शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

विकास मंडळाचे पुनर्गठन पुरेसे नाही, अनुशेषाचे पुन्हा मोजमाप हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2022 11:45 IST

विदर्भात अजूनही १.८० लाख हेक्टर सिंचन अनुशेष; नव्याने अभ्यासाची आवश्यकता

कमल शर्मा

नागपूर : नागपूर कराराच्या ६९ व्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारनेविदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांचे मंगळवारी पुनर्गठन केले खरे. पण, केवळ पुनरूज्जीवनाने विदर्भ, मराठवाड्याचे भले होणार नाही. मागास भागांच्या विकासाचे पुन्हा मोजमाप करावे. विशेषत: उद्योग व सेवा क्षेत्राचा समावेश करून नव्याने अभ्यास करण्याची गरज असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

विकासाच्या प्रादेशिक समतोलसाठी राज्यघटनेच्या कलम ३७१ (२) अंतर्गत राष्ट्रपतीच्या आदेशावर या तीनही मंडळांची स्थापना १ मे १९९४ रोजी झाली होती. त्यासोबतच अनुशेष व निर्देशांक समिती स्थापन करून नऊ क्षेत्रांमधील विकासाचे व अनुशेषाचे मोजमाप करण्याचा निर्णय झाला होता. त्यात सिंचनाचा अनुशेष मोठा होता आणि सरकारच्या ताज्या अहवालानुसार, अमरावती विभागातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम या चार जिल्ह्यांत अजूनही १ लाख ७९ हजार ४७७ हेक्टरचा भौतिक सिंचन अनुशेष बाकी आहे. दुसरीकडे या काळात नव्याने अनुशेष निर्माण झाला असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. भौतिक अनुशेषही वाढल्याचा दावा आहे. त्यामुळे नव्याने अनुशेषाची मोजणी व्हावी, अशी मागणी आहे.

राज्यातील तिन्ही विकास मंडळांचे पुनर्गठन, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

असे आहे विदर्भवाद्यांचे म्हणणे...

  • अनुशेष व निर्देशांक समतीने उद्योग व व सेवा क्षेत्रातील अनुशेषाचा अभ्यास केला नव्हता. याचा तुलनात्मक अभ्यास होणे आवश्यक आहे.
  • २००१-२१ च्या रस्ते विकास योजनेत नागपूर विभागातील ८२ टक्के लक्ष्य गाठण्यात आले आहे. अमरावती विभागात फक्त ६८ टक्के काम झाले आहे.
  • ५ सप्टेंबर २०११ रोजी उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळासाठी उपसमित्या स्थापन करण्यात आल्या. त्याच धर्तीवर विदर्भसाठी नागपर व अमरावतीकरिताउपसमित्या स्थापन कराव्यात.
  • संतुलित व समतोल विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातील निधीचे समान वितरण व्हावे.
  • गरिबी, रोजगार, पर्यावरण यांसारख्या विदर्भातील मूळ समस्यांवर सखोल अभ्यास व्हावा.
  • मंडळांनी तयार केलेल्या अहवालावर कार्यवृत्त अहवाल जारी व्हावा.

 

*विदर्भवादी आनंदी, पण काही मागण्याही*

विकास मंडळांचे पुनर्गठन झाल्याचे विदर्भवाद्यांनी स्वागत केले आहे. विदर्भ विकास मंडळाचे माजी सदस्य डॉ. डॉ. संजय खडक्कार यांनी निर्णयाचे स्वागत करीत मंडळाच्या अध्यक्षपदी अराजकीय व्यक्तिची नेमणूक व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर मंडळाच्या पुनर्गठनासाठी न्यायालयात धाव घेणारे नितीन रोंघे यांनी राज्य सरकारने विदर्भाच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी केली. खडक्कार व रोंघे यांनी अनुशेषाची नव्याने मोजणी करण्यासोबतच विकास मंडळांना सशक्त करण्याचीही मागणी केली.

टॅग्स :GovernmentसरकारVidarbhaविदर्भ