शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

नागपुरात पाणीटंचाईसाठी १२.९ कोटींचा आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:36 IST

पावसाळ्यात पुरेसा पाऊ स न पडल्याने विदर्भातील धरणात ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नागपूर शहरातही पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने १२.९ कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्यात भूगर्भातील पाण्याचा वापरविहिरींची स्वच्छता व बोअरवेल खोदणारमनपा राज्याकडे अनुदान मागणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळ्यात पुरेसा पाऊ स न पडल्याने विदर्भातील धरणात ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नागपूर शहरातही पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने १२.९ कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे.नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलाशयातही गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे टंचाई कालावधीत भूगर्भातील पाण्याचा वापर करणे, विहिरीतील गाळ काढून पाण्याचा वापर, बोअरवेलच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याची तयारी केली आहे.पेंच प्रकल्पात २८ टक्के पाणीसाठा आहे. उन्हाळ्याच्या दिवसात यात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. याचा विचार करता टंचाई उद्भवल्यास पर्यायी साधनावर भर दिला जात आहे. यासाठी जलप्रदाय विभागाने नियोजन केले आहे. मात्र उन्हाळ्याला सुरुवात झाल्यानंतरच योजना प्रभावी ठरतात की नाही हे स्पष्ट होईल.स्थायी समितीकडे जलप्रदाय विभागाने १२.९ कोटींचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. समिती व सभागृहाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे विशेष अनुदानासाठी पाठविला जाणार आहे. परंतु सरकारने या प्रस्तावाला मंजुरी न दिल्यास महापालिका प्रशासनाला ही रक्कम जुळवताना चांगली कसरत करावी लागणार आहे.महापालिकेच्या अर्थसंकल्पात विहिरी व बोअरवेल दुरुस्तीसाठी ४५.१९ लाख व एनईएसएलच्या पूरक अनुदानासाठी ४.९० कोटींची तरतूद आहे. राज्याकडून निधी प्राप्त न झाल्यास महापालिकेला ५.३५ कोटींची तरतूद करावी लागणार आहे. उर्वरित ६.७३ कोटी २०१८-१९ या वर्षाच्या अर्थसंकल्पात करण्यात येईल.जिल्ह्यातील प्रकल्पात २८ टक्के जलसाठानागपूर जिल्ह्यातील लहान-मोठ्या धरणात २८ टक्के जलसाठा आहे. मात्र भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पात ४५ टक्के, गोंदिया २७, वर्धा ३९ टक्के, चंद्रपूर १८ टक्के तर गडचिरोली जिल्ह्यातील प्रकल्पात जेमतेम ८ टक्के जलसाठा आहे. राज्याच्या इतर भागातील प्रकल्पात मात्र ५९ टक्के जलसाठा आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी