शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

१.३१ लाख शौचालये बांधणार

By admin | Updated: February 4, 2015 00:56 IST

ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे ,यासाठी निर्मल ग्राम अभियानांतर्गत २०१९ सालापर्यंत जिल्ह्यातील १,३१००० कुटुंबांना शौचालये बांधून दिली जाणार आहेत.

निर्मल ग्राम अभियान : ग्रामपंचायतीवर जबाबदारीनागपूर : ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे ,यासाठी निर्मल ग्राम अभियानांतर्गत २०१९ सालापर्यंत जिल्ह्यातील १,३१००० कुटुंबांना शौचालये बांधून दिली जाणार आहेत. केंद्र सरकारने २०१२ मध्ये केलेल्या सर्वेनुसार नागपूर जिल्ह्यात १,३१००० हजार कुटुंबांकडे शौचालय नाही. निर्मल भारत अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजू व गरीब कुटुंबांना शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जाते. मागील दोन-तीन वर्षात १३००० शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. मनरेगातर्फेही शौचालय बांधकाम योजना राबविण्यात आली. परंतु अनुदान कमी होते व ते टप्प्याटप्प्याने मिळत होते. त्यामुळे या योजनेला लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी यातून मार्ग काढला आहे. शौचालय बांधकामाची जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शौचालय नसलेल्या कुटुंबांची यादी तयार करून ती आॅनलाईन करण्यात आली आहे. शौचालय नसलेल्यांची यादी व ग्राम पंचायतीचा ठराव जि.प.कडे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कामानिमित्ताने वास्तव्यास असलेल्या वा गाव सोडून गेलेल्या लोकांमुळे शौचालय नसलेल्या कुटुंबांची संंख्या दरवर्षी बदलते. त्यामुळे जिल्ह्यात फेरसर्वे केला जाणार आहे. प्राप्त प्रस्तावानुसार ग्राम पंचायतींना शौचालयासाठी निधी उपलब्ध केला जाणार आहे. शौचालयासाठी आता १२००० चे अनुदान दिले जाते. तसेच इंदिरा आवास लाभार्थ्यांना शौचालय बांधकामासाठी हे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यात १६००० शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट आहे. मार्चपर्यंत ते पूर्ण होईल. २०१५-१६ या वर्षात ३१००० शौचालयांचे उद्दिष्ट आहे. २०१९ पर्यत जिल्ह्यातील सर्व कुटुंबांकडे शौचालय असतील, असे नियोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)गडकरींच्या निर्णयामुळे गती मिळालीकें द्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शौचालय बांधकामासाठी प्रत्येकी १२००० हजारांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. यामुळे योजनेला गती मिळाली आहे. ग्रामपंचायतीकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने २०१९ सालापर्यत जिल्ह्यातील १,३१००० कुटुंबांना शौचालये बांधून देण्याची ग्वाही शिवाजी जोंधळे यांनी दिली. पंचायत विभागाचे सहकार्ययोजना प्रभावीपणे राबविली जावी यासाठी जि.प.च्या पंचायत विभागामार्फत ग्राम पंचायतींना सूचना देण्यात आली आहे. यासाठी विभाग सहकार्य करीत असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव भांडारकर यांनी दिली.