शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

८१ तासांत १२०० किमी सायकल प्रवास!

By admin | Updated: March 2, 2017 22:06 IST

नागपूरचे अनिरुद्ध, विकास यांची यशस्वी कामगिरी नागपूर: मध्य भारतात सायकल चालविण्याच्या परंपरेत मानाचा तुरा रोवताना विकास पात्रा आणि अनिरुद्ध या ‘नागपूर रँडोनियर्स’च्या

ऑनलाइन लोकमत
ब्रेव्हेट, दि. 02 - मध्य भारतात सायकल चालविण्याच्या परंपरेत मानाचा तुरा रोवताना विकास पात्रा आणि अनिरुद्ध या ‘नागपूर रँडोनियर्स’च्या सदस्यांनी मंगळवारी १२०० किमी सायकल ब्रेव्हेट यशस्वीरीत्या पूर्ण केली. अशी कामगिरी करणारी या विभागातील ही पहिलीच जोडी आहे.
दिल्ली रँडोनियर्सने या ब्रेव्हटचे आयोजन केले होते. शनिवारी पहाटे ५ वाजता सुरू झालेली ही शर्यत मंगळवारी संपली. दिल्ली-उदयपूर-दिल्ली असा प्रवास ९० तासांत पूर्ण करायचा होता. विकास आणि अनिरुद्ध यांनी ८१ तासात हे अंतर गाठले. दोघांनी ४७ तास ३७ मिनिटे पहाटेच्या वेळी प्रवास केला.
सायकलिंगचा सरासरी वेग प्रतिताशी २५.४ किमी असा होता. लांब पल्ल्याच्या सायकलिंगला ब्रेव्हेट संबोधले जाते. आॅडकक्स पॅरिसशी संलग्न असलेल्या आॅडक्स इंडियातर्फे हे आयोजन होत असून २०० किमीसाठी १३.५ तास, ३०० किमीसाठी २० तास, ४०० किमीसाठी २७ तास, ६०० किमीसाठी ४० तास, एक हजार किमीसाठी ७५ तास आणि १२०० किमीसाठी ९० तास अशी वेळ निर्धारित करण्यात येते.
त्रिमूर्तीनगरच्या ‘एनसायक्लोपीडिया’ या आंतरराष्टÑीय सायकल शॉपचे मालक असलेल्या अनिरुद्धने या मोहिमेत संवादासाठी बाईकचे सहकार्य घेतले. अनिरुद्ध आणि आयटी तज्ज्ञ असलेला विकास हे दैनंदिन व्यवहारात सायकलला प्राधान्य देतात. अनिरुद्धने गेली दोन वर्षे सुपर रँडोनियर्स (कॅलेंडर वर्षांत २००, ३००, ४०० आणि ६०० किमी प्रवास पूर्ण करणारे) होण्याचा मान संपादन केला असून विकासदेखील यंदा सुपर रँडोनियस बनण्याच्या वाटेवर आहे.
१२०० किमीसाठी १३ स्पर्धकांनी नावे नोंदविली होती. त्यातील प्रत्येकी दोन हैदराबाद आणि बेंगळुरू येथील स्पर्धक होते. दोन नागपूरचे तर उर्वरित स्पर्धक दिल्लीतील होते. एका महिलेसह दहा जणांनी वेळेत स्पर्धा पूर्ण केली. दोघे स्पर्धक सुरुवात करू शकले नाहीत तर एका स्पर्धकाने मध्येच स्पर्धा सोडून दिली. चौपदरी महामार्गावर भरधाव वाहनांशी स्पर्धा करीत या दोन्ही स्पर्धकांनी खाण्यापिण्याची तसेच झोपेची पर्वा न करता सरशी साधली हे विशेष.