शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

पिढ्यानपिढ्या नदीकाठावर होणारे अंत्यसंस्कार थांबणार कधी ?

By गणेश हुड | Updated: June 14, 2023 16:47 IST

जिल्ह्यातील १२३ गावात स्मशानभूमी नाही 

नागपूर : शहरांचा विकास होत आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात अजूनही मुलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते, पाणीपुरवठा, गटर लाईन, पथदिवे अशा मुलभूत सुविधा नाही. एवढेच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील १२३ गावांमध्ये स्मशानभूमी, दहन शेड नाही. यासाठी शेकडो कोटींचा निधी लागणार नाही. परंतु प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे ग्रामीण भागातील स्मशानभूमीची समस्या अजूनही कायम आहे.  

स्मशानभूमी नसल्याने तेथील रहिवाशांना उघड्यावर, नदी काठावर  मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात.  काही  गावातील लोक नजिकच्या गावात अंत्ययात्रा नेवून अंत्यसंस्कार करतात. माहितीनुसार जी जागा वनविभागाची आहे. अशा जागी वनहक्क कायदा कलम ३/१नुसार निस्तार हक्क प्रमाणे मुकर्रर केल्या जाऊ शकते. तीन पिढ्यांपेक्षा जास्त काळ त्याच ठिकाणी दहन विधी होत असेल तर अशी गावची जागा दहनविधीसाठी निस्तार हक्काप्रमाणे मुकर्रर करता येते. या ठिकाणी स्मशान भूमीचे बांधकाम शक्य आहे. इच्छाश्क्तीचा अभाव

जिल्ह्यातील १२३ गावांमध्ये स्मशानभूमीची व्यवस्था नाही. यातील काही गावांमध्ये जागा उपलब्ध आहे. तर काही ठिकाणी जागा उपलब्ध नाही. तर कुठे जागा उपलब्ध असून ती झुडपी जंगलाची जागा आहे. स्मशानभूमीसाठी शासकीय जागा असणे आवश्यक आहे. परंतु अशी जागा उपलब्ध नसल्यास जन सुविधा निधीतून जमीन खरेदी करण्यासाठी त्या गावाला एकदा २० लाखाचे अर्थसहाय्य देण्यात येते. करावयाचेच असेल तर पर्याय निघतात. परंतु इच्छा शक्तीचाच अभाव दिसतो. 

 स्मशानभूमी नसलेली गावे

तालुका - गावांची संख्यानागपूर - १०कामठी - २हिंगणा - १२काटोल - १७नरखेड - ११सावनेर - ७कळमेश्वर - ११रामटेक - १२पारशिवणी - ९मौदा - ५उमरेड - ७भिवापूर - ९कुही - ११

टॅग्स :localलोकलnagpurनागपूर