शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

सोनेगाव तलाव १०० टक्के प्रदूषणमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:21 IST

गणपती विसर्जनामुळे तलाव मोठ्या प्रमाणात प्रदूषित होतात. तलाव प्रदूषित झाल्याने त्याचा परिणाम तलावातील जीवजंतूवर होतो, मासे मरतात, दुर्गंधी पसरते.

ठळक मुद्देविसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती : ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणपती विसर्जनामुळे तलाव मोठ्या प्रमाणात प्रदूषित होतात. तलाव प्रदूषित झाल्याने त्याचा परिणाम तलावातील जीवजंतूवर होतो, मासे मरतात, दुर्गंधी पसरते. तलावातील प्रदूषण काढण्यासाठी मनपाची मोठी यंत्रणा कामाला लागली. या सर्व गोष्टी थांबविण्यासाठी आणि भाविकांच्या श्रद्धेलाही तडा जाऊ न देता ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशन या संस्थेने सोनेगाव तलावावर कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे आणि तेही कायमची. त्यामुळे सोनेगाव तलाव १०० टक्के प्रदूषणमुक्त होईल, असा दावा संस्थेचे अध्यक्ष आमदार अनिल सोले यांनी केला. आमदार सोले यांच्या मार्गदर्शनात येथे मूर्ती विसर्जनाचे कार्य सुरू आहे.सोनेगाव तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी घालण्यात आल्याने तलावाच्या सभोवताल टिनाचे कुंपण घालण्यात आले आहे. हा ऐतिहासक तलाव आहे. विसर्जनामुळे हा तलाव प्रदूषित होऊ नये व भाविकांनाही गणपतीचे विसर्जन करताना पारंपरिक पद्धतीने विसर्जन झाले ही भावना व्हावी, या उद्देशाने कृत्रिम तलाव बांधण्यात आला. तलावाच्या काठावर असलेल्या ९० फूट लांब व ३० फूट रुंद आणि १५ फूट खोल असा खड्डा तयार करण्यात आला. या खड्ड्यात तलावातील पाणी साठविण्यात आले. त्याला एका छोट्या तलावाचे रूप देण्यात आले.विसर्जनासाठी कायमची सोय करण्यात आली. दीड दिवसाच्या गणपतीपासून येथे विसर्जनाला सुरुवात झाली आहे.रविवारपर्यंत येथे किमान ६,००० च्या जवळपास गणपतीचे विसर्जन झाले आहे. असे असतानाही या कृत्रिम तलावात निर्माल्याचा सडा पडलेला दिसत नाही. तलावाच्या बाजूला निर्माल्य क लश ठेवण्यात आले आहेत. संस्थेचे सदस्य निर्माल्य संकलनाचे कार्य करीत आहेत. अडीच फुटापर्यंतच्या गणपती विसर्जनाची सोय येथे करण्यात आली आहे. गणपती विसर्जनानंतर पीओपीच्या मूर्ती काढून मनपाच्या माध्यमातून त्या मूर्तींची व्हिलेवाट लावण्यात येते.विसर्जनानंतर हा कृत्रिम तलाव बुजवून टाकण्यात येतो. तलावाच्या प्रदूषणाबाबत होत असलेली जनजागृती यामुळे भाविकांचा या कृत्रिम तलावाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या उपक्रमामुळे शहरातील ऐतिहासिक तलावाचे प्रदूषणपासून बचाव झाला असल्याचे सोले म्हणाले.