शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
18
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
19
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
20
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!

तीन वर्षात १३५ पोलिसांवर हल्ले

By admin | Updated: September 18, 2016 02:27 IST

कुठे वाहनाने उडवून देण्याचा प्रयत्न तर कुठे पाण्यात बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न,

आठ महिन्यात हल्ल्याचे २६ गुन्हे : बारंगे प्रकरणाने पोलिसांमध्ये रोषनरेश डोंगरे  नागपूरकुठे वाहनाने उडवून देण्याचा प्रयत्न तर कुठे पाण्यात बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न, कुठे दगडफेक तर कुठे मारहाण असे पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रकार वाढल्याने राज्य पोलीस दलात प्रचंड रोष आहे. या पार्श्वभूमीवर, नागपुरात एका दारुड्या वाहनचालकाने शुक्रवारी रात्री कर्तव्यावरील एका पोलीस हवालदाराला हेल्मेट आणि दगडाने ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस दलातील खदखद तीव्र झाली आहे. गेल्या आठ महिन्यात नागपुरात पोलिसांवर हल्ल्याच्या २६ घटना घडल्या. तीन वर्षांत पोलिसांवरील हल्ल्याच्या गुन्ह्यांचा आकडा १३५ एवढा आहे. शिस्तीचे दल म्हणून पोलिसांना उघड बोलण्याची मुभा नाही. परंतु, शुक्रवारच्या या घटनेने पोलिसांच्या रोषाचा भडका उडण्याची भीती निर्माण केली आहे. नागरिकांच्या जानमालाची सुरक्षा सांभाळण्याची मुख्य जबाबदारी पेलणारे पोलीस अलीकडे कमालीचे असुरक्षित झाले आहेत. त्याला अनेक कारणे असली तरी खाबुगिरीसाठी चटावलेली वृत्ती अन् उर्मटपणा या दोन मुख्य बाबी पोलिसांवरील हल्ल्याला कारणीभूत आहेत. अर्थात सर्वच पोलीस खाबुगिरीसाठी चटावलेले असतात किंवा सर्वच पोलीस उर्मट असतात असेही नाही. मात्र, सौजन्याच्या अभावामुळेच पोलिसांवरील हल्ल्याचे प्रकार वाढल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. रात्री बेरात्री निर्जन रस्त्यावरून जाताना माणसाचा जीव धाकधूक करतो. कुठे एखादा पोलीस किंवा पोलिसांचे वाहन जरी दिसले तरी पुढच्या एक-दोन किलोमिटरपर्यंत भीती वाटत नाही. असे असूनदेखील पोलिसांशी वाद घातल्याचे, त्याची कॉलर पकडल्याचे, धक्काबुक्की केल्याचे अन् मारहाण केल्याचे गुन्हे घडतच असतात. यावर्षी जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत सीताबर्डीत ४ गुन्हे, जरीपटक्यात ३, नंदनवनमध्ये ३, सदर, पाचपावली, कळमना, गिट्टीखदानमध्ये अनुक्रमे २ गुन्हे, तर, तहसील, प्रतापनगर, अंबाझरी, गणेशपेठ, शांतिनगर, सक्करदरा, अजनी या पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण २५ गुन्हे नोंदवण्यात आले. यातील सर्वाधिक गुन्हे वाहतूक शाखेच्या पोलिसांसोबत झालेल्या बाचाबाचीनंतर नोंदविण्यात आले. त्यामुळे पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यापूर्वी बरेच विचारमंथन झाले. त्यानंतर पोलीस कायद्याचा दुरुपयोग करून गुन्हे दाखल करतात, दडपशाही करतात, असा आरोप करणाऱ्या तक्रारी होऊन नाराजीचा सूरही निघाला. सर्वाधिक गुन्हे २०१४ मध्येजीवघेण्या हल्ल्यासोबतच पोलिसांना मारहाण करण्याच्या, शिवीगाळ करून धमकी देण्याच्या घटना नागपुरात नवीन नाही. २०१४ मध्ये अशा प्रकारचे ६१ गुन्हे दाखल झाले होते. २०१५ मध्ये पोलिसांवरील हल्ल्याचा आकडा ४८ वर आला. आता साडेआठ महिन्यात २६ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ६ गुन्हे जानेवारी महिन्यात, फेब्रुवारी -१, मार्च-४, एप्रिल ४, मे -०, जून ३, जुलै-३ आॅगस्ट २ आणि १५ सप्टेंबरपर्यंत ३ गुन्हे, अशी ही पोलिसांवरील हल्ल्याची आकडेवारी आहे.