शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

अतिवृष्टीमुळे विभागात १.३५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान; वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 21:07 IST

Nagpur News अतिवृष्टी व पुरामुळे नागपूर विभागातील शेतीच्या नुकसानाचा मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. शेतकऱ्यांना तातडीने मदत देता यावी, यासाठी वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

ठळक मुद्देवर्धा-चंद्रपूरमधील पाहणीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

 नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे नागपूर विभागातील शेतीच्या नुकसानाचा मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. नागपूर विभागात सुमारे १.३५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत देता यावी, यासाठी वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

आढावा बैठकीअगोदर फडणवीस यांनी वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांतील पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केला. अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतामध्ये उभे राहण्याचीदेखील स्थिती नाही. बऱ्याच ठिकाणी दुबार पेरणी वाया गेली आहे आणि शेती खरडल्या गेल्यामुळे तेथे पुन्हा पेरणीसुद्धा होऊ शकत नाही. अशी ठिकाणी मदत देताना वेगळा विचार करावा लागणार आहे. गेल्यावेळी झालेल्या नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेच नाहीत, असे लक्षात आले आहे. त्यामुळे आता मदत जाहीर करताना तो भागसुद्धा विचारात घ्यावा लागेल, असे फडणवीस यांनी सांगितले.

गडचिरोलीसाठी दीर्घकालीन योजनांचा आराखडा तयार करणार

गडचिरोली जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाळ्यात तेथे अनेक गावांची कनेक्टिव्हिटी तुटते. याशिवाय अंतर्गत भागांमध्ये स्थिती खूप बिकट होते. त्यामुळे यासाठी दीर्घकाळ उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यास प्रशासनाला सांगण्यात आले असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सप्टेंबरच्या अतिवृष्टीसाठी तयारीचे निर्देश

शेतकऱ्यांच्या कर्जपुरवठ्यासाठी निकराने प्रयत्न करावे, अशी सूचना फडणवीस यांनी केली. सर्वसाधारणत: सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी होते. यंदादेखील अशी शक्यता विचारात घेऊन त्यादृष्टीनेही नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस