शहरं
Join us  
Trending Stories
1
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
2
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
3
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
4
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
5
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
6
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
7
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
8
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
9
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
10
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
11
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
12
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
13
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
14
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
16
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
17
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
18
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
19
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
20
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पाणीटंचाईसाठी १२.९ कोटींचा आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:36 IST

पावसाळ्यात पुरेसा पाऊ स न पडल्याने विदर्भातील धरणात ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नागपूर शहरातही पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने १२.९ कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्यात भूगर्भातील पाण्याचा वापरविहिरींची स्वच्छता व बोअरवेल खोदणारमनपा राज्याकडे अनुदान मागणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळ्यात पुरेसा पाऊ स न पडल्याने विदर्भातील धरणात ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नागपूर शहरातही पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने १२.९ कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे.नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलाशयातही गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे टंचाई कालावधीत भूगर्भातील पाण्याचा वापर करणे, विहिरीतील गाळ काढून पाण्याचा वापर, बोअरवेलच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याची तयारी केली आहे.पेंच प्रकल्पात २८ टक्के पाणीसाठा आहे. उन्हाळ्याच्या दिवसात यात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. याचा विचार करता टंचाई उद्भवल्यास पर्यायी साधनावर भर दिला जात आहे. यासाठी जलप्रदाय विभागाने नियोजन केले आहे. मात्र उन्हाळ्याला सुरुवात झाल्यानंतरच योजना प्रभावी ठरतात की नाही हे स्पष्ट होईल.स्थायी समितीकडे जलप्रदाय विभागाने १२.९ कोटींचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. समिती व सभागृहाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे विशेष अनुदानासाठी पाठविला जाणार आहे. परंतु सरकारने या प्रस्तावाला मंजुरी न दिल्यास महापालिका प्रशासनाला ही रक्कम जुळवताना चांगली कसरत करावी लागणार आहे.महापालिकेच्या अर्थसंकल्पात विहिरी व बोअरवेल दुरुस्तीसाठी ४५.१९ लाख व एनईएसएलच्या पूरक अनुदानासाठी ४.९० कोटींची तरतूद आहे. राज्याकडून निधी प्राप्त न झाल्यास महापालिकेला ५.३५ कोटींची तरतूद करावी लागणार आहे. उर्वरित ६.७३ कोटी २०१८-१९ या वर्षाच्या अर्थसंकल्पात करण्यात येईल.जिल्ह्यातील प्रकल्पात २८ टक्के जलसाठानागपूर जिल्ह्यातील लहान-मोठ्या धरणात २८ टक्के जलसाठा आहे. मात्र भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पात ४५ टक्के, गोंदिया २७, वर्धा ३९ टक्के, चंद्रपूर १८ टक्के तर गडचिरोली जिल्ह्यातील प्रकल्पात जेमतेम ८ टक्के जलसाठा आहे. राज्याच्या इतर भागातील प्रकल्पात मात्र ५९ टक्के जलसाठा आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी