शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आजारपणामुळे १५ टक्के पोलीस सुटीवर

By admin | Updated: May 20, 2014 01:01 IST

निवडणूक ‘ड्युटी’ संपली आणि बदली होण्याची वेळ आल्याने पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. शहर पोलीस विभागातील तब्बल

आजारपणाचे खोटे कारण : नियमांची अवहेलना

जगदीश जोशी - नागपूर

निवडणूक ‘ड्युटी’ संपली आणि बदली होण्याची वेळ आल्याने पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. शहर पोलीस विभागातील तब्बल १५ टक्के कर्मचारी सध्या आजारपणामुळे सुटीवर आहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या आजारपणाच्या खोटारडेपणाची सर्वांनाच कल्पना आहे. परंतु कडक अनुशासित समजल्या जाणार्‍या पोलीस विभागामध्येच नियमांची अवहेलना होत असल्याची बाब धोकादायक आहे. निवडणुकीदरम्यान पोलिसांवर सर्वाधिक दडपण होते. यादरम्यान अनेकदा सुट्यासुद्धा रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच दरवर्षी मे ते जूनदरम्यान वार्षिक बदली करण्यात येते. परंतु निवडणुकीमुळे यंदा बदल्यांची प्रक्रिया मंद गतीने झाली. पूर्वी एका ठाण्यात ६ वर्षे आणि एक झोनमध्ये १२ वर्षे पूर्ण करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍याची बदली केली जात होती. या नियमामध्ये बदल करून एका ठाण्यात दोन वर्षे आणि एका झोनमध्ये चार वर्षे पूर्ण करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍याची बदली केली जात आहे. शहर पोलीस अधिकार्‍यांमध्ये नागपूरबाहेरच्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ते येथून बाहेर पडण्याची वाट पाहत आहेत. बदलीसाठी ‘जुगाड तंत्र’चा प्रभाव असतो. या उद्देशाने अधिकारी आणि कर्मचारी आजारी सुट्यांचा वापर करीत आहेत. आजारी सुटीवर जाण्यासाठी अधिकारी-कर्मचार्‍यांसाठी वेगवेगळी प्रक्रिया आहे. उपनिरीक्षक आणि त्यापेक्षा ज्येष्ठ अधिकारी स्टेशन डायरीमध्ये आजारी असल्याचा उल्लेख करून सुटीवर जातात. शिपायी ते सहायक उपनिरीक्षक दर्जाचे कर्मचारी आजारी सुटीसाठी अर्ज करून उपचारासाठी सुटीवर जातात. वैद्यकीय अधिकार्‍याने केलेल्या शिफारशीच्या आधारावर त्यांना ‘सिक मेमो’ दिला जातो. डॉक्टरतर्फे रुग्णालयात भरती होण्याची शिफारस केल्यास कर्मचार्‍यास पूर्ण सुटी दिली जाते. घरी राहताना उपचाराची शिफारस केली असता कर्मचार्‍याला घराजवळील पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक आहे. परंतु अनेक वर्षांपासून कुणीच या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. याच वर्षी २० दिवसांपेक्षा अधिक आजारी रजेवर असल्याबाबत संबंधित अधिकारी-कर्मचार्‍याला वेतन न देण्याचाही नियम आहे. सूत्रानुसार हा नियम केवळ सामान्य कर्मचार्‍यांनाच लागू केला जातो. अधिकारी आणि त्यांचे मर्जीतील कर्मचार्‍यांना हा नियम लागू केला जात नाही. आजारी रजेवर असल्याचा बहाणा शोधणार्‍या कर्मचार्‍यांची सुद्धा त्यांची स्वत:ची मजबुरी आहे. ठाणेदार ‘महिन्याचा चंदा’ देणार्‍या कर्मचार्‍यांचे रजेचे अर्ज तातडीने स्वीकार करतात. त्यामुळे इतर दुसर्‍या कर्मचार्‍यांना सुटी मिळत नाही. त्यामुळे त्यांना आजारपणाचे खोटे कारण सांगावे लागते. रजा देण्याबाबत अधिकारी हे दुजेपणाचा व्यवहार करीत असल्याने सदर ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या प्रमाणात संतप्त असल्याचे सांगितले जाते.