शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

१८ तालुके, ९१ पाणलाेट क्षेत्र डार्क झाेनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST

नागपूर : हवामान विभागाने यावर्षी समाधानकारक पाऊस हाेण्याचा अंदाज व्यक्त केला असला तरी भूजल स्तराबाबत काही तालुक्यांना चिंता करण्याची ...

नागपूर : हवामान विभागाने यावर्षी समाधानकारक पाऊस हाेण्याचा अंदाज व्यक्त केला असला तरी भूजल स्तराबाबत काही तालुक्यांना चिंता करण्याची गरज आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या २०१९-२०च्या मूल्यांकन अहवालानुसार राज्यातील ९१ पाणलाेट क्षेत्र आणि १८ तालुके भूजलाच्या अतिउपशामुळे डार्क झाेनमध्ये आले आहेत. २०१७ च्या मूल्यांकनाच्या तुलनेत शाेषित तालुके व पानलाेट क्षेत्र घटले असले तरी गेल्या दशकभराचा ट्रेन्ड बघता अनिर्बंध उपशामुळे राज्यभरातील काही जिल्हे हळूहळू धाेक्याच्या स्थितीत जात आहेत.

राज्याच्या भूजल सर्वेक्षण विभागातर्फे दर दाेन वर्षांनी भूजल मूल्यांकन केले जाते. २०१९-२० चे भूजल मूल्यांकन नुकतेच पूर्ण करण्यात आले. या मूल्यांकनानुसार राज्यातील एकूण १५३५ पैकी ११५८ पाणलाेट हे सुरक्षित वर्गवारीत येणारे आहेत. २०१७च्या तुलनेत सुरक्षित क्षेत्र वाढले असले तरी पूर्वीच्या तुलनेत ते घटले आहे. ३७८ शाेषित वर्गवारीत माेडणारे आहेत. त्यातील २८७ अंशत: शाेषित, २८ शाेषित तर ६३ पाणलाेट अतिशाेषित म्हणजे ९१ पाणलाेट क्षेत्र डार्क झाेनमध्ये आले आहेत. चार पाणलाेट हे पाण्याच्या गुणवत्तेच्याबाबत बाधित असल्याचे आढळून आले आहे. याचप्रमाणे राज्यातील ३५३ तालुक्यांपैकी २७१ तालुके सुरक्षित वर्गवारीत आहेत. २००८ पासून सुरक्षित भूजलस्ती असलेल्या तालुक्यांची संख्या घटली आहे. ६३ तालुके अंशत: शाेषित, ८ शाेषित, तर १० तालुके अतिशाेषित वर्गवारीत माेडणारे आहेत. एक तालुका पाण्याच्या गुणवत्तेच्या दृष्टीने बाधित असल्याचे दिसून येत आहे. दशकभरात अतिउपसा हाेत असल्याने भूजलस्तर घटणाऱ्या तालुक्यांची संख्या वाढत चालली आहे.

पाणलोट क्षेत्राची वर्गवारी कशी ठरते?

- समजा १०० टक्के पाणी जमिनीत पुनर्भरण होऊन शिल्लक राहत असेल व त्यातून सिंचन पिण्याचे पाणी व कारखानदारी यासाठीचा उपसा ७० टक्के पर्यंत असेल तर त्या पाणलोटला सुरक्षित पाणलोट म्हटले जाते.

- ७० ते ९० टक्के उपसा असेल तर त्या पणलोटाला अंशतः शोषित म्हणतात.

- ९० ते १०० टक्क्यांपर्यंत उपसा असेल तर त्याला शोषित पाणलोट म्हणतात.

- १०० टक्क्यांच्यावर उपसा असेल तर त्याला अतिशोषित पाणलोट क्षेत्रात गणले जाते.

दशकभरात सुरक्षित भूजलस्तर क्षेत्र घटले (एकूण ३५३)

तालुकानिहाय वर्गवारी २००८ २०११ २०१३ २०१७ २०१९

सुरक्षित ३२३ ३२५ ३२४ २७१ २७१

अंशत: शाेषित १९ १६ १९ ६१ ६३

शाेषित २ २ १ ९ ८

अतिशाेषित ९ १० ९ ११ १०

पाणलाेट क्षेत्राची वर्गवारी (एकूण १५३५)

वर्गवारी २००८ २०११ २०१३ २०१७ २०१९

सुरक्षित १३३२ १३४७ १३३८ ११२७ ११५८

अंशत: शाेषित ११९ १०० १११ २९१ २८७

शाेषित ३ ४ ४ ४६ २८

अतिशाेषित ७३ ७६ ७४ ६७ ६३

डार्क झाेनमधील तालुके (नागपूर जिल्ह्यात संत्रा उत्पादक क्षेत्र)

नरखेड (नागपूर), वरुड, माेर्शी, अचलपूर, चांदूरबाजार (अमरावती), जळगाव जामाेद, संग्रामपूर (बुलडाणा), रावेर, यावल (जळगाव), पुरंदर, शिरुर (पुणे), कवठे महांकाळ (सांगली), माळशिरस (साेलापूर) यांच्यासह अहमदनगरचे राहता, राहुरी, संगमनेर, काेपरगाव, श्रीरामपूर, नाशिकचे देवळा, निफाड, सिन्नर आदी तालुक्यांमध्ये भूजलस्तराचा उपसा अधिक आहे.

भूजल मूल्यांकनामुळे भूजल विकासाची व व्यवस्थापनाची दिशा देणारे आहे. भूजलाच्या उपशावर कुठेतरी तांत्रिकदृष्ट्या नियमन व्हावे व घसरत चाललेली दुष्काळी गावांची संख्या व अनिर्बंध बोअरवेलद्वारे होणारा उपसा यावर गरज आहे तिथे नियंत्रण अथवा बंदी करण्याच्या दृष्टीने २००९ साली महाराष्ट्र शासनाने "महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम,२००९ पारित केला. या कायद्याची काटाेकाेर अंमलबजावणी आवश्यक आहे.

- सुनील कडू, वरिष्ठ भूवैज्ञानिक