शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
4
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
5
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
6
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
7
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
8
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
9
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
10
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
11
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
12
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
13
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
14
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
15
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
16
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
17
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

तीन वर्षांत १६४२ चेक बाऊन्स

By admin | Updated: April 28, 2015 02:27 IST

नागरिकांकडे थकीत असलेला मालमत्ता कर वसुलीसाठी एकीकडे महापालिका तगादा लावते तर दुसरीकडे नागरिकांनी

मनपाचे ४ कोटी अडले : ५१७ चेकची अद्याप वसुली नाहीनागपूर : नागरिकांकडे थकीत असलेला मालमत्ता कर वसुलीसाठी एकीकडे महापालिका तगादा लावते तर दुसरीकडे नागरिकांनी दिलेले चेक बाऊन्स होऊनही महापालिका शांत बसते, असे विरोधाभासी चित्र पहायला मिळत आहे. गेल्या तीन वर्षांत नागरिकांनी महापालिकेला दिलेले तब्बल १६४२ चेक बाऊन्स झाले आहेत. विशेष म्हणजे यापैकी ५१७ चेक आजवर वटवलेच गेले नाहीत व महापालिकेने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठीदेखील पुढाकार घेतलेला नाही.मालमत्ता कर विभागाला मिळालेल्या चेकपैकी जानेवारी २०१२ ते मार्च २०१५ दरम्यान ९ कोटी ५१ लाख रुपयांचे १६४२ चेक बाऊन्स झाले आहेत. यापैकी ११२५ चेक महापालिकेने निकाली काढले. ५१७ चेक अद्याप वठलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांकडे ३.९४ कोटी रुपये थकीत आहेत. २.४४ कोटी रुपयांचे दोन चेक बाऊन्स झाल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा विभागाचा दावा आहे. तर नगरसेवक अ‍ॅड. संजय बालपांडे यांनी विभाग चुकीची माहिती देत असल्याचा आरोप केला आहे. सोमवारी स्थायी समितीच्या सभेत बालपांडे यांनी संबंधित विषयाला वाचा फोडली. त्यांनी महापालिका सभागृहातही हा प्रश्न उचलला होता. बालपांडे म्हणाले, चेक बाऊन्सप्रकरणी निगोशिएबल इंस्ट्रूमेंट अ‍ॅक्टच्या कलम १३८ अंतर्गत नोटीस जारी करण्याचा अधिकार विभागाच्या सहायक अधीक्षकाला आहे. असे असताना सहायक कर निर्धारकाने नोटीस जारी केला आहे. चेक बाऊन्स प्रकरणात एकच नोटीस जारी करायला हवी. मात्र, तीन नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. अशा अनेक तांत्रिक कारणांमुळे चेक बाऊन्स प्रकरणे निकाली निघाली नसल्याचे त्यांनी सांगितले. विभागातील अधिकाऱ्यांनी याकडे वेळीच लक्ष दिले असते तर आज ही वेळ आली नसती, असा आरोप त्यांनी केला. मालमत्ता कराची नियमबाह्य ‘अ‍ॅडजेस्टमेंट’महापालिकेच्या कर विभागातील अधिकारी मनात येईल तसे कराचे ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ करीत असल्याचे प्रकरण बालपांडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मांडले. सुमारे २५ प्रकरणात तर नागरिकांनी कर कमी करण्याचा अर्ज केला नसतानाही त्यांचा कर कमी करून देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या तक्रारीची दखल घेत स्थायी समिती अध्यक्ष सिंगारे यांनी ५० हजाराहून अधिक एलएलव्ही (अ‍ॅन्युअल लेंटिंग व्हॅल्यू) असलेली सर्व प्रकरणे सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. वकिलांच्या पॅनलचा उपयोग काय ?बालपांडे म्हणाले, महापालिकेत तज्ज्ञ वकिलांचे मोठे पॅनेल आहे. मात्र, चेक बाऊन्स प्रकरणात महापालिकेच्या हाती काहीच लागले नसल्यामुळे या वकिलांचा उपयोग काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बऱ्याच प्रकरणात ते महापालिकेची बाजू कमजोर करतात, असा आरोपही त्यांनी केला. एलबीटी-जकातची ११७ प्रकरणे प्रलंबित जानेवारी २०१२ ते मार्च २०१५ दरम्यान एलबीटी व जकातीचे ३ कोटी ४ लाख रुपयांचे ७४९ चेक बाऊन्स झाले. यापैकी २ कोटी ६६ लाख रुपयांच्या ६३२ चेकची वसुली झाली. ३४ लाख रुपयांच्या ११७ चेकची अद्याप वसुली झालेली नाही.