शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

‘आधार’च्या अटीमुळे १५० उमेदवारांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 9:20 PM

राज्य शासनाच्या वित्त विभागातर्फे लिपिक पदासाठी आयोजित परीक्षेपासून दीडशेहून अधिक उमेदवार वंचित राहिले. या उमेदवारांनी ‘स्मार्ट’ आधार ‘कार्ड’ आणले होते. तर अधिकारी मात्र पोस्टाद्वारे पाठविलेल्या ‘कार्ड’ची मागणी करत होते. नियमांचा हवाला देत अधिकाऱ्यांनी उमेदवारांना दिलासा देण्यास नकार दिला. परिणामी बाहेरगावाहून आलेल्या उमेदवारांना परतावे लागले.

ठळक मुद्देवित्त विभागाच्या पदभरती परीक्षेपासून मुकले : पोस्टाद्वारे पाठविलेल्या ‘कार्ड’ऐवजी आणले ‘स्मार्ट कार्ड’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या वित्त विभागातर्फे लिपिक पदासाठी आयोजित परीक्षेपासून दीडशेहून अधिक उमेदवार वंचित राहिले. या उमेदवारांनी ‘स्मार्ट’ आधार ‘कार्ड’ आणले होते. तर अधिकारी मात्र पोस्टाद्वारे पाठविलेल्या ‘कार्ड’ची मागणी करत होते. नियमांचा हवाला देत अधिकाऱ्यांनी उमेदवारांना दिलासा देण्यास नकार दिला. परिणामी बाहेरगावाहून आलेल्या उमेदवारांना परतावे लागले.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी वित्त विभागातर्फे अकाऊंट्स लिपिकपदाची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सकाळच्या सत्रात केंद्रात ८०० उमेदवारांना बोलविण्यात आले होते. परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी सरकारकडून एका खासगी कंपनीला देण्यात आली आहे. उमेदवार दिलेल्या वेळेत जी.एच.रायसोनी स्कूल आॅफ बिझनेस मॅनेजमेन्ट येथील परीक्षा केंद्रावर पोहोचले. केंद्रात प्रवेश देण्याअगोदर उमेदवारांच्या ई-प्रवेशपत्रांची तपासणी करण्यात आली. सोबतच त्यांच्याकडे मूळ ओळखपत्रदेखील मागण्यात आले. दीडशेहून अधिक उमेदवारांकडे ‘स्मार्ट’ आधार ‘कार्ड’ होते. या उमेदवारांना पोस्टाद्वारे पाठविण्यात आलेले आधार ‘कार्ड’ दाखविण्यास सांगण्यात आले. ‘स्मार्ट’ आधार ‘कार्ड’वर प्रवेश नाकारण्यात आला. उमेदवारांनी अनेकदा विनंती केली. मात्र त्याला यश आले नाही. उमेदवारांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना कुणीच प्रतिसाद दिला नाही.प्रवेशपत्रावर स्पष्ट सूचनायासंबंधात परीक्षेचे आयोजन करणाऱ्या ‘एजन्सी’चे अधिकारी हकीमुद्दीन काजी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. विद्यार्थ्यांना पाठविण्यात आलेल्या प्रवेशपत्रात स्पष्ट निर्देश आहेत. शिवाय त्यात ओळखपत्र म्हणून कोणती कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील याची यादीदेखील देण्यात आली आहे. ‘स्मार्ट कार्ड’देखील ‘ई’आधार ‘कार्ड’ प्रमाणेच आहे. विभागातर्फे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना प्रवेश नाकारण्यात आला. परीक्षा न देणाऱ्या उमेदवारांची संख्या ५० हून कमी होती, असा दावा त्यांनी केला.‘ई’ प्रवेशपत्र मान्य, मग ‘स्मार्ट कार्ड’ का नाही ?या परीक्षेसाठी ‘ई’ प्रवेशपत्र जारी करण्यात आले होते. जर परीक्षा केंद्रावर ‘ई’प्रवेशपत्र वैध मानण्यात आले, तर मग ‘ई’ आधार वा ‘स्मार्ट कार्ड’ला ग्राह्य का धरण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अर्ज करताना ‘ऑनलाईन’ जमा केलेले छायाचित्र ‘ई’ प्रवेशपत्रावर लावायचे होते. जर उमेदवारांच्या ओळखीसंदर्भात काही शंका आली तर ‘ऑनलाईन’ तपासणीचा पर्याय होता. मात्र असे काहीही न करता अधिकाऱ्यांनी उमेदवारांना थेट बाहेरचा रस्ता दाखविला.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डexamपरीक्षा