शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

उमरेड-कऱ्हांडलामध्ये २ वर्षात १३ वाघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:18 IST

निशांत वानखेडे नागपूर : उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्याची ज्याच्यामुळे ओळख निर्माण झाली तो आयकॉनिक ‘जय’ अचानक गायब झाल्यानंतर या अभयारण्यातील वाघांना ...

निशांत वानखेडे

नागपूर : उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्याची ज्याच्यामुळे ओळख निर्माण झाली तो आयकॉनिक ‘जय’ अचानक गायब झाल्यानंतर या अभयारण्यातील वाघांना जणू ग्रहणच लागले, असे दिसते. २०२१ या नववर्षाची पहाटही राष्ट्रीय प्राण्यासाठी आघात घेऊन आली आणि याच अभयारण्यातील सी-३ वाघिण व तिचे तीन बछडे विषप्रयोगाचे बळी ठरले. उल्लेखनीय म्हणजे गेल्या दोन वर्षात अशाप्रकारे या अभयारण्यातील १३ वाघांनी जीव गमावला आहे आणि यावेळीही शेतकऱ्यावर आरोपाचा ठपका ठेवत वनविभाग आपली जबाबदारी झटकून मोकळे झाला.

जय गायब झाल्यानंतर बराच गदाराेळ झाला पण त्यानंतर वनविभागही निद्राधीन झाला. व्याघ्र बळी जाण्याचे सत्र ३० डिसेंबर २०१८ पासून सुरू झाले. २०१९ च्या पहिल्याच दिवशी अशाचप्रकारे दाेन वाघ विषप्रयाेगाचे बळी ठरले. यावर्षी पुन्हा तसाच प्रकार घडला. वासराचा मृत्यू झाल्यामुळे संतापल्याने विषप्रयाेग करून वाघिण व तीन बछडे मारणारा शेतकरी वनसंवर्धन कायद्यानुसार गुन्हेगार ठरलाच. मात्र हा सगळा प्रकार सातत्याने घडत असताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांची काहीच जबाबदारी ठरत नाही काय, असा प्रश्न व्याघ्रप्रेमींकडून विचारला जात आहे.

असे गेले वाघांचे बळी

१) ३० डिसेंबर २०१८ : पवनी रेंजमध्ये एक वाघ मृतावस्थेत आढळला.

२) १ जानेवारी २०१९ : पवनी रेंजमध्येच दोन वाघांचा विषबाधेने मृत्यु

३) १४ सप्टेंबर २०२० : कुही रेंजमध्ये दाेन वर्षाचा वाघ मृतावस्थेत आढळला. वाघांच्या झुंजीत मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

४) २३ नाेव्हेंबर २०२० : कम्पार्टमेंट १४५२/१ च्या तास बीटमध्ये वाघिण व तिचे चार बछडे मृतावस्थेत आढळले.

५) १ जानेवारी २०२१ : कम्पार्टमेंट क्रमांक १४१५, वाघिण व तिचे तीन बछडे विषप्रयाेगाचे बळी.

गावकऱ्यांना विश्वास का दिला जात नाही

या घटनांमुळे उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्याच्या आसपासच्या गावकऱ्यांशी वनविभागाचा संवाद नाही, असेच दिसते. अभयारण्य आहे व त्यात वाघ आहेत, हे सर्वश्रुत आहे. अशावेळी गावकऱ्यांशी समन्वय साधणे गरजेचे आहे. वन्यप्राणी हल्ल्यात घरची जनावर मेली तर त्वरित माेबदला मिळेल, अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे. गावकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यात वनविभागाचे अधिकारी कमी पडले, हे मान्य करावे लागेल.

टायगर सेलची बैठकच झाली नाही

वन्यजीव संवर्धनासाठी, अवैध शिकार व अवयवांच्या चाेरट्या व्यापाऱ्यास आळा घालण्यासाठी राज्यात राज्यस्तरीय व महसूल विभागस्तरीय व्याघ्र कक्ष समित्या (टायगर सेल) स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हा पाेलीस अधीक्षक हे जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष असतात. महिन्यातून किमान एक बैठक घेणे बंधनकारक आहे. मात्र स्थापन झाल्यापासून एकही बैठक झाल्याचे ऐकिवात नाही. महसूलस्तरीय समितीची बैठक तीन महिन्यात एकदा तर राज्यस्तरीय समितीची बैठक सहा महिन्यात एकदा हाेणे आवश्यक आहे पण याबाबत कुणालाही गांभीर्य नाही.

१८९ चाैरस किमीच्या या अभयारण्यास संरक्षित व्याघ्र प्रकल्प घाेषित करण्यासाठी २०१५-१६ मध्ये हा प्रस्ताव आला हाेता पण पुढे काही झाले नाही. असे झाल्यास काेर एरिया व बफर एरियाचे वर्गीकरण हाेईल. केंद्राकडून संरक्षणासाठी निधी मिळेल. शिवाय स्टेट टायगर प्राेटेक्शन फाेर्सची टीम तैनात हाेइल. गावकऱ्यांशी समन्वय साधून त्यांना अनेक याेजनांचा लाभ त्वरित देता येईल.