शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

११ हजार प्रकरणे निकाली

By admin | Updated: December 13, 2015 02:55 IST

राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण, राज्य विधीसेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी...

राष्ट्रीय लोक अदालत : राष्ट्रीय, राज्य व जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचा पुढाकारनागपूर : राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण, राज्य विधीसेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १० हजार ९७४ प्रकरणे आपसी समझोत्याने निकाली काढण्यात आली. लोक अदालतीपुढे २१ हजार ५३७ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ११ हजार ४१४ प्रलंबित आणि १० हजार २३ प्रकरणे वाद दाखलपूर्व होती. त्यापैकी १० हजार ९७४ प्रकरणे निकाली निघाली. यात ८ हजार १५३ प्रलंबित आणि २ हजार ८२१ दाखलपूर्व प्रकरणे आहेत. विशेष मोहिमेंतर्गत ६ हजार ९१७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. मोटार अपघात दावा प्रकरणांमधील तडजोड रक्कम १० कोटी २५ लाख ४४ हजार ५१० रुपये होती. केवळ दंड म्हणून १ कोटी १ लाख ७५ हजार ५७१ रुपये वसूल करण्यात आले. भूसंपादन, मोटार अपघात दावे, धनादेश अनादर प्रकरण, दाखलपूर्व वसुली दावे आणि दंड, अशी ४६ कोटी ७७ लाख २० हजार ८३० रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. मोटार अपघात दाव्याच्या लता बिसेन विरुद्ध सेवकराम आणि श्रीराम जनरल इन्श्युरन्स या प्रकरणात ६० लाखांची नुकसान भरपाई तडजोडीने ५८ लाख रुपये झाली होती. अ‍ॅड. पी. एस. मिराचे आणि मोनाली पठाडे यांनी हे प्रकरण हाताळले. ही संपूर्ण प्रकरणे हाताळण्यासाठी २७ पॅनल तयार करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांनी सर्व पॅनल्सना भेटी दिल्या होत्या. न्यायिक अधिकारी पी. एस. तरारे, व्ही. टी. सूर्यवंशी, एम. एस. आझमी, व्ही. सी. बरडे, एम. टी. आसिम, डी. डी. कोचे, कुणाल जाधव, जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे, डीबीएचे अध्यक्ष प्रकाश जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)रेशीमगाठी जुळल्या, सात दाम्पत्य लागले संसारालाकेवळ मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून कधी काळी तुटलेल्या रेशीमगाठी पुन्हा जुळल्या. ही किमया कौटुंबिक न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये झाली. अदालतीसमोर आलेल्या एकूण १०१ दाव्यांपैकी सात दाम्पत्य (१४ पक्षकार) हे पुन्हा आपापल्या संसाराला लागले. आई-वडिलाविना भकास आयुष्य जगणाऱ्या मुलांना त्यांचे आई-बाबा मिळाले. त्यामुळे या सर्वांच्या चेहऱ्यांवर ओसंडून वाहत असलेला आनंद हा नि:शब्द होता.काही दाव्यांमध्ये खावटीची तडजोड होऊन सामंजस्याने निपटारा करण्यात आला. खावटीचे एकूण सहा दावे निकाली निघाले. येथील लोक अदालतीच्या चार पॅनलवर न्यायाधीश पलक जमादार, प्रशांत अग्निहोत्री, निवृत्त न्यायाधीश पी. ए. मार्कंडेयवार, बी. पी. ठाकर, अ‍ॅड. रश्मी खापर्डे, अ‍ॅड. स्मिता देशपांडे, अ‍ॅड. अनुराग भलोटिया, अ‍ॅड. सोनल राऊत, समुपदेशक शंकर पांडे, डॉ. मंजूषा कानडे, आर. आर. कोतवाल, संगीता पांडे, झरिना मेहंदी रयानी, एस. डी. भावे, अजय मार्डीकर, डॉ. नंदश्री भुरे आदी होते. कौटुंबिक न्यायालयाच्या ठिकाणी प्रभारी प्रधान न्यायाधीश सुभाष काफरे, न्यायाधीश धवस, एस. व्ही. थोडगे आणि विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल जाधव उपस्थित होते. व्यवस्थापक रसिका कस्तुरे यांचे आयोजन उत्तम होते.