शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

एका कोचमध्ये ११० प्रवासी; जीव गुदमरल्यामुळे एकाचा गेला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनामुळे कन्फर्म आणि आरएसी (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवासाची मुभा आहे. परंतु रेल्वे प्रशासनाच्या गलथान ...

नागपूर : कोरोनामुळे कन्फर्म आणि आरएसी (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवासाची मुभा आहे. परंतु रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे एका प्रवाशाला जीव गमावण्याची वेळ आली. एर्नाकुलम-पटना एक्स्प्रेसमध्ये जीव गुदमरल्यामुळे एका प्रवाशाचा नागपूर रेल्वेस्थानकावर जीव गेला. ही घटना सकाळी ७ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर घडली.

बखोरी शिवान पासवान (७०, रा. गाव सुमेरा, पोस्ट मद्दमपूर, जि. जहानाबाद, बिहार) असे मृत झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. ते रेल्वेगाडी क्रमांक ०६३५९ एर्नाकुलम-पटना एक्स्प्रेसने प्रवास करीत होते. दीड महिन्यांपासून त्यांची प्रकृती खराब होती. त्यांच्यासोबत मुलगा सत्येंद्र (३२) हा प्रवास करीत होता. ते एस ८ कोचमध्ये ४० क्रमांकाच्या बर्थवर होते. कोचमध्ये जवळपास ११० प्रवासी असल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर सकाळी ७ वाजता आली. बखोरी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांच्या मुलाने नागपूर रेल्वेस्थानकावरून गाडी सुटताच गाडीची चेन ओढून गाडी थांबविली. त्याने वडिलांना खाली उतरविले. परंतु प्लॅटफार्मवर उतरविताच त्यांचा जीव गेला. त्यानंतर रेल्वेचे डॉक्टर प्लॅटफार्मवर पोहोचले. त्यांनी संबंधित प्रवाशास तपासून मृत घोषित केले. त्यानंतर लोहमार्ग पोलीस रवींद्र फुसाटे यांनी संबंधित प्रवाशाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात नेला. संबंधित प्रवाशाला कोरोना होता काय याचा अहवाल शवविच्छेदनानंतर येणार आहे.

................

एका कोचमध्ये एवढे प्रवासी कसे?

कोरोनामुळे सध्या कन्फर्म किंवा आरएसी तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची मुभा देण्यात येत आहे. परंतु एर्नाकुलम-पटना या गाडीत एस ८ कोचमध्ये ७२ प्रवाशांना प्रवासाची मुभा असताना ११० प्रवासी कोचमध्ये कसे होते हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नागपूर विभागातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी ही गाडी इतर विभागातील असल्यामुळे त्यांनी एवढे प्रवासी कसे बसविले याचे उत्तर देण्याचे टाळले.

.........

केवळ कन्फर्म, आरएसी तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवासाची मुभा

नागपूर विभागातून जाणाऱ्या रेल्वेगाड्यात केवळ कन्फर्म आणि आरएसी असलेल्या प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्यात येते. रितसर त्यांचे तापमान मोजून रेल्वेस्थानकाच्या आत सोडण्यात येते.

-एस. जी. राव. सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

.............