शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Maharashtra Election 2019; उपराजधानीतील ५६ उमेदवारांच्या प्रचारासाठी सोशल मिडियावर ११७६ जण सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 11:50 IST

नागपुरातील ५६ उमेदवार सोशल मीडियावर सक्रिय आहे. ते स्वत:च प्रचार करीत आहेत. या उमेदवारांसोबतच ११७६ लोक सुद्धा त्यांचा प्रचार करीत आहेत.

ठळक मुद्देसोशल मीडियावरील प्रचारावर वॉच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणूक प्रचारासाठी आता केवळ चार दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष व उमेदवारांचा प्रचार जोरात सुरु आहे. राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा, पदयात्रा, कॉर्नर मिटिंगसह सोशल मीडियावर सुद्धा उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. निवडणूक विभागाच्या सायबर सेलची सोशल मीडियावर बारीक नजर आहे.याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत अधिक माहिती देताना सांगितले की, सोशल मीडियावर उमेदवार प्रचार करीत असतात. यात कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होऊ नये म्हणून सायबर सेलची बारीक नजर आहे. यासाठी सायबर सेलची स्वतंत्र टीम काम करीत आहे. नागपुरातील ५६ उमेदवार सोशल मीडियावर सक्रिय आहे. ते स्वत:च प्रचार करीत आहेत. या उमेदवारांसोबतच ११७६ लोक सुद्धा त्यांचा प्रचार करीत आहे. या सर्वांच्या प्रत्येक पोस्टवर बारीक नजर ठेवली जात आहे. कुणाच्याही व्यक्तिगत किंवा धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याकडे सायबर सेल नजर ठेवून आहे. कुठलीही आक्षेपार्ह बाब दिसून आली की, लगेच त्याची दखल घेतली जाते. संबंधितांना बोलावून स्पष्टीकरण मागविले जात आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील पोस्टवर नजर ठेवणे मात्र कठीण जात आहे. यावरील पोस्टबाबत एखाद्याने तक्रार केली तरच कारवाई शक्य असल्याचेही जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके उपस्थित होते.तीन गुन्हे दाखलसोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याबाबत आतापर्यंत तीन प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हे तिन्ही गुन्हे तक्रार केल्यानंतरच दाखल झाले. एक सावनेर, दुसरे नंदनवन आणि तिसरे प्रतापनगर पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.१७५ उमेदवारांकडून आलेल्या जाहिरातींचे प्रमाणिकरणनिवडणूक आयोगाने उमेदवारांच्या प्रचाराची प्रत्येक जाहिरात ही प्रमाणित करूनच प्रकाशित व्हावी, यासाठी एमसीएमसी कमिटी गठित केली आहे. या कमिटीने प्रमाणित केल्यावरच उमेदवाराच्या प्रचाराचे साहित्य प्रकाशित केले जाते. आतापर्यंत १७५ उमेदवारांकडून आलेल्या जाहिरातींचे प्रमाणिकरण करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Social Mediaसोशल मीडिया