शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नागपूर शहरात वैयक्तिक शौचालयाचे १३४३० लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:10 IST

नागपूर शहरात १३४३० वैयक्तिक शौचालयांचे निर्माण करण्यात आले आहे. यामुळे हागणदारीमुक्त शहराच्या वाटचालीला नवी दिशा मिळाली आहे.

ठळक मुद्देमनपाचा स्वच्छता अभियानात पुढाकार : गरीब कुटुंबांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेतर्फे शहरात जनजागृती मोहीम राबवून गरीब कुटुंबांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले आहे. तसेच शहरात १३४३० वैयक्तिक शौचालयांचे निर्माण करण्यात आले आहे. यामुळे हागणदारीमुक्त शहराच्या वाटचालीला नवी दिशा मिळाली आहे.तसेच शहरात मोठ्या प्रमाणात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचे निर्माण केल्याने महापालिका ओडीएफ प्लस प्लसच्या मानांकनासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.राज्य सरकारने नागपूर शहराला यापूर्वीच हागणदारीमुक्त घोषित केले आहे. शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात वैयक्तिक शौचालय निर्माण करण्यासाठी २४ हजार २८४ अर्जप्राप्त झाले होते. यातील १३,४३० पात्र लाभार्थ्यांना शौचालयासाठी अनुदान देण्यात आले आहे.शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये २० सामूहिक शौचालयाचे निर्माण करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त शहरात ६८ सार्वजनिक शौचालये उभारण्यात आलेली आहे. पाच शौचालयाचे कार्य प्रगतिपथावर आहे. वर्दळीच्या जागी ही शौचालये उभारली जात आहे. याते नेताजी मार्केट, बुधवार बाजार, गोकुळपेठ, भाजीमंडई, फुले बाजार, मेहाडिया चौक याठिकाणी सुलभ शौचालयाचे निर्माण करण्यात आले आहे. शहरात सार्वजनिक शौचालयाचे नियंत्रण हे सुलभ शौचालय प्रकल्पांतर्गत करण्यात आले आहे. सामूहिक शौचालयाची स्वच्छता ब्रिस्क या कंपनीकडे आहे.कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण झाले तर, कचरा डेपोमध्ये कचऱ्याचे ढीग वाढणार नाही. कचरा डेपोमध्ये कचरा साठल्याने मिथेन गॅस निर्माण होते. यामुळे कचऱ्याला आग लागते व धूर पसरून प्रदूषण वाढते. वर्गीकरण केल्यास कचऱ्याची लगेच विल्हेवाट लावणे सोयीचे होईल. अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.कचरा वर्गीकरण करूनच संकलित कराशहरातील नागरिकांना कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे ओला व सुका कचरा वर्गीकरण करून द्यावा. पर्यावरण संवर्धनासाठी कचरा वर्गीकरण आवश्यक आहे. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते. सुका कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे ओला व सुका कचरा वेगवेगळा करूनच संकलन करणाऱ्याकडे द्यावा, असे आवाहन राम जोशी, आरोग्य अधिकारी (स्वच्छता)डॉ. सुनील कांबळे व स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी केले आहे.स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहनशहरातील स्वच्छतेसंदर्भात कुठलीही तक्रार करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपकडे तक्रार केली तर १२ तासात तक्रारीचे निराकरण होईल. नागरिकांनी हा अ‍ॅप डाऊनलोड करावा, असे आवाहन राम जोशी यांनी केले आहे. स्वच्छ मंच या पोर्टलवर संस्थांनी व वैयक्तिक पर्यावरणाशी संबंधित कार्य व त्याचे फोटो अपलोड करता येतात.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcivic issueनागरी समस्या