शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

विकास मंडळाचे पुनर्गठन पुरेसे नाही, अनुशेषाचे पुन्हा मोजमाप हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2022 11:45 IST

विदर्भात अजूनही १.८० लाख हेक्टर सिंचन अनुशेष; नव्याने अभ्यासाची आवश्यकता

कमल शर्मा

नागपूर : नागपूर कराराच्या ६९ व्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारनेविदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांचे मंगळवारी पुनर्गठन केले खरे. पण, केवळ पुनरूज्जीवनाने विदर्भ, मराठवाड्याचे भले होणार नाही. मागास भागांच्या विकासाचे पुन्हा मोजमाप करावे. विशेषत: उद्योग व सेवा क्षेत्राचा समावेश करून नव्याने अभ्यास करण्याची गरज असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

विकासाच्या प्रादेशिक समतोलसाठी राज्यघटनेच्या कलम ३७१ (२) अंतर्गत राष्ट्रपतीच्या आदेशावर या तीनही मंडळांची स्थापना १ मे १९९४ रोजी झाली होती. त्यासोबतच अनुशेष व निर्देशांक समिती स्थापन करून नऊ क्षेत्रांमधील विकासाचे व अनुशेषाचे मोजमाप करण्याचा निर्णय झाला होता. त्यात सिंचनाचा अनुशेष मोठा होता आणि सरकारच्या ताज्या अहवालानुसार, अमरावती विभागातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम या चार जिल्ह्यांत अजूनही १ लाख ७९ हजार ४७७ हेक्टरचा भौतिक सिंचन अनुशेष बाकी आहे. दुसरीकडे या काळात नव्याने अनुशेष निर्माण झाला असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. भौतिक अनुशेषही वाढल्याचा दावा आहे. त्यामुळे नव्याने अनुशेषाची मोजणी व्हावी, अशी मागणी आहे.

राज्यातील तिन्ही विकास मंडळांचे पुनर्गठन, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

असे आहे विदर्भवाद्यांचे म्हणणे...

  • अनुशेष व निर्देशांक समतीने उद्योग व व सेवा क्षेत्रातील अनुशेषाचा अभ्यास केला नव्हता. याचा तुलनात्मक अभ्यास होणे आवश्यक आहे.
  • २००१-२१ च्या रस्ते विकास योजनेत नागपूर विभागातील ८२ टक्के लक्ष्य गाठण्यात आले आहे. अमरावती विभागात फक्त ६८ टक्के काम झाले आहे.
  • ५ सप्टेंबर २०११ रोजी उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळासाठी उपसमित्या स्थापन करण्यात आल्या. त्याच धर्तीवर विदर्भसाठी नागपर व अमरावतीकरिताउपसमित्या स्थापन कराव्यात.
  • संतुलित व समतोल विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातील निधीचे समान वितरण व्हावे.
  • गरिबी, रोजगार, पर्यावरण यांसारख्या विदर्भातील मूळ समस्यांवर सखोल अभ्यास व्हावा.
  • मंडळांनी तयार केलेल्या अहवालावर कार्यवृत्त अहवाल जारी व्हावा.

 

*विदर्भवादी आनंदी, पण काही मागण्याही*

विकास मंडळांचे पुनर्गठन झाल्याचे विदर्भवाद्यांनी स्वागत केले आहे. विदर्भ विकास मंडळाचे माजी सदस्य डॉ. डॉ. संजय खडक्कार यांनी निर्णयाचे स्वागत करीत मंडळाच्या अध्यक्षपदी अराजकीय व्यक्तिची नेमणूक व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर मंडळाच्या पुनर्गठनासाठी न्यायालयात धाव घेणारे नितीन रोंघे यांनी राज्य सरकारने विदर्भाच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी केली. खडक्कार व रोंघे यांनी अनुशेषाची नव्याने मोजणी करण्यासोबतच विकास मंडळांना सशक्त करण्याचीही मागणी केली.

टॅग्स :GovernmentसरकारVidarbhaविदर्भ