शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळळा, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

आजारपणामुळे १५ टक्के पोलीस सुटीवर

By admin | Updated: May 20, 2014 01:01 IST

निवडणूक ‘ड्युटी’ संपली आणि बदली होण्याची वेळ आल्याने पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. शहर पोलीस विभागातील तब्बल

आजारपणाचे खोटे कारण : नियमांची अवहेलना

जगदीश जोशी - नागपूर

निवडणूक ‘ड्युटी’ संपली आणि बदली होण्याची वेळ आल्याने पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. शहर पोलीस विभागातील तब्बल १५ टक्के कर्मचारी सध्या आजारपणामुळे सुटीवर आहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या आजारपणाच्या खोटारडेपणाची सर्वांनाच कल्पना आहे. परंतु कडक अनुशासित समजल्या जाणार्‍या पोलीस विभागामध्येच नियमांची अवहेलना होत असल्याची बाब धोकादायक आहे. निवडणुकीदरम्यान पोलिसांवर सर्वाधिक दडपण होते. यादरम्यान अनेकदा सुट्यासुद्धा रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच दरवर्षी मे ते जूनदरम्यान वार्षिक बदली करण्यात येते. परंतु निवडणुकीमुळे यंदा बदल्यांची प्रक्रिया मंद गतीने झाली. पूर्वी एका ठाण्यात ६ वर्षे आणि एक झोनमध्ये १२ वर्षे पूर्ण करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍याची बदली केली जात होती. या नियमामध्ये बदल करून एका ठाण्यात दोन वर्षे आणि एका झोनमध्ये चार वर्षे पूर्ण करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍याची बदली केली जात आहे. शहर पोलीस अधिकार्‍यांमध्ये नागपूरबाहेरच्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ते येथून बाहेर पडण्याची वाट पाहत आहेत. बदलीसाठी ‘जुगाड तंत्र’चा प्रभाव असतो. या उद्देशाने अधिकारी आणि कर्मचारी आजारी सुट्यांचा वापर करीत आहेत. आजारी सुटीवर जाण्यासाठी अधिकारी-कर्मचार्‍यांसाठी वेगवेगळी प्रक्रिया आहे. उपनिरीक्षक आणि त्यापेक्षा ज्येष्ठ अधिकारी स्टेशन डायरीमध्ये आजारी असल्याचा उल्लेख करून सुटीवर जातात. शिपायी ते सहायक उपनिरीक्षक दर्जाचे कर्मचारी आजारी सुटीसाठी अर्ज करून उपचारासाठी सुटीवर जातात. वैद्यकीय अधिकार्‍याने केलेल्या शिफारशीच्या आधारावर त्यांना ‘सिक मेमो’ दिला जातो. डॉक्टरतर्फे रुग्णालयात भरती होण्याची शिफारस केल्यास कर्मचार्‍यास पूर्ण सुटी दिली जाते. घरी राहताना उपचाराची शिफारस केली असता कर्मचार्‍याला घराजवळील पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक आहे. परंतु अनेक वर्षांपासून कुणीच या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. याच वर्षी २० दिवसांपेक्षा अधिक आजारी रजेवर असल्याबाबत संबंधित अधिकारी-कर्मचार्‍याला वेतन न देण्याचाही नियम आहे. सूत्रानुसार हा नियम केवळ सामान्य कर्मचार्‍यांनाच लागू केला जातो. अधिकारी आणि त्यांचे मर्जीतील कर्मचार्‍यांना हा नियम लागू केला जात नाही. आजारी रजेवर असल्याचा बहाणा शोधणार्‍या कर्मचार्‍यांची सुद्धा त्यांची स्वत:ची मजबुरी आहे. ठाणेदार ‘महिन्याचा चंदा’ देणार्‍या कर्मचार्‍यांचे रजेचे अर्ज तातडीने स्वीकार करतात. त्यामुळे इतर दुसर्‍या कर्मचार्‍यांना सुटी मिळत नाही. त्यामुळे त्यांना आजारपणाचे खोटे कारण सांगावे लागते. रजा देण्याबाबत अधिकारी हे दुजेपणाचा व्यवहार करीत असल्याने सदर ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या प्रमाणात संतप्त असल्याचे सांगितले जाते.