शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

११ हजार प्रकरणे निकाली

By admin | Updated: December 13, 2015 02:55 IST

राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण, राज्य विधीसेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी...

राष्ट्रीय लोक अदालत : राष्ट्रीय, राज्य व जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचा पुढाकारनागपूर : राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण, राज्य विधीसेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १० हजार ९७४ प्रकरणे आपसी समझोत्याने निकाली काढण्यात आली. लोक अदालतीपुढे २१ हजार ५३७ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ११ हजार ४१४ प्रलंबित आणि १० हजार २३ प्रकरणे वाद दाखलपूर्व होती. त्यापैकी १० हजार ९७४ प्रकरणे निकाली निघाली. यात ८ हजार १५३ प्रलंबित आणि २ हजार ८२१ दाखलपूर्व प्रकरणे आहेत. विशेष मोहिमेंतर्गत ६ हजार ९१७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. मोटार अपघात दावा प्रकरणांमधील तडजोड रक्कम १० कोटी २५ लाख ४४ हजार ५१० रुपये होती. केवळ दंड म्हणून १ कोटी १ लाख ७५ हजार ५७१ रुपये वसूल करण्यात आले. भूसंपादन, मोटार अपघात दावे, धनादेश अनादर प्रकरण, दाखलपूर्व वसुली दावे आणि दंड, अशी ४६ कोटी ७७ लाख २० हजार ८३० रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. मोटार अपघात दाव्याच्या लता बिसेन विरुद्ध सेवकराम आणि श्रीराम जनरल इन्श्युरन्स या प्रकरणात ६० लाखांची नुकसान भरपाई तडजोडीने ५८ लाख रुपये झाली होती. अ‍ॅड. पी. एस. मिराचे आणि मोनाली पठाडे यांनी हे प्रकरण हाताळले. ही संपूर्ण प्रकरणे हाताळण्यासाठी २७ पॅनल तयार करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांनी सर्व पॅनल्सना भेटी दिल्या होत्या. न्यायिक अधिकारी पी. एस. तरारे, व्ही. टी. सूर्यवंशी, एम. एस. आझमी, व्ही. सी. बरडे, एम. टी. आसिम, डी. डी. कोचे, कुणाल जाधव, जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे, डीबीएचे अध्यक्ष प्रकाश जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)रेशीमगाठी जुळल्या, सात दाम्पत्य लागले संसारालाकेवळ मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून कधी काळी तुटलेल्या रेशीमगाठी पुन्हा जुळल्या. ही किमया कौटुंबिक न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये झाली. अदालतीसमोर आलेल्या एकूण १०१ दाव्यांपैकी सात दाम्पत्य (१४ पक्षकार) हे पुन्हा आपापल्या संसाराला लागले. आई-वडिलाविना भकास आयुष्य जगणाऱ्या मुलांना त्यांचे आई-बाबा मिळाले. त्यामुळे या सर्वांच्या चेहऱ्यांवर ओसंडून वाहत असलेला आनंद हा नि:शब्द होता.काही दाव्यांमध्ये खावटीची तडजोड होऊन सामंजस्याने निपटारा करण्यात आला. खावटीचे एकूण सहा दावे निकाली निघाले. येथील लोक अदालतीच्या चार पॅनलवर न्यायाधीश पलक जमादार, प्रशांत अग्निहोत्री, निवृत्त न्यायाधीश पी. ए. मार्कंडेयवार, बी. पी. ठाकर, अ‍ॅड. रश्मी खापर्डे, अ‍ॅड. स्मिता देशपांडे, अ‍ॅड. अनुराग भलोटिया, अ‍ॅड. सोनल राऊत, समुपदेशक शंकर पांडे, डॉ. मंजूषा कानडे, आर. आर. कोतवाल, संगीता पांडे, झरिना मेहंदी रयानी, एस. डी. भावे, अजय मार्डीकर, डॉ. नंदश्री भुरे आदी होते. कौटुंबिक न्यायालयाच्या ठिकाणी प्रभारी प्रधान न्यायाधीश सुभाष काफरे, न्यायाधीश धवस, एस. व्ही. थोडगे आणि विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल जाधव उपस्थित होते. व्यवस्थापक रसिका कस्तुरे यांचे आयोजन उत्तम होते.