शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
5
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
6
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
7
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
8
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
9
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
10
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
11
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
13
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
14
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
15
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
16
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
17
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
18
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
19
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
20
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

‘त्या’ १६ जि.प. सदस्यांचा परतीचा मार्ग कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

नागपूर : जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्दबातल ...

नागपूर : जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्दबातल केले होते त्यातील अनेकांचा पुन्हा परतण्याचा मार्ग अवघड आहे. महिला आरक्षणात काहींना फटका बसला असून, काहींच्या बाबतीत पक्ष पर्याय शोधण्याच्या मानसिकतेत आहे.

नागपूर जिल्हा परिषदेत ५८ सदस्य आहेत. यात ओबीसी वर्गातून १६ सदस्य निवडून आले होते. जिल्हा परिषदेतील आरक्षणाची टक्केवारी ५० च्या वर गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण अवैध ठरवीत सर्व सदस्यांचे सदस्यत्व रद्द करीत खुल्या प्रवर्गातून सर्व जागा भरल्याचे आदेश दिले. यात उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, विरोधी पक्षनेते अनिल निधान, राष्ट्रवादीचे गटनेते चंद्रशेखर कोल्हे, अवंतिका लेकुरवाळे, राजेंद्र हरडे, देवका बोडखे, पूनम जोध, समीर उमप, ज्योती शिरस्कर, अर्चना भोयर, कैलास राऊत, योगेश देशमुख, ज्योती राऊत, सुचिता ठाकरे, अर्चना गिरी, भोजराज ठवकर यांचा समावेश होता. या १६ जागांसाठी महिला आरक्षणाची सोडत काढली असता, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे व राष्ट्रवादीचे गटनेते चंद्रशेखर कोल्हे यांचे सर्कल महिलांसाठी आरक्षित झाले. त्यामुळे या दोघांचा परतीचा मार्ग अवघड आहे. त्याचबरोबर ज्या सर्कलमधून महिला सदस्य निवडून आल्या होत्या. असे दोन सर्कल सर्वसाधारण झाले आहे. यात भिष्णूर व गोधनी रेल्वे या सर्कलचा समावेश आहे. येथे महिलांना लढण्याची संधी आहे; पण येथून घरच्याच पुरुषाचा दावा केला जातोय.

त्याचबरोबर सदस्यत्व रद्द झालेल्या काही सदस्यांचा पत्ता पक्षातूनच कापण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी दावेदार वाढणार आहेत. काही सर्कलमध्ये माजी सदस्यांना विरोध होत आहे. त्यामुळे पक्षातील नेत्यांकडून त्यांना धोका आहे. सर्व जागा खुल्या झाल्याने काही ठिकाणचे राजकीय आणि सामाजिक समीकरण बदलले आहे. यामध्ये आदिवासी भागातील सर्कल आहे. येथे ओबीसी वगळता आदिवासी समाजातील उमेदवार देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- अनेकांना खर्चाची चिंता

दीड वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत ३० ते ६० लाखांपर्यंतच खर्च झाल्याचे सांगण्यात येते. आता पुन्हा कमी-जास्त प्रमाणात तेवढाच खर्च सदस्यांना करावा लागणार आहे. गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे अपेक्षित असे काहीही सदस्यांचे साध्य झाले नाही. त्यामुळे एवढा पैसा लावायचा कसा, त्यातही पराभव झाल्यास मोठा आर्थिक फटका बसेल, त्याही दृष्टिकोनातून उमेदवार विचार करीत आहेत.