शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नागपूर मनपाच्या १५ शाळा बंद; समायोजन धोरणाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 11:50 IST

Nagpur Municipal Corporation नागपूर मनपाच्या १५ शाळा बंद पडणार असून ७० हून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत.

ठळक मुद्दे७० शिक्षक अतिरिक्त ठरणार

गणेश हूडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका शाळांतील पटसंख्या वाढावी, शिक्षणाचा दर्जा उंचवावा, यासाठी सभागृहात १०० पटाच्या शाळांना मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजाणी करण्याचे आदेश महापौर संदीप जोशी यांनी दिले होते. परंतु शिक्षण विभागाने सभागृहाचा निर्णय व महापौरांचे आदेश धाब्यावर बसवून शाळा समायोजनाचा निर्णय घेतला आहे. यामुळे या तुघलकी निर्णयामुळे मनपाच्या १५ शाळा बंद पडणार असून ७० हून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत.मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी प्रशासकीय सोयीचे कारण देत शाळा समायोजनाचे आदेश काढले आहेत. त्यानुसार २५ शाळा १० शाळांत समायोजित केल्या जात आहे. संजयनगर येथे मनपाच्या सहा शाळा आहेत. यातील चार शाळा दोन शाळात समायोजित करण्यात आल्या . विशेष म्हणजे अधिक पटसंख्या असलेल्या शाळेत कमी पटसंख्या असलेल्या शाळा समायोजित न करता कमी पटसंख्या असलेल्या शाळेत २१८ पटसंख्या असलेली संजय नगर हिंदी प्राथमिक शाळा-२ समायोजित करण्यात आली आहे. कुंदनलाल गुप्ता नगर येथील चार शाळा एका शाळेत समायोजित करण्यात आल्या. समायोजनात २०० पटाची एक तर १००पटाच्या चार यासह अन्य शाळांचा समावेश आहे.पुन्हा काही शाळा बंद पडणारशहरातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी शाळांचा दर्जा उंचावून पट वाढविण्याने नियोजन न करता शाळा समायोजनाचा निर्णय घेतला आहे. मनपाच्या १२२ प्राथमिक शाळा आहेत. समायोजनामुळे ही संख्या १०७ पर्यंत खाली आली आहे. भविष्यात पुन्हा काही शाळा बंद पडणार आहेत. अशा परिस्थितीत स्लम भागातील गरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क हिरावला जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.महापौरांचे आदेश धाब्यावरआर.टी.ई. धोरणानुसार मनपा शाळांवर मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश महापौर संदीप जोशी यांनी शिक्षण विभागाला दिले होते. सभागृहातही याबाबत निर्णय घेण्यात आला. परंतु हा आदेश धाब्यावर बसवून शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा समायोजनाचे आदेश काढले आहेत.

 

टॅग्स :SchoolशाळाNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका