शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर लक्ष ठेवण्यासाठी देशात १०९ केंद्रे : हायकोर्टात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 21:09 IST

जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर लक्ष ठेवण्यासाठी देशभरात १०९ केंद्रे कार्यरत असून त्यापैकी ४ केंद्रे महाराष्ट्रात आहेत. ही केंद्रे एकूण २२ जीवनावश्यक वस्तूंच्या दैनंदिन किमतीवर सूक्ष्म नजर ठेवून असतात. एखाद्या जीवनावश्यक वस्तूची किंमत अनियमित पद्धतीने वाढताना दिसल्यास केंद्र सरकार त्याबाबत आवश्यक उपाययोजना करते अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला सोमवारी देण्यात आली.

ठळक मुद्देआवश्यक तेव्हा उपाययोजना केल्या जातात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर लक्ष ठेवण्यासाठी देशभरात १०९ केंद्रे कार्यरत असून त्यापैकी ४ केंद्रे महाराष्ट्रात आहेत. ही केंद्रे एकूण २२ जीवनावश्यक वस्तूंच्या दैनंदिन किमतीवर सूक्ष्म नजर ठेवून असतात. एखाद्या जीवनावश्यक वस्तूची किंमत अनियमित पद्धतीने वाढताना दिसल्यास केंद्र सरकार त्याबाबत आवश्यक उपाययोजना करते अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला सोमवारी देण्यात आली.जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल आग्रे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्या प्रकरणात केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली. त्यानंतर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी यासह अन्य मुद्दे लक्षात घेता जनहित याचिका निकाली काढली. केंद्र सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गरजू व्यक्तींना स्वस्त दरात खाद्यान्न पुरवठा करते. तसेच, राज्य सरकारेही त्यांच्या इच्छेनुसार आवश्यक वस्तूंचा पुरवठा करू शकतात. मागणी व पुरवठ्यातील तफावत, साठेबाजी, विक्रेत्यांचे संगनमत, नफाखोरी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमतवाढ इत्यादी कोणत्याही कारणामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या कि मतीत अनियमित वाढ झाल्यास केंद्र सरकारद्वारे आवश्यक उपाययोजना केल्या जातात. त्यासंदर्भात राज्य सरकारना आवश्यक आदेश दिले जातात असेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले होते. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. संतोष चांडे व अ‍ॅड. राजू कडू तर, केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. मुग्धा चांदूरकर यांनी कामकाज पाहिले.असे होते याचिकाकर्त्याचे म्हणणेव्यापारी अधिक नफा कमविण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवतात. बाजारातील किंमत वाढल्यानंतर तो साठा बाहेर काढला जातो. अशा व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. परंतु, सरकार काहीच करीत नाही. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सतत वाढत आहेत. लोकांच्या कमाईचा मोठा भाग या वस्तू खरेदी करण्यावर खर्च होत आहे. महागाईमुळे अनेकांना या वस्तू खरेदी करणे शक्य होत नाही. परिणामी, त्यांना आरोग्यविषयक समस्या सहन कराव्या लागतात असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार