शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

१०३ वा दीक्षांत समारंभ १९ नोव्हेंबर रोजी

By admin | Updated: October 14, 2016 03:24 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०३ वा दीक्षांत समारंभाचा मुहूर्त कधी निघणार याची विद्यार्थी आतुरतेने प्रतीक्षा करीत होते.

नागपूर विद्यापीठ : ‘इस्रो’चे अध्यक्ष ए. एस. किरण कुमार मुख्य अतिथीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०३ वा दीक्षांत समारंभाचा मुहूर्त कधी निघणार याची विद्यार्थी आतुरतेने प्रतीक्षा करीत होते. अखेर या समारंभासाठी १९ नोव्हेंबर ही तारीख अंतिम करण्यात आली आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’चे अध्यक्ष ए.एस. किरण कुमार हे या समारंभाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.मागील वर्षी विद्यापीठातील प्राधिकरणे बरखास्त करण्यात आली होती. पदावर असलेले अधिकारी व नामनियुक्त सदस्य यांच्या भरवशावर विद्यापीठाच्या प्राधिकरणांचे कामकाज सुरू आहे. अशा स्थितीत विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ लांबणार की काय अशी शंका उत्पन्न होत होती. परंतु मुंबईसह राज्यातील विविध विद्यापीठांनी दीक्षांत समारंभ घेण्यासाठी पावले उचलली. त्यामुळे विद्यार्थीहित लक्षात घेता नागपूर विद्यापीठाकडूनदेखील दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यासाठी १ आॅक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्री ५ आॅक्टोबरपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होत आहेत. ऐन परीक्षेच्या तोंडावर दीक्षांत समारंभ झाला तर त्याचा फटका परीक्षेच्या कामांना बसण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेता दीक्षांत समारंभ पुढे ढकलण्यात आला.परदेशात शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना या वर्षाअखेरीस मूळ पदवी सादर करावी लागणार आहे. अन्यथा त्यांचा प्रवेश रद्द होण्याची भीती आहे. शिवाय विद्यार्थ्यांना आतुरतेने दीक्षांत समारंभाची प्रतीक्षा होतीच व सातत्याने प्रशासनाकडे याबाबत विचारणा करण्यात येत होती. याबाबत अखेर विद्यापीठाने निर्णय घेतला असून १९ नोव्हेंबर रोजी दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.(प्रतिनिधी)‘एलआयटी’त येणार मुकेश अंबानी ?दरम्यान नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित ‘एलआयटी’च्या (लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. या अमृतमहोत्सवी वर्षाचा कार्यक्रम जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून देशातील प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांना बोलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांची वेळ मागण्यात आली असून ते स्वत: ‘केमिकल इंजिनिअर’ असल्याने त्यांच्याकडून होकार मिळेल असा विश्वास असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.