शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

‘त्या’ १६ जि.प. सदस्यांचा परतीचा मार्ग कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

नागपूर : जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्दबातल ...

नागपूर : जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्दबातल केले होते त्यातील अनेकांचा पुन्हा परतण्याचा मार्ग अवघड आहे. महिला आरक्षणात काहींना फटका बसला असून, काहींच्या बाबतीत पक्ष पर्याय शोधण्याच्या मानसिकतेत आहे.

नागपूर जिल्हा परिषदेत ५८ सदस्य आहेत. यात ओबीसी वर्गातून १६ सदस्य निवडून आले होते. जिल्हा परिषदेतील आरक्षणाची टक्केवारी ५० च्या वर गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण अवैध ठरवीत सर्व सदस्यांचे सदस्यत्व रद्द करीत खुल्या प्रवर्गातून सर्व जागा भरल्याचे आदेश दिले. यात उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, विरोधी पक्षनेते अनिल निधान, राष्ट्रवादीचे गटनेते चंद्रशेखर कोल्हे, अवंतिका लेकुरवाळे, राजेंद्र हरडे, देवका बोडखे, पूनम जोध, समीर उमप, ज्योती शिरस्कर, अर्चना भोयर, कैलास राऊत, योगेश देशमुख, ज्योती राऊत, सुचिता ठाकरे, अर्चना गिरी, भोजराज ठवकर यांचा समावेश होता. या १६ जागांसाठी महिला आरक्षणाची सोडत काढली असता, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे व राष्ट्रवादीचे गटनेते चंद्रशेखर कोल्हे यांचे सर्कल महिलांसाठी आरक्षित झाले. त्यामुळे या दोघांचा परतीचा मार्ग अवघड आहे. त्याचबरोबर ज्या सर्कलमधून महिला सदस्य निवडून आल्या होत्या. असे दोन सर्कल सर्वसाधारण झाले आहे. यात भिष्णूर व गोधनी रेल्वे या सर्कलचा समावेश आहे. येथे महिलांना लढण्याची संधी आहे; पण येथून घरच्याच पुरुषाचा दावा केला जातोय.

त्याचबरोबर सदस्यत्व रद्द झालेल्या काही सदस्यांचा पत्ता पक्षातूनच कापण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी दावेदार वाढणार आहेत. काही सर्कलमध्ये माजी सदस्यांना विरोध होत आहे. त्यामुळे पक्षातील नेत्यांकडून त्यांना धोका आहे. सर्व जागा खुल्या झाल्याने काही ठिकाणचे राजकीय आणि सामाजिक समीकरण बदलले आहे. यामध्ये आदिवासी भागातील सर्कल आहे. येथे ओबीसी वगळता आदिवासी समाजातील उमेदवार देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- अनेकांना खर्चाची चिंता

दीड वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत ३० ते ६० लाखांपर्यंतच खर्च झाल्याचे सांगण्यात येते. आता पुन्हा कमी-जास्त प्रमाणात तेवढाच खर्च सदस्यांना करावा लागणार आहे. गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे अपेक्षित असे काहीही सदस्यांचे साध्य झाले नाही. त्यामुळे एवढा पैसा लावायचा कसा, त्यातही पराभव झाल्यास मोठा आर्थिक फटका बसेल, त्याही दृष्टिकोनातून उमेदवार विचार करीत आहेत.