शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

नागपूर विभागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे १,५६३ नमुने फ्लोराईडबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 20:47 IST

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये घेण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांपैकी १ हजार ५६३ नमुने फ्लोराईडयुक्त आढळले आहेत.

ठळक मुद्देनागपूर, चंद्रपुरात प्रमाण सर्वाधिकजलस्वराज प्रकल्पात उपाययोजनांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये घेण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांपैकी १ हजार ५६३ नमुने फ्लोराईडयुक्त आढळले आहेत. विदर्भात सर्वाधिक प्रमाण नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात असून जलस्वराज प्रकल्पाच्या माध्यमातून यावर उपाययोजना केली जात आहे.भूगर्भामध्ये रूपांतरित खडकांचे प्रमाण अधिक असलेल्या भागांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागामध्ये असे फ्लोराईडयुक्त पाणी आहारात वापरण्यात आल्याने हाडे ठिसूळ होणे, दात पिवळे पडणे, पाय वाकडे होणे असे प्रकार आढळायला लागले होते. त्यामुळे शासनाने २००२ पासून जलस्वराज प्रकल्पाच्या माध्यमातून अशा गावांची निवड करून उपाययोजना केल्या होत्या. जलस्वराज प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर २०१६ पासून दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या अंतर्गत २०२० पर्यंत संबंधित गावांमध्ये उपाययोजना केल्या जाणार आहेत.गावांमध्ये असलेल्या विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी गावाच्या जलसुरक्षकाकडून नमुने गोळा केले जातात. त्याची तपासणी उपविभागीय, जिल्हास्तर आणि विभागीय प्रयोगशाळामंमध्ये केली जाते. नागपूर विभागात विभागस्तरावर एक प्रयोगशाळा असून जिल्हास्तरावर ५ आणि उपविभाग स्तरावर २५ प्रयोगशाळा आहेत. याचे सनियंत्रण उपविभागीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी नियंत्रण व गुणवत्ता अधिकाऱ्यांकडे असते. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडे हे एक पद निमाण करण्यात आले आहे. गावातील विहिरींच्या किंवा बोअरवेलच्या पाण्यामध्ये १.५ मिलिग्रॅम प्रति लिटर फ्लोराईड आढळल्यास ते पाणी पिण्यास अयोग्य ठरविले जाते. असे १ हजार ५६३ नमुने जुलै महिन्याअखेरच्या तपासणीमध्ये फ्लोराईडयुक्त आढळले आहेत.

यापूर्वी झालेल्या उपाययोजनांमध्ये जलस्वराज प्रकल्प-एकच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यात सावनेर, काटोल, पारशिवनी तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात डोंगरगाव येथे डी फ्लोरिडेशन युनिट लावण्यात आले आहेत.नागपूर विभागामध्ये नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. संबंधित गावांमधील पाण्याचे नमुने गोळा करून आलेल्या अहवालानंतर उपविभागीय सनियंत्रकांकडून त्यावर उपायोजना केल्या जातात. जलस्वराज प्रकल्पात याचा समावेश असून त्या माध्यमातून उपायोजना सुरू आहेत.- डॉ. शिवाजी पदमने,प्रभारी उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा

 

टॅग्स :Waterपाणी