शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

१,०१४ उद्योगांना तीन वर्षापासून वीजजोडणीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 12:05 IST

Electricity, Industry, Nagpur News उद्योगांनी मैत्री पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केले आहेत. दोन ते तीन वर्षापूर्वी या उद्योगांनी मागणी नोंदविली होती. मात्र महावितरणकडून जोडण्या मिळाल्याच नाही.

ठळक मुद्देमैत्री पोर्टलवर निवेदने प्रतीक्षेतमहावितरणच्या नुकसानीला जबाबदार कोण?

कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील १ हजार १४ उद्योग मागील तीन वर्षांपासून विद्युत जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. उद्योगांना वाव देण्याचे राज्य सरकारकडून वारंवार सांगितले जात असतानाही राज्यात ही परिस्थिती आहे. एक खिडकीमधून सर्व कामे होतील, असे सांगण्यात आले असले तरी, परिस्थिती वेगळी आहे.

या सर्व उद्योगांनी मैत्री पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केले आहेत. दोन ते तीन वर्षापूर्वी या उद्योगांनी मागणी नोंदविली होती. मात्र महावितरणकडून जोडण्या मिळाल्याच नाही. या विषयावरील तक्रारी वाढल्यावर महावितरण कंपनी आता कुठे जागी झाली आहे. अर्जदारांना टेलिफोनवरून कॉल केला जात आहे. जोडणी न मिळाल्याने आता अन्य माध्यमातून वीज घेत असल्याचे बहुतेक उद्योगांनी सांगितले आहे. काहींनी जुन्याच जोडण्यांवर लोड वाढवून काम सुरू केले. मात्र विद्युत वितरण कंपनीतील अधिकाऱ्यांचे म्हणणे वेगळे आहे. जोडण्या न वाटण्यात आल्याची पोर्टलवरील माहिती अपुरी आहे. प्रत्यक्षात उद्योगांनी अर्ज केले, मात्र आवश्यक ती कागदपत्रे अपलोड न केल्याने जोडण्या देण्यात आल्या नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.कपात अभियंत्यांच्या वेतनातून?महावितरणने हा विषय आता गंभीरपणे घेतला आहे. कंपनीचे जॉइंट एम.डी. डॉ. नरेश गीते म्हणाले, पोर्टलवर अर्ज करूनही जोडण्या न दिल्याने महावितरणचे एक प्रकारे नुकसानच झाले आहे. ही नुकसान भरपाई संबंधित अभियंत्यांच्या वेतनातून कपात करायला हवी. 

 

टॅग्स :electricityवीज