शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

विदर्भ-मराठवाड्यातील १०८ सिंचन प्रकल्प वर्षभरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 19:51 IST

महाराष्ट्रातील सिंचन क्षमता १८ टक्क्यापासून ५० टक्केपर्यंत नेण्यासाठी केंद्रीय जल संसाधन मंत्रालय व महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असून निधीअभावी रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी नाबार्ड व केंद्र शासनातर्फे निधी पुरवला जात आहे. बळीराजा संजीवनी योजनेंतर्गत विदर्भ व मराठवाड्यातील १०८ सिंचन प्रकल्पासाठी सुमारे आठ हजार कोटी मंजूर झाले आहेत. या सर्व प्रकल्पांच्या प्रगतीसंदर्भात नुकतीच आपण कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आहे व हे प्रकल्प एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देशही दिले आहेत, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी आणि जलसंपदा, नदी विकास, गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.

ठळक मुद्देनितीन गडकरी : नाबार्डच्या ‘पाण्याचा कार्यक्षम वापर’ मोहिमेचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील सिंचन क्षमता १८ टक्क्यापासून ५० टक्केपर्यंत नेण्यासाठी केंद्रीय जल संसाधन मंत्रालय व महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असून निधीअभावी रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी नाबार्ड व केंद्र शासनातर्फे निधी पुरवला जात आहे. बळीराजा संजीवनी योजनेंतर्गत विदर्भ व मराठवाड्यातील १०८ सिंचन प्रकल्पासाठी सुमारे आठ हजार कोटी मंजूर झाले आहेत. या सर्व प्रकल्पांच्या प्रगतीसंदर्भात नुकतीच आपण कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आहे व हे प्रकल्प एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देशही दिले आहेत, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी आणि जलसंपदा, नदी विकास, गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.वानाडोंगरी हिंगणा येथील वाय. सी. सी. ई. कॅम्पसमधील दत्ता मेघे सभागृहात नाबार्डतर्फे (राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक) ‘पाण्याचा कार्यक्षम वापर’ या जलसंवर्धनासाठीच्या मोहिमेचा नागपूर जिल्ह्यात शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मोहिमेच्या जनजागृतीसाठी एका ‘व्हॅन’ला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, नाबार्डच्या महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य महाव्यवस्थापक यू. डी. शिरसाळकर, नाबार्डच्या उपव्यवस्थापक उषामणी प्रामुख्याने उपस्थित होते.वर्धा येथील तामसवाडामध्ये ९ कि. मी. लांबीच्या चेकडॅममुळे व तामसवाड्याच्या नाला खोलीकरणामुळे या क्षेत्रातील शेतकऱ्यांचे जीवनमान समृद्ध झाले असून या प्रकारचे २१ प्रकल्प आपण वर्धा जिल्ह्यात राबवत आहोत, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात जलसंवर्धनासाठी ‘ब्रीज-कम-बंधारे’ १७० ठिकाणी बांधण्यात येणार असून त्यातील तीन बंधारे हे लातूरला बांधले जातील, असेही सांगितले.लुप्त झालेली कमळगंगा नदी पुन्हा प्रवाहितराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला नाले, तलाव यांच्या खोलीकरणातून मिळालेल्या माती व मुरुमाचा वापर करण्याचे निर्देश आपण दिले, त्यामुळे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमधील कमळगंगा ही लुप्त झालेली नदी खोलीकरण व रुंदीकरणामुळे पुन्हा प्रवाहित झाली व २० कि.मी. रुंदही झाली. त्यामुळे या परिसरातील पाण्याची क्षमता वाढून शेती समृद्ध झाली असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पNitin Gadkariनितीन गडकरी