शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

गणवेश आणि स्टेशनरीच्या किमतीमध्ये १५ टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 12:05 IST

राज्य आणि केंद्रीय बोर्डाच्या शाळांचे वर्ग २४ जूनपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे पालकांची पोशाख, स्टेशनरी वस्तू, शालेय बॅग आणि अन्य वस्तू खरेदीसाठी लगबग वाढली आहे.

ठळक मुद्देपालकांचे बजेट बिघडले शुल्कवाढीसह अन्य वस्तूंच्या दरवाढीचा भार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य आणि केंद्रीय बोर्डाच्या शाळांचे वर्ग २४ जूनपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे पालकांची पोशाख, स्टेशनरी वस्तू, शालेय बॅग आणि अन्य वस्तू खरेदीसाठी लगबग वाढली आहे. नागपुरातील बहुतांश शाळांचे गणवेश ठराविक दुकानातून जास्त भावातच खरेदी करावे लागतात. गेल्यावर्षी जीएसटीच्या आकारणीमुळे भाव वाढले होते. यावर्षी कापड आणि कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे गणवेश, स्टेशनरी वस्तू आणि शालेय बॅगच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. शाळेच्या फीवाढीसह अन्य वस्तूंच्या दरवाढीचा अनावश्यक भार पालकांना सोसावा लागत आहे.

टिफिन, वॉटरबॅग महागल्याशाहू स्टेशनरीचे वसंत शाहू यांनी सांगितले की, महागाईचा परिणाम स्टेशनरी मार्केटवर पडला आहे. स्टेशनरीमध्ये ब्रॅण्डेड साहित्यांचे दर वाढले आहेत. कार्टुनच्या साहित्याला विद्यार्थ्यांकडून जास्त मागणी आहे. विद्यार्थ्यांना टिफिन आणि वॉटरबॅग दरवर्षी नवीन हवी असते. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार दरवर्षी नवीन स्टॉक बोलवावा लागतो. थ्रीडी चित्रे असलेल्या साहित्याची बाजारात रेलचेल आहे. यंदा शालेय साहित्यामध्ये १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे.

छोट्या-छोट्या गोष्टींसाठी लागतात पैसेयावर्षी राज्यांसह केंद्रीय शाळांच्या फी शुल्कात १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. केंद्रीय शाळांमध्ये तीन महिन्याचे चार हप्ते पाडून फी वसूल करण्यात येते. एकीकडे फी शुल्कात झालेली वाढ आणि दुसरीकडे शालेय साहित्याचे दर वाढल्यामुळे सामान्य पालकांच्या महिन्याच्या बजेटवर ताण आला आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. वस्तूंच्या खरेदीसाठी दुप्पट पैसे खर्च करावे लागत असल्याचे इतवारीत पोशाख खरेदीसाठी आलेले देवेंद्र सदावर्ते यांनी सांगितले. फी शुल्कावर नियंत्रण आणण्याची मागणी आहे.

पालकांना करावी लागते खर्चात कपातजून महिन्यात पालकांना पाल्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खर्चामध्ये कपात करावी लागते. वह्या-पुस्तके, पेन्सिलपासून प्रत्येक स्टेशनरी साहित्याचे भाव वाढले आहेत. गेम, कॅलक्युलेटर, कॉम्युटर, टेडिबेअर अशा मुलांच्या आवडत्या आकारातील कम्पॉस बॉक्स उपलब्ध करून देण्यात आल्याचे इतवारीतील स्टेशनरी व्यापारी आहुजा यांनी सांगितले. कम्पॉक्स बॉक्स ५० ते २०० रुपयांपर्यंत आहे. याशिवाय एअरटाईट लंच बॉक्सची मागणी वाढली आहे. वॉटरबॅगही विविध आकारात आणि रंगात व डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत. शाळेच्या वेळेत पाणी थंड राहावे म्हणून एक लिटरच्या थर्मास बॉटलला जास्त मागणी आहे. नामांकित कंपन्यांच्या बॉटल ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

टॅग्स :Schoolशाळा