शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
5
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
6
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
7
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
8
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
9
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
10
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
11
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
12
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
13
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
14
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
15
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
16
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
17
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
18
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
19
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
20
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...

१.३१ लाख शौचालये बांधणार

By admin | Updated: February 4, 2015 00:56 IST

ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे ,यासाठी निर्मल ग्राम अभियानांतर्गत २०१९ सालापर्यंत जिल्ह्यातील १,३१००० कुटुंबांना शौचालये बांधून दिली जाणार आहेत.

निर्मल ग्राम अभियान : ग्रामपंचायतीवर जबाबदारीनागपूर : ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे ,यासाठी निर्मल ग्राम अभियानांतर्गत २०१९ सालापर्यंत जिल्ह्यातील १,३१००० कुटुंबांना शौचालये बांधून दिली जाणार आहेत. केंद्र सरकारने २०१२ मध्ये केलेल्या सर्वेनुसार नागपूर जिल्ह्यात १,३१००० हजार कुटुंबांकडे शौचालय नाही. निर्मल भारत अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजू व गरीब कुटुंबांना शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जाते. मागील दोन-तीन वर्षात १३००० शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. मनरेगातर्फेही शौचालय बांधकाम योजना राबविण्यात आली. परंतु अनुदान कमी होते व ते टप्प्याटप्प्याने मिळत होते. त्यामुळे या योजनेला लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी यातून मार्ग काढला आहे. शौचालय बांधकामाची जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शौचालय नसलेल्या कुटुंबांची यादी तयार करून ती आॅनलाईन करण्यात आली आहे. शौचालय नसलेल्यांची यादी व ग्राम पंचायतीचा ठराव जि.प.कडे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कामानिमित्ताने वास्तव्यास असलेल्या वा गाव सोडून गेलेल्या लोकांमुळे शौचालय नसलेल्या कुटुंबांची संंख्या दरवर्षी बदलते. त्यामुळे जिल्ह्यात फेरसर्वे केला जाणार आहे. प्राप्त प्रस्तावानुसार ग्राम पंचायतींना शौचालयासाठी निधी उपलब्ध केला जाणार आहे. शौचालयासाठी आता १२००० चे अनुदान दिले जाते. तसेच इंदिरा आवास लाभार्थ्यांना शौचालय बांधकामासाठी हे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यात १६००० शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट आहे. मार्चपर्यंत ते पूर्ण होईल. २०१५-१६ या वर्षात ३१००० शौचालयांचे उद्दिष्ट आहे. २०१९ पर्यत जिल्ह्यातील सर्व कुटुंबांकडे शौचालय असतील, असे नियोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)गडकरींच्या निर्णयामुळे गती मिळालीकें द्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शौचालय बांधकामासाठी प्रत्येकी १२००० हजारांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. यामुळे योजनेला गती मिळाली आहे. ग्रामपंचायतीकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने २०१९ सालापर्यत जिल्ह्यातील १,३१००० कुटुंबांना शौचालये बांधून देण्याची ग्वाही शिवाजी जोंधळे यांनी दिली. पंचायत विभागाचे सहकार्ययोजना प्रभावीपणे राबविली जावी यासाठी जि.प.च्या पंचायत विभागामार्फत ग्राम पंचायतींना सूचना देण्यात आली आहे. यासाठी विभाग सहकार्य करीत असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव भांडारकर यांनी दिली.