकांची चूक नसते‘रस्त्यावर अनेक वाहने धावतात. अपघात झाल्यानंतर नेहमीच शिवशाही बसेसच्या चालकाची चूक असते असे नाही. अनेकदा दुसरी वाहने शिवशाही बसेसवर येऊन आदळतात. खराब रस्तेही याला कारणीभूत आहेत. त्यामुळे चालकांवर दोष देणे चुकीचे आहे.’-संजय रामटेके, प्रभारी विभागीय नियंत्रक, नागपूर विभाग

टॅग्स :Shivshahiशिवशाही