शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

१५ दिवसांत बोंडअळीग्रस्त पिकांचे पंचनामे होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 19:51 IST

राज्यात कापूस पिकाखाली ४१ लाख हेक्टरचे क्षेत्र असून विदर्भात अनेक ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यासंदर्भात पिकांचे पंचनामे सुरू झाले असून १५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली.

ठळक मुद्देकृषी राज्यमंत्र्यांचे आश्वासनअर्ज देताना बियाण्यांचे ‘रॅपर’ लावणे अनिवार्य नाही

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यात कापूस पिकाखाली ४१ लाख हेक्टरचे क्षेत्र असून विदर्भात अनेक ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यासंदर्भात पिकांचे पंचनामे सुरू झाले असून १५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भातील मुद्दा अमरसिंह पंडित, सतीश चव्हाण, धनंजय मुंडे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मांडला.बोंडअळीचे संकट हे मानवनिर्मित आहे.शेतकऱ्यांचे यंदा यामुळे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले असून त्यांना एकरी २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. सोबतच अर्ज करताना बियाण्यांच्या पाकिटावरील ‘रॅपर’देखील सादर करण्याची अट रद्द करणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.याला उत्तर देताना खोत यांनी आतापर्यंत शासनाकडे पाच लाख तक्रार अर्ज आले असल्याचे स्पष्ट केले. अर्ज दाखल करताना ‘रॅपर’ सादर करणे अनिवार्य राहणार नाही. केवळ बियाणे खरेदीची पावती जोडली तरी अर्ज स्वीकारण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. ‘नॉन बी.टी.’ तपासणीसाठी ९९६ नमुने काढण्यात आले. त्यापैकी १५१ नमुने अप्रमाणित आढळून आले. ११० प्रकरणांमध्ये कोर्ट केसेस दाखल करण्यात आल्या असून इतर प्रकरणांतदेखील असेच पाऊल उचलण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.कुठलीही कंपनी असो, गुन्हे दाखल होतीलअप्रमाणित नमुने आढळणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. कंपनी कितीही मोठी असली तरी तिच्यावर कारवाई करण्यात येईल, असे यावेळी खोत यांनी सभागृहाला सांगितले. शिवाय दोषयुक्त बियाण्यांना विक्रीअगोदर प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

टॅग्स :ministerमंत्रीagricultureशेती