शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

‘आधार’च्या अटीमुळे १५० उमेदवारांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 21:21 IST

राज्य शासनाच्या वित्त विभागातर्फे लिपिक पदासाठी आयोजित परीक्षेपासून दीडशेहून अधिक उमेदवार वंचित राहिले. या उमेदवारांनी ‘स्मार्ट’ आधार ‘कार्ड’ आणले होते. तर अधिकारी मात्र पोस्टाद्वारे पाठविलेल्या ‘कार्ड’ची मागणी करत होते. नियमांचा हवाला देत अधिकाऱ्यांनी उमेदवारांना दिलासा देण्यास नकार दिला. परिणामी बाहेरगावाहून आलेल्या उमेदवारांना परतावे लागले.

ठळक मुद्देवित्त विभागाच्या पदभरती परीक्षेपासून मुकले : पोस्टाद्वारे पाठविलेल्या ‘कार्ड’ऐवजी आणले ‘स्मार्ट कार्ड’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या वित्त विभागातर्फे लिपिक पदासाठी आयोजित परीक्षेपासून दीडशेहून अधिक उमेदवार वंचित राहिले. या उमेदवारांनी ‘स्मार्ट’ आधार ‘कार्ड’ आणले होते. तर अधिकारी मात्र पोस्टाद्वारे पाठविलेल्या ‘कार्ड’ची मागणी करत होते. नियमांचा हवाला देत अधिकाऱ्यांनी उमेदवारांना दिलासा देण्यास नकार दिला. परिणामी बाहेरगावाहून आलेल्या उमेदवारांना परतावे लागले.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी वित्त विभागातर्फे अकाऊंट्स लिपिकपदाची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सकाळच्या सत्रात केंद्रात ८०० उमेदवारांना बोलविण्यात आले होते. परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी सरकारकडून एका खासगी कंपनीला देण्यात आली आहे. उमेदवार दिलेल्या वेळेत जी.एच.रायसोनी स्कूल आॅफ बिझनेस मॅनेजमेन्ट येथील परीक्षा केंद्रावर पोहोचले. केंद्रात प्रवेश देण्याअगोदर उमेदवारांच्या ई-प्रवेशपत्रांची तपासणी करण्यात आली. सोबतच त्यांच्याकडे मूळ ओळखपत्रदेखील मागण्यात आले. दीडशेहून अधिक उमेदवारांकडे ‘स्मार्ट’ आधार ‘कार्ड’ होते. या उमेदवारांना पोस्टाद्वारे पाठविण्यात आलेले आधार ‘कार्ड’ दाखविण्यास सांगण्यात आले. ‘स्मार्ट’ आधार ‘कार्ड’वर प्रवेश नाकारण्यात आला. उमेदवारांनी अनेकदा विनंती केली. मात्र त्याला यश आले नाही. उमेदवारांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना कुणीच प्रतिसाद दिला नाही.प्रवेशपत्रावर स्पष्ट सूचनायासंबंधात परीक्षेचे आयोजन करणाऱ्या ‘एजन्सी’चे अधिकारी हकीमुद्दीन काजी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. विद्यार्थ्यांना पाठविण्यात आलेल्या प्रवेशपत्रात स्पष्ट निर्देश आहेत. शिवाय त्यात ओळखपत्र म्हणून कोणती कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील याची यादीदेखील देण्यात आली आहे. ‘स्मार्ट कार्ड’देखील ‘ई’आधार ‘कार्ड’ प्रमाणेच आहे. विभागातर्फे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना प्रवेश नाकारण्यात आला. परीक्षा न देणाऱ्या उमेदवारांची संख्या ५० हून कमी होती, असा दावा त्यांनी केला.‘ई’ प्रवेशपत्र मान्य, मग ‘स्मार्ट कार्ड’ का नाही ?या परीक्षेसाठी ‘ई’ प्रवेशपत्र जारी करण्यात आले होते. जर परीक्षा केंद्रावर ‘ई’प्रवेशपत्र वैध मानण्यात आले, तर मग ‘ई’ आधार वा ‘स्मार्ट कार्ड’ला ग्राह्य का धरण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अर्ज करताना ‘ऑनलाईन’ जमा केलेले छायाचित्र ‘ई’ प्रवेशपत्रावर लावायचे होते. जर उमेदवारांच्या ओळखीसंदर्भात काही शंका आली तर ‘ऑनलाईन’ तपासणीचा पर्याय होता. मात्र असे काहीही न करता अधिकाऱ्यांनी उमेदवारांना थेट बाहेरचा रस्ता दाखविला.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डexamपरीक्षा