शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

मनपाच्या स्थापना दिनी १८३० ऐवजदारांना स्थायी करा : महापौरांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 21:31 IST

२१६३ ऐवजदारांपैकी १८३० ऐवजदारांना मनपाच्या २ मार्च या स्थापना दिनी स्थायी करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी मंगळवारी दिले.

ठळक मुद्देकार्यवाहीचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेतील अस्थायी, ऐवजदार कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचे आदेश दिले होते.त्यासंदर्भातील ठराव सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आला होता. त्यानुसार आतापर्यंत पूर्णपणे कार्यवाही झालेल्या पात्र २१६३ ऐवजदारांपैकी १८३० ऐवजदारांना मनपाच्या २ मार्च या स्थापना दिनी स्थायी करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी मंगळवारी दिले.मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमहापौर मनीषा कोठे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम, नगरसेवक सुनील अग्रवाल, दिव्या धुरडे, सतीश होले, उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त महेश धामेचा, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार आदी उपस्थित होते.मनपातील अस्थायी, ऐवजदार कर्मचारी ज्यांच्याकडे मूळ ऐवजदार कार्ड असेल आणि ज्यांची २० वर्षांची नियमित सेवा झाली आहे, त्यांना स्थायी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याची माहिती निर्भय जैन यांनी दिली. मनपात ४,३४७ ऐवजदार कार्यरत आहेत. झोन क्र. १ ते १० मार्फत २१६३ कर्मचाऱ्यांच्या नस्ती प्राप्त झाल्या. त्यापैकी काही नस्तींमध्ये त्रुटी आढळल्याने त्या परत पाठविल्या होत्या. सुधारणांसह त्या प्राप्त झाल्या. यात लक्ष्मीनगर झोन २२०, हनुमाननगर झोन २२३, धंतोली झोन २८४, गांधीबाग झोन ३०० अशा एकूण १०२७ नस्ती प्राप्त झाल्या आहेत. धरमपेठ झोनतर्फे २२० पैकी १८८, सतरंजीपुरा २५० पैकी १४६, नेहरूनगर २३४, लकडगंज ३३५ पैकी ९५, आशीनगर ३५० पैकी ९० आणि मंगळवारी झोनतर्फे २७० पैकी ५० अशा एकूण ८०३ नस्ती आहेत.१८३० कर्मचाऱ्यांच्या नस्ती १४ फेब्रुवारीपर्यंत आयुक्तांकडे पाठविण्यात याव्यात. आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर पुढील आठ दिवसात स्थायी आदेश काढून २ मार्च रोजी अर्थात महापालिकेच्या स्थापना दिनी कार्यक्रम आयोजित करून त्यात नियुक्ती पत्र वितरित करा, यानंतर ३१ जानेवारी आणि त्यानंतर ३१ मार्चपर्यंत ज्यांच्या सेवा २० वर्षांच्या होतील, त्यांना स्थायी करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश महापौरांनी दिले. बैठकीला एमबीएम सेवासंघाचे सतीश सिरस्वान, अजय हाथीबेड यांच्यासह सहायक आयुक्त उपस्थित होते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाMayorमहापौरEmployeeकर्मचारी