शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरात वैयक्तिक शौचालयाचे १३४३० लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:10 IST

नागपूर शहरात १३४३० वैयक्तिक शौचालयांचे निर्माण करण्यात आले आहे. यामुळे हागणदारीमुक्त शहराच्या वाटचालीला नवी दिशा मिळाली आहे.

ठळक मुद्देमनपाचा स्वच्छता अभियानात पुढाकार : गरीब कुटुंबांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेतर्फे शहरात जनजागृती मोहीम राबवून गरीब कुटुंबांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले आहे. तसेच शहरात १३४३० वैयक्तिक शौचालयांचे निर्माण करण्यात आले आहे. यामुळे हागणदारीमुक्त शहराच्या वाटचालीला नवी दिशा मिळाली आहे.तसेच शहरात मोठ्या प्रमाणात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचे निर्माण केल्याने महापालिका ओडीएफ प्लस प्लसच्या मानांकनासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.राज्य सरकारने नागपूर शहराला यापूर्वीच हागणदारीमुक्त घोषित केले आहे. शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात वैयक्तिक शौचालय निर्माण करण्यासाठी २४ हजार २८४ अर्जप्राप्त झाले होते. यातील १३,४३० पात्र लाभार्थ्यांना शौचालयासाठी अनुदान देण्यात आले आहे.शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये २० सामूहिक शौचालयाचे निर्माण करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त शहरात ६८ सार्वजनिक शौचालये उभारण्यात आलेली आहे. पाच शौचालयाचे कार्य प्रगतिपथावर आहे. वर्दळीच्या जागी ही शौचालये उभारली जात आहे. याते नेताजी मार्केट, बुधवार बाजार, गोकुळपेठ, भाजीमंडई, फुले बाजार, मेहाडिया चौक याठिकाणी सुलभ शौचालयाचे निर्माण करण्यात आले आहे. शहरात सार्वजनिक शौचालयाचे नियंत्रण हे सुलभ शौचालय प्रकल्पांतर्गत करण्यात आले आहे. सामूहिक शौचालयाची स्वच्छता ब्रिस्क या कंपनीकडे आहे.कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण झाले तर, कचरा डेपोमध्ये कचऱ्याचे ढीग वाढणार नाही. कचरा डेपोमध्ये कचरा साठल्याने मिथेन गॅस निर्माण होते. यामुळे कचऱ्याला आग लागते व धूर पसरून प्रदूषण वाढते. वर्गीकरण केल्यास कचऱ्याची लगेच विल्हेवाट लावणे सोयीचे होईल. अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.कचरा वर्गीकरण करूनच संकलित कराशहरातील नागरिकांना कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे ओला व सुका कचरा वर्गीकरण करून द्यावा. पर्यावरण संवर्धनासाठी कचरा वर्गीकरण आवश्यक आहे. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते. सुका कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे ओला व सुका कचरा वेगवेगळा करूनच संकलन करणाऱ्याकडे द्यावा, असे आवाहन राम जोशी, आरोग्य अधिकारी (स्वच्छता)डॉ. सुनील कांबळे व स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी केले आहे.स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहनशहरातील स्वच्छतेसंदर्भात कुठलीही तक्रार करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपकडे तक्रार केली तर १२ तासात तक्रारीचे निराकरण होईल. नागरिकांनी हा अ‍ॅप डाऊनलोड करावा, असे आवाहन राम जोशी यांनी केले आहे. स्वच्छ मंच या पोर्टलवर संस्थांनी व वैयक्तिक पर्यावरणाशी संबंधित कार्य व त्याचे फोटो अपलोड करता येतात.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcivic issueनागरी समस्या