शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

नागपूर शहरात वैयक्तिक शौचालयाचे १३४३० लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:10 IST

नागपूर शहरात १३४३० वैयक्तिक शौचालयांचे निर्माण करण्यात आले आहे. यामुळे हागणदारीमुक्त शहराच्या वाटचालीला नवी दिशा मिळाली आहे.

ठळक मुद्देमनपाचा स्वच्छता अभियानात पुढाकार : गरीब कुटुंबांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेतर्फे शहरात जनजागृती मोहीम राबवून गरीब कुटुंबांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले आहे. तसेच शहरात १३४३० वैयक्तिक शौचालयांचे निर्माण करण्यात आले आहे. यामुळे हागणदारीमुक्त शहराच्या वाटचालीला नवी दिशा मिळाली आहे.तसेच शहरात मोठ्या प्रमाणात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचे निर्माण केल्याने महापालिका ओडीएफ प्लस प्लसच्या मानांकनासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.राज्य सरकारने नागपूर शहराला यापूर्वीच हागणदारीमुक्त घोषित केले आहे. शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात वैयक्तिक शौचालय निर्माण करण्यासाठी २४ हजार २८४ अर्जप्राप्त झाले होते. यातील १३,४३० पात्र लाभार्थ्यांना शौचालयासाठी अनुदान देण्यात आले आहे.शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये २० सामूहिक शौचालयाचे निर्माण करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त शहरात ६८ सार्वजनिक शौचालये उभारण्यात आलेली आहे. पाच शौचालयाचे कार्य प्रगतिपथावर आहे. वर्दळीच्या जागी ही शौचालये उभारली जात आहे. याते नेताजी मार्केट, बुधवार बाजार, गोकुळपेठ, भाजीमंडई, फुले बाजार, मेहाडिया चौक याठिकाणी सुलभ शौचालयाचे निर्माण करण्यात आले आहे. शहरात सार्वजनिक शौचालयाचे नियंत्रण हे सुलभ शौचालय प्रकल्पांतर्गत करण्यात आले आहे. सामूहिक शौचालयाची स्वच्छता ब्रिस्क या कंपनीकडे आहे.कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण झाले तर, कचरा डेपोमध्ये कचऱ्याचे ढीग वाढणार नाही. कचरा डेपोमध्ये कचरा साठल्याने मिथेन गॅस निर्माण होते. यामुळे कचऱ्याला आग लागते व धूर पसरून प्रदूषण वाढते. वर्गीकरण केल्यास कचऱ्याची लगेच विल्हेवाट लावणे सोयीचे होईल. अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.कचरा वर्गीकरण करूनच संकलित कराशहरातील नागरिकांना कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे ओला व सुका कचरा वर्गीकरण करून द्यावा. पर्यावरण संवर्धनासाठी कचरा वर्गीकरण आवश्यक आहे. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते. सुका कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे ओला व सुका कचरा वेगवेगळा करूनच संकलन करणाऱ्याकडे द्यावा, असे आवाहन राम जोशी, आरोग्य अधिकारी (स्वच्छता)डॉ. सुनील कांबळे व स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी केले आहे.स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहनशहरातील स्वच्छतेसंदर्भात कुठलीही तक्रार करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपकडे तक्रार केली तर १२ तासात तक्रारीचे निराकरण होईल. नागरिकांनी हा अ‍ॅप डाऊनलोड करावा, असे आवाहन राम जोशी यांनी केले आहे. स्वच्छ मंच या पोर्टलवर संस्थांनी व वैयक्तिक पर्यावरणाशी संबंधित कार्य व त्याचे फोटो अपलोड करता येतात.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcivic issueनागरी समस्या