शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
3
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
4
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
5
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
6
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
7
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!
9
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
11
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
12
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
13
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
14
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
15
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
16
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
17
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
18
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
19
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!

१०३ वा दीक्षांत समारंभ १९ नोव्हेंबर रोजी

By admin | Updated: October 14, 2016 03:24 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०३ वा दीक्षांत समारंभाचा मुहूर्त कधी निघणार याची विद्यार्थी आतुरतेने प्रतीक्षा करीत होते.

नागपूर विद्यापीठ : ‘इस्रो’चे अध्यक्ष ए. एस. किरण कुमार मुख्य अतिथीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०३ वा दीक्षांत समारंभाचा मुहूर्त कधी निघणार याची विद्यार्थी आतुरतेने प्रतीक्षा करीत होते. अखेर या समारंभासाठी १९ नोव्हेंबर ही तारीख अंतिम करण्यात आली आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’चे अध्यक्ष ए.एस. किरण कुमार हे या समारंभाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.मागील वर्षी विद्यापीठातील प्राधिकरणे बरखास्त करण्यात आली होती. पदावर असलेले अधिकारी व नामनियुक्त सदस्य यांच्या भरवशावर विद्यापीठाच्या प्राधिकरणांचे कामकाज सुरू आहे. अशा स्थितीत विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ लांबणार की काय अशी शंका उत्पन्न होत होती. परंतु मुंबईसह राज्यातील विविध विद्यापीठांनी दीक्षांत समारंभ घेण्यासाठी पावले उचलली. त्यामुळे विद्यार्थीहित लक्षात घेता नागपूर विद्यापीठाकडूनदेखील दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यासाठी १ आॅक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्री ५ आॅक्टोबरपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होत आहेत. ऐन परीक्षेच्या तोंडावर दीक्षांत समारंभ झाला तर त्याचा फटका परीक्षेच्या कामांना बसण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेता दीक्षांत समारंभ पुढे ढकलण्यात आला.परदेशात शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना या वर्षाअखेरीस मूळ पदवी सादर करावी लागणार आहे. अन्यथा त्यांचा प्रवेश रद्द होण्याची भीती आहे. शिवाय विद्यार्थ्यांना आतुरतेने दीक्षांत समारंभाची प्रतीक्षा होतीच व सातत्याने प्रशासनाकडे याबाबत विचारणा करण्यात येत होती. याबाबत अखेर विद्यापीठाने निर्णय घेतला असून १९ नोव्हेंबर रोजी दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.(प्रतिनिधी)‘एलआयटी’त येणार मुकेश अंबानी ?दरम्यान नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित ‘एलआयटी’च्या (लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. या अमृतमहोत्सवी वर्षाचा कार्यक्रम जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून देशातील प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांना बोलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांची वेळ मागण्यात आली असून ते स्वत: ‘केमिकल इंजिनिअर’ असल्याने त्यांच्याकडून होकार मिळेल असा विश्वास असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.