शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

१४ हजारावर एलपीजीचे नवीन कनेक्शन्स रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 10:45 IST

रेशनकार्डची माहिती सादर करणाऱ्या अर्जदारालाच नवीन एलपीजी कनेक्शन देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश असल्यामुळे राज्यामध्ये १४ हजारावर नवीन एलपीजी कनेक्शन्स रखडले आहेत.

ठळक मुद्देरेशनकार्ड नसल्यामुळे मंजुरी नाही हायकोर्टाच्या आदेशाचा प्रभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेशनकार्डची माहिती सादर करणाऱ्या अर्जदारालाच नवीन एलपीजी कनेक्शन देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश असल्यामुळे राज्यामध्ये १४ हजारावर नवीन एलपीजी कनेक्शन्स रखडले आहेत. संबंधित अर्जदारांकडे रेशनकार्ड नाहीत. परिणामी, त्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले नाहीत. प्रलंबित अर्ज १२ सप्टेंबर ते १९ आॅक्टोबर या कालावधीतील आहेत. केंद्र सरकारने सोमवारी उच्च न्यायालयाला ही माहिती दिली.राज्यातील हजारो कुटुंबे त्यांच्याकडे एलपीजी सिलेंडर असतानाही रेशनकार्डवरून रॉकेल उचलत आहेत. अशा कुटुंबांकडील रेशन कार्डवर ते एलपीजी सिलेंडरधारक असल्याची स्टॅम्पिंग नसल्यामुळे हा गैरप्रकार होत आहे. परिणामी, खऱ्या गरजू कुटुंबांना कमी रॉकेल मिळत आहे. या गैरप्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकार रेशनकार्ड स्टॅम्पिंग करीत आहे. परंतु, हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. ही बाब लक्षात घेता, न्यायालयाने रेशनकार्डची माहिती सादर करणाऱ्या अर्जदारालाच नवीन एलपीजी कनेक्शन देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे रेशनकार्ड नसलेल्या ग्राहकांचे एलपीजी कनेक्शन मिळण्याचे अर्ज थांबवून ठेवण्यात आले आहेत. अशा अर्जांची वाढती संख्या लक्षात घेता रेशनकार्डच्या अटीचा आदेश मागे घेण्यात यावा, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. संबंधित अर्जदारांकडून त्यांच्याकडे रेशनकार्ड नसल्याचे प्रतिज्ञापत्र व आधार क्रमांक घेऊन त्यांना एलपीजी कनेक्शन देण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केंद्र सरकारने न्यायालयाला केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व श्रीराम मोडक यांनी सोमवारी यासह विविध मुद्दे ऐकून आवश्यक निर्णय देण्यासाठी प्रकरणावर मंगळवारी सुनावणी निश्चित केली. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते कडूजी पुंड यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. गरजू व्यक्तींना पुरेसे रॉकेल मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर तर, राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. अनिल किलोर यांनी बाजू मांडली.

राज्य सरकारला आधारची माहिती देणार का?रेशनकार्ड नसलेल्या व नवीन एलपीजी कनेक्शन मागणाऱ्या अर्जदारांच्या आधार क्रमांकांची माहिती राज्य सरकारला देणार का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला करून, यावर मंगळवारी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. रॉकेलची अवैध उचल थांबविण्यासाठी एलपीजी कनेक्शनधारक ओळखणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने सांगितले. 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर