शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

उमरेड-कऱ्हांडलामध्ये २ वर्षात १३ वाघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:18 IST

निशांत वानखेडे नागपूर : उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्याची ज्याच्यामुळे ओळख निर्माण झाली तो आयकॉनिक ‘जय’ अचानक गायब झाल्यानंतर या अभयारण्यातील वाघांना ...

निशांत वानखेडे

नागपूर : उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्याची ज्याच्यामुळे ओळख निर्माण झाली तो आयकॉनिक ‘जय’ अचानक गायब झाल्यानंतर या अभयारण्यातील वाघांना जणू ग्रहणच लागले, असे दिसते. २०२१ या नववर्षाची पहाटही राष्ट्रीय प्राण्यासाठी आघात घेऊन आली आणि याच अभयारण्यातील सी-३ वाघिण व तिचे तीन बछडे विषप्रयोगाचे बळी ठरले. उल्लेखनीय म्हणजे गेल्या दोन वर्षात अशाप्रकारे या अभयारण्यातील १३ वाघांनी जीव गमावला आहे आणि यावेळीही शेतकऱ्यावर आरोपाचा ठपका ठेवत वनविभाग आपली जबाबदारी झटकून मोकळे झाला.

जय गायब झाल्यानंतर बराच गदाराेळ झाला पण त्यानंतर वनविभागही निद्राधीन झाला. व्याघ्र बळी जाण्याचे सत्र ३० डिसेंबर २०१८ पासून सुरू झाले. २०१९ च्या पहिल्याच दिवशी अशाचप्रकारे दाेन वाघ विषप्रयाेगाचे बळी ठरले. यावर्षी पुन्हा तसाच प्रकार घडला. वासराचा मृत्यू झाल्यामुळे संतापल्याने विषप्रयाेग करून वाघिण व तीन बछडे मारणारा शेतकरी वनसंवर्धन कायद्यानुसार गुन्हेगार ठरलाच. मात्र हा सगळा प्रकार सातत्याने घडत असताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांची काहीच जबाबदारी ठरत नाही काय, असा प्रश्न व्याघ्रप्रेमींकडून विचारला जात आहे.

असे गेले वाघांचे बळी

१) ३० डिसेंबर २०१८ : पवनी रेंजमध्ये एक वाघ मृतावस्थेत आढळला.

२) १ जानेवारी २०१९ : पवनी रेंजमध्येच दोन वाघांचा विषबाधेने मृत्यु

३) १४ सप्टेंबर २०२० : कुही रेंजमध्ये दाेन वर्षाचा वाघ मृतावस्थेत आढळला. वाघांच्या झुंजीत मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

४) २३ नाेव्हेंबर २०२० : कम्पार्टमेंट १४५२/१ च्या तास बीटमध्ये वाघिण व तिचे चार बछडे मृतावस्थेत आढळले.

५) १ जानेवारी २०२१ : कम्पार्टमेंट क्रमांक १४१५, वाघिण व तिचे तीन बछडे विषप्रयाेगाचे बळी.

गावकऱ्यांना विश्वास का दिला जात नाही

या घटनांमुळे उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्याच्या आसपासच्या गावकऱ्यांशी वनविभागाचा संवाद नाही, असेच दिसते. अभयारण्य आहे व त्यात वाघ आहेत, हे सर्वश्रुत आहे. अशावेळी गावकऱ्यांशी समन्वय साधणे गरजेचे आहे. वन्यप्राणी हल्ल्यात घरची जनावर मेली तर त्वरित माेबदला मिळेल, अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे. गावकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यात वनविभागाचे अधिकारी कमी पडले, हे मान्य करावे लागेल.

टायगर सेलची बैठकच झाली नाही

वन्यजीव संवर्धनासाठी, अवैध शिकार व अवयवांच्या चाेरट्या व्यापाऱ्यास आळा घालण्यासाठी राज्यात राज्यस्तरीय व महसूल विभागस्तरीय व्याघ्र कक्ष समित्या (टायगर सेल) स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हा पाेलीस अधीक्षक हे जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष असतात. महिन्यातून किमान एक बैठक घेणे बंधनकारक आहे. मात्र स्थापन झाल्यापासून एकही बैठक झाल्याचे ऐकिवात नाही. महसूलस्तरीय समितीची बैठक तीन महिन्यात एकदा तर राज्यस्तरीय समितीची बैठक सहा महिन्यात एकदा हाेणे आवश्यक आहे पण याबाबत कुणालाही गांभीर्य नाही.

१८९ चाैरस किमीच्या या अभयारण्यास संरक्षित व्याघ्र प्रकल्प घाेषित करण्यासाठी २०१५-१६ मध्ये हा प्रस्ताव आला हाेता पण पुढे काही झाले नाही. असे झाल्यास काेर एरिया व बफर एरियाचे वर्गीकरण हाेईल. केंद्राकडून संरक्षणासाठी निधी मिळेल. शिवाय स्टेट टायगर प्राेटेक्शन फाेर्सची टीम तैनात हाेइल. गावकऱ्यांशी समन्वय साधून त्यांना अनेक याेजनांचा लाभ त्वरित देता येईल.