शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

३५०० मान्यवरांच्या साक्षीने १५१ वर्षे पूर्णत्व सोहळा

By admin | Updated: September 14, 2015 03:12 IST

महापालिकेत येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत तुळशीचे रोप देऊ न केले जाते. या प्रथेनुसार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचेही स्वागत तुळशीचे रोप देऊ न केले जाणार आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव ग्रंथाचे प्रकाशन : तुळशीचे रोप देऊ न स्वागत नागपूर : महापालिकेत येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत तुळशीचे रोप देऊ न केले जाते. या प्रथेनुसार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचेही स्वागत तुळशीचे रोप देऊ न केले जाणार आहे. मनपाच्या १५१ व्या स्थापना वर्षानिमित्त आयोजित समारंभात ३५०० लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रोटोकॉलनुसार व्यासपीठावर सात मान्यवर उपस्थित राहतील. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते मनपाच्या १५१ वर्षांच्या इतिहासावर आधारित गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येईल, अशी माहिती महापौर प्रवीण दटके यांनी पत्रकार परिषदेत दिली.सायंकाळी ६.३० वाजता हा सोहळा होईल. दटके यांनी रविवारी मानकापूर क्रीडा संकुलातील तयारीचा आढावा घेतला. यावेळी उपमहापौर मुन्ना पोकुलवार, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांच्यासह मनपाचे अधिकारी उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणामुळे व्यासपीठापासून ४५ मीटर जागा मोकळी सोडण्यात आली आहे. राष्ट्रपतींचे स्वागत कुंडीत लावलेल्या तुळशीने केले जाणार आहे, तसेच स्मृतिचिन्ह देऊ न त्यांचा सत्कार करण्यात येईल. व्यासपीठावर राष्ट्रपती यांच्या डाव्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर प्रवीण दटके, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर तर उजव्या बाजूला राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकु ळे यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गौरव गं्रथात प्रामुख्याने अविस्मरणीय चित्रावर भर देण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी शहरातील आमदार, खासदार, अधिकारी, पदाधिकारी, न्यायाधीश, विविध संस्थांचे प्रमुख आदींना निमंत्रित करण्यात आले आहे; तसेच स्वातंत्र्य सैनिक, अर्जुन पुरस्कारप्राप्त मान्यवरांनाही निमंत्रित केले आहे. (प्रतिनिधी)