शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी १५ भरारी पथके, बोगस बियाणे विकल्यास होईल कारवाई

By गणेश हुड | Updated: April 25, 2023 16:40 IST

खत व बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये यासाठी सोमवारी विभागाची आढावा बैठक घेण्यात आली

नागपूर : खरिपाचा हंगाम आता दीड महिन्यावर आलेला आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा वेळेत मिळाव्यात व योग्य किमतीत मिळाव्यात, यासाठी कृषी विभागाच्या गुणनियंत्रक विभागाच्या वतीने दक्षता घेतली जात आहे. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी १५ भरारी पथके गठित करण्यात आली आहे. 

कृषी निष्ठांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले जातात. यामध्ये नमुना योग्य नसल्यास विक्री बंदचे आदेश दिले जातात. काही प्रकरणात विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हा देखील दाखल केला जातो. खत व बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये यासाठी सोमवारी विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आल्याची माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.बोगस बियाणे विकल्यास होईल कारवाई

खताची जादा भावाने विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रकार घडतात. जादा भावाने खते वा बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

जिल्ह्यात १५ पथकांचा वॉच

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर  प्रत्येक तालुकास्तरावर एक असे १३, एक  जिल्हास्तरावर आणि एक विभागस्तरावर असे  पथकाचे गठण करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे.

- रविंद्र मनोहरे, उपसंचालक, कृषी विभाग

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका