शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

१०८ वी इंडियन सायन्स कॉँग्रेस; छत्रपती शिवरायांचे पहिले पत्र आणि कुराणाची दुर्मीळ प्रत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2023 08:45 IST

Nagpur News १०८व्या ‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’मध्ये केवळ विज्ञान व तंत्रज्ञान याच्यावरच भर देण्यात आलेला नाही. तर देशातील प्राचीन हस्तलिखितांचे संवर्धन कशा प्रकारे होत आहे, याचीदेखील माहिती मिळत आहे.

ठळक मुद्दे‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’मध्ये प्राचीन हस्तलिखितांचे प्रदर्शन ‘आरएफआरएफ’चा पुढाकार

योगेश पांडे

नागपूर : १०८व्या ‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’मध्ये केवळ विज्ञान व तंत्रज्ञान याच्यावरच भर देण्यात आलेला नाही. तर देशातील प्राचीन हस्तलिखितांचे संवर्धन कशा प्रकारे होत आहे, याचीदेखील माहिती मिळत आहे. तेथील ‘आरएफआरएफ’च्या दालनात छत्रपती शिवरायांचे पहिले पत्र आणि कुराणाची सोन्याच्या शाईने लिहिलेली दुर्मीळ प्रतदेखील ठेवण्यात आली आहे.

‘आरएफआरएफ’ (रिसर्च फॉर रिसर्च फाउंडेशन) ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय शिक्षण मंडळाअंतर्गत कार्य करणारी संस्था असून जगभरातील हजारो हस्तलिखिते, दुर्मीळ नाणी एकत्रित केली आहेत. त्यांतील निवडक गोष्टी प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडित अनेक हस्तलिखिते तेथे आहेत. त्यांचे शेवटचे पत्रदेखील प्रदर्शनीत ठेवण्यात आले आहे. याशिवाय त्यांचे मूळ छायाचित्रदेखील आहे. सोबतच ताडपत्रींवर लिहिलेले ग्रंथ, अकराशे वर्षांअगोदरची हस्तलिखिते, अनेक मुघलकालीन दस्तऐवजदेखील उपलब्ध आहेत. ‘आरएफआरएफ’कडे भारतीय इतिहास, धर्म आणि प्राचीन भारतातील विज्ञानाशी निगडित साडेपंधरा हजार हस्तलिखिते आहेत.

या हस्तलिखितांमध्ये नंदीनागरी लिपीत लिहिलेले ग्रंथ असून त्यात नदीमाहात्म्याचाही समावेश आहे. अनेक हस्तलिखिते तर अद्यापही अप्रकाशित आहेत. याशिवाय अगदी प्राचीन काळापासूनची साडेचार हजार नाणीदेखील उपलब्ध आहेत. यात दोन हजार वर्षांअगोदरच्या ठेव्याचादेखील समावेश आहे.

नागपूरचा इतिहासही अप्रकाशित

एका हस्तलिखितामध्ये नागपूरचा जुना इतिहासदेखील आहे. त्याचे भाषांतर करून त्याचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या हस्तलिखितांची शासकीय पातळीवर नोंदणीदेखील झाली असून, त्या माध्यमातून संशोधकांना मंच उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कुराणच्या चार प्रतींपैकी एक नागपुरात

जतन करण्यात आलेल्या सोन्याच्या शाईने लिहिलेल्या दुर्मीळ कुराणाच्या जगभरात चारच प्रती आहेत. त्यांपैकी एक प्रत नागपुरातील प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. ती पाहण्यासाठी अनेक मुस्लिम देशांचे नेतेदेखील संस्थेकडे पोहोचले होते. सोन्याच्या शाईने हे कुराण १६व्या शतकात लिहिले गेले. जगात कुराणाच्या अशा फक्त चार प्रती आहेत. या कुराणच्या तळटिपा नस्तालिक लिपीत असून नस्तालिक आणि तुसी या दोन लिपी पर्शियन भाषेत वापरल्या जातात. या पवित्र कुराणमध्ये ३८५ पाने असल्याचे बोबडे यांनी सांगितले. पण आकार लहान असूनही यांपैकी कोणत्याही पानावर एकही चूक नाही, अशी माहिती ‘आरएफआरएफ’च्या नॉलेज रिसोर्स सेंटरचे संचालक भुजंग बोबडे यांनी दिली. कुराणची प्रत हैदराबादच्या निजामाच्या दिवाणाच्या कुटुंबाने त्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :scienceविज्ञानShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज