शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

‘त्या’ १६ जि.प. सदस्यांचा परतीचा मार्ग कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

नागपूर : जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्दबातल ...

नागपूर : जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्दबातल केले होते त्यातील अनेकांचा पुन्हा परतण्याचा मार्ग अवघड आहे. महिला आरक्षणात काहींना फटका बसला असून, काहींच्या बाबतीत पक्ष पर्याय शोधण्याच्या मानसिकतेत आहे.

नागपूर जिल्हा परिषदेत ५८ सदस्य आहेत. यात ओबीसी वर्गातून १६ सदस्य निवडून आले होते. जिल्हा परिषदेतील आरक्षणाची टक्केवारी ५० च्या वर गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण अवैध ठरवीत सर्व सदस्यांचे सदस्यत्व रद्द करीत खुल्या प्रवर्गातून सर्व जागा भरल्याचे आदेश दिले. यात उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, विरोधी पक्षनेते अनिल निधान, राष्ट्रवादीचे गटनेते चंद्रशेखर कोल्हे, अवंतिका लेकुरवाळे, राजेंद्र हरडे, देवका बोडखे, पूनम जोध, समीर उमप, ज्योती शिरस्कर, अर्चना भोयर, कैलास राऊत, योगेश देशमुख, ज्योती राऊत, सुचिता ठाकरे, अर्चना गिरी, भोजराज ठवकर यांचा समावेश होता. या १६ जागांसाठी महिला आरक्षणाची सोडत काढली असता, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे व राष्ट्रवादीचे गटनेते चंद्रशेखर कोल्हे यांचे सर्कल महिलांसाठी आरक्षित झाले. त्यामुळे या दोघांचा परतीचा मार्ग अवघड आहे. त्याचबरोबर ज्या सर्कलमधून महिला सदस्य निवडून आल्या होत्या. असे दोन सर्कल सर्वसाधारण झाले आहे. यात भिष्णूर व गोधनी रेल्वे या सर्कलचा समावेश आहे. येथे महिलांना लढण्याची संधी आहे; पण येथून घरच्याच पुरुषाचा दावा केला जातोय.

त्याचबरोबर सदस्यत्व रद्द झालेल्या काही सदस्यांचा पत्ता पक्षातूनच कापण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी दावेदार वाढणार आहेत. काही सर्कलमध्ये माजी सदस्यांना विरोध होत आहे. त्यामुळे पक्षातील नेत्यांकडून त्यांना धोका आहे. सर्व जागा खुल्या झाल्याने काही ठिकाणचे राजकीय आणि सामाजिक समीकरण बदलले आहे. यामध्ये आदिवासी भागातील सर्कल आहे. येथे ओबीसी वगळता आदिवासी समाजातील उमेदवार देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- अनेकांना खर्चाची चिंता

दीड वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत ३० ते ६० लाखांपर्यंतच खर्च झाल्याचे सांगण्यात येते. आता पुन्हा कमी-जास्त प्रमाणात तेवढाच खर्च सदस्यांना करावा लागणार आहे. गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे अपेक्षित असे काहीही सदस्यांचे साध्य झाले नाही. त्यामुळे एवढा पैसा लावायचा कसा, त्यातही पराभव झाल्यास मोठा आर्थिक फटका बसेल, त्याही दृष्टिकोनातून उमेदवार विचार करीत आहेत.