शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

‘मुद्रा’ योजनेचा १५ कोटी लोकांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 20:48 IST

देशातील असंघटित लघुउद्योगांच्या विकासाकरिता वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने मुद्रा बँक योजनेची सुरुवात केली. २०१५ नंतर ४४ महिन्यांत वर्षांत मुद्रा योजनेच्या माध्यमातून देशभरातील १५ कोटींहून अधिक लघु व मध्यम उद्योग चालविणाऱ्या व्यावसायिकांना कर्ज मिळाले. कर्जाची रक्कम ही सात लाख कोटींहून अधिक होती. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे४४ महिन्यांतील आकडेवारी : सात लाख कोटींहून अधिक कर्जाचे वाटपमाहितीच्या अधिकारातून समोर आली बाब

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील असंघटित लघुउद्योगांच्या विकासाकरिता वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने मुद्रा बँक योजनेची सुरुवात केली. २०१५ नंतर ४४ महिन्यांत वर्षांत मुद्रा योजनेच्या माध्यमातून देशभरातील १५ कोटींहून अधिक लघु व मध्यम उद्योग चालविणाऱ्या व्यावसायिकांना कर्ज मिळाले. कर्जाची रक्कम ही सात लाख कोटींहून अधिक होती. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे विचारणा केली होती. २०१५-१६ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत किती लाभार्थ्यांना मुद्रा योजनेंतर्गत कर्जवाटप झाले, कर्जाचा आकडा किती होता तसेच किती रक्कम ‘एनपीए’मध्ये आली आहे, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१८ या ४४ महिन्यांच्या काळात देशभरात १५ कोटी ३३ लाख २६ हजार ६९२ लोकांना कर्जवाटप करण्यात आले. कर्जाची रक्कम ही ७ लाख ९ हजार ६२२ कोटी इतकी होती. भारतीय रोजगार क्षेत्रात मोठ्या संख्येने सामावून घेतलेल्या लघुउद्योगांना आर्थिक साहाय्य पुरविणे हा मुद्रा कर्ज योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत शिशू, किशोर आणि तरुण अशा तीन टप्प्यांत कर्ज दिले जाते. शिशू योजनेंतर्गत ५० हजार, किशोर योजनेंतर्गत पाच लाख तर तरुण योजनेंतर्गत मोठ्या उद्योजकांना १० लाखांपर्यंतचे कर्ज मिळते.‘एनपीए’चा आकडा १६ हजार कोटींहून अधिकअनेक कर्जदारांनी मिळालेल्या कर्जाची परतफेड करण्यास टाळाटाळ केली आहे. बँकांकडून वारंवार पाठपुरावा करूनही त्यास दाद न दिल्याने ही कर्जखाती ‘एनपीए’ करण्यात आली आहेत. ३१ डिसेंबर २०१८ अखेर या योजनेंतर्गत ‘एनपीए’ खात्यांची संख्या ही ३१ लाख ९५ हजार ७५१ इतकी होती व ‘एनपीए’ची रक्कम ही १६ हजार २५८ कोटी इतकी होती.व्यावसायिकांचा प्रतिसाद वाढीसदरम्यान, २०१५-१६ पासून दरवर्षी या योजनेला व्यावसायिकांचा प्रतिसाद वाढत असल्याचे दिसून येत आहे. २०१५-१६ मध्ये सुमारे ३ कोटी ४८ लाख लोकांना कर्जवाटप करण्यात आले. २०१६-१७ मध्ये हाच आकडा जवळपास ३ कोटी ९७ लाखांवर गेला. २०१७-१८ मध्ये तब्बल ४ कोटी ८१ लाख लोकांनी या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेतले. तर २०१८-१९ मधील पहिल्या आठ महिन्यांतच ३ कोटी ६ लाख लोकांना कर्ज देण्यात आले.

 

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकारRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता