शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

१०८ वी इंडियन सायन्स कॉँग्रेस; छत्रपती शिवरायांचे पहिले पत्र आणि कुराणाची दुर्मीळ प्रत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2023 08:45 IST

Nagpur News १०८व्या ‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’मध्ये केवळ विज्ञान व तंत्रज्ञान याच्यावरच भर देण्यात आलेला नाही. तर देशातील प्राचीन हस्तलिखितांचे संवर्धन कशा प्रकारे होत आहे, याचीदेखील माहिती मिळत आहे.

ठळक मुद्दे‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’मध्ये प्राचीन हस्तलिखितांचे प्रदर्शन ‘आरएफआरएफ’चा पुढाकार

योगेश पांडे

नागपूर : १०८व्या ‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’मध्ये केवळ विज्ञान व तंत्रज्ञान याच्यावरच भर देण्यात आलेला नाही. तर देशातील प्राचीन हस्तलिखितांचे संवर्धन कशा प्रकारे होत आहे, याचीदेखील माहिती मिळत आहे. तेथील ‘आरएफआरएफ’च्या दालनात छत्रपती शिवरायांचे पहिले पत्र आणि कुराणाची सोन्याच्या शाईने लिहिलेली दुर्मीळ प्रतदेखील ठेवण्यात आली आहे.

‘आरएफआरएफ’ (रिसर्च फॉर रिसर्च फाउंडेशन) ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय शिक्षण मंडळाअंतर्गत कार्य करणारी संस्था असून जगभरातील हजारो हस्तलिखिते, दुर्मीळ नाणी एकत्रित केली आहेत. त्यांतील निवडक गोष्टी प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडित अनेक हस्तलिखिते तेथे आहेत. त्यांचे शेवटचे पत्रदेखील प्रदर्शनीत ठेवण्यात आले आहे. याशिवाय त्यांचे मूळ छायाचित्रदेखील आहे. सोबतच ताडपत्रींवर लिहिलेले ग्रंथ, अकराशे वर्षांअगोदरची हस्तलिखिते, अनेक मुघलकालीन दस्तऐवजदेखील उपलब्ध आहेत. ‘आरएफआरएफ’कडे भारतीय इतिहास, धर्म आणि प्राचीन भारतातील विज्ञानाशी निगडित साडेपंधरा हजार हस्तलिखिते आहेत.

या हस्तलिखितांमध्ये नंदीनागरी लिपीत लिहिलेले ग्रंथ असून त्यात नदीमाहात्म्याचाही समावेश आहे. अनेक हस्तलिखिते तर अद्यापही अप्रकाशित आहेत. याशिवाय अगदी प्राचीन काळापासूनची साडेचार हजार नाणीदेखील उपलब्ध आहेत. यात दोन हजार वर्षांअगोदरच्या ठेव्याचादेखील समावेश आहे.

नागपूरचा इतिहासही अप्रकाशित

एका हस्तलिखितामध्ये नागपूरचा जुना इतिहासदेखील आहे. त्याचे भाषांतर करून त्याचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या हस्तलिखितांची शासकीय पातळीवर नोंदणीदेखील झाली असून, त्या माध्यमातून संशोधकांना मंच उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कुराणच्या चार प्रतींपैकी एक नागपुरात

जतन करण्यात आलेल्या सोन्याच्या शाईने लिहिलेल्या दुर्मीळ कुराणाच्या जगभरात चारच प्रती आहेत. त्यांपैकी एक प्रत नागपुरातील प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. ती पाहण्यासाठी अनेक मुस्लिम देशांचे नेतेदेखील संस्थेकडे पोहोचले होते. सोन्याच्या शाईने हे कुराण १६व्या शतकात लिहिले गेले. जगात कुराणाच्या अशा फक्त चार प्रती आहेत. या कुराणच्या तळटिपा नस्तालिक लिपीत असून नस्तालिक आणि तुसी या दोन लिपी पर्शियन भाषेत वापरल्या जातात. या पवित्र कुराणमध्ये ३८५ पाने असल्याचे बोबडे यांनी सांगितले. पण आकार लहान असूनही यांपैकी कोणत्याही पानावर एकही चूक नाही, अशी माहिती ‘आरएफआरएफ’च्या नॉलेज रिसोर्स सेंटरचे संचालक भुजंग बोबडे यांनी दिली. कुराणची प्रत हैदराबादच्या निजामाच्या दिवाणाच्या कुटुंबाने त्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :scienceविज्ञानShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज