शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सोनेगाव तलाव १०० टक्के प्रदूषणमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:21 IST

गणपती विसर्जनामुळे तलाव मोठ्या प्रमाणात प्रदूषित होतात. तलाव प्रदूषित झाल्याने त्याचा परिणाम तलावातील जीवजंतूवर होतो, मासे मरतात, दुर्गंधी पसरते.

ठळक मुद्देविसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती : ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणपती विसर्जनामुळे तलाव मोठ्या प्रमाणात प्रदूषित होतात. तलाव प्रदूषित झाल्याने त्याचा परिणाम तलावातील जीवजंतूवर होतो, मासे मरतात, दुर्गंधी पसरते. तलावातील प्रदूषण काढण्यासाठी मनपाची मोठी यंत्रणा कामाला लागली. या सर्व गोष्टी थांबविण्यासाठी आणि भाविकांच्या श्रद्धेलाही तडा जाऊ न देता ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशन या संस्थेने सोनेगाव तलावावर कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे आणि तेही कायमची. त्यामुळे सोनेगाव तलाव १०० टक्के प्रदूषणमुक्त होईल, असा दावा संस्थेचे अध्यक्ष आमदार अनिल सोले यांनी केला. आमदार सोले यांच्या मार्गदर्शनात येथे मूर्ती विसर्जनाचे कार्य सुरू आहे.सोनेगाव तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी घालण्यात आल्याने तलावाच्या सभोवताल टिनाचे कुंपण घालण्यात आले आहे. हा ऐतिहासक तलाव आहे. विसर्जनामुळे हा तलाव प्रदूषित होऊ नये व भाविकांनाही गणपतीचे विसर्जन करताना पारंपरिक पद्धतीने विसर्जन झाले ही भावना व्हावी, या उद्देशाने कृत्रिम तलाव बांधण्यात आला. तलावाच्या काठावर असलेल्या ९० फूट लांब व ३० फूट रुंद आणि १५ फूट खोल असा खड्डा तयार करण्यात आला. या खड्ड्यात तलावातील पाणी साठविण्यात आले. त्याला एका छोट्या तलावाचे रूप देण्यात आले.विसर्जनासाठी कायमची सोय करण्यात आली. दीड दिवसाच्या गणपतीपासून येथे विसर्जनाला सुरुवात झाली आहे.रविवारपर्यंत येथे किमान ६,००० च्या जवळपास गणपतीचे विसर्जन झाले आहे. असे असतानाही या कृत्रिम तलावात निर्माल्याचा सडा पडलेला दिसत नाही. तलावाच्या बाजूला निर्माल्य क लश ठेवण्यात आले आहेत. संस्थेचे सदस्य निर्माल्य संकलनाचे कार्य करीत आहेत. अडीच फुटापर्यंतच्या गणपती विसर्जनाची सोय येथे करण्यात आली आहे. गणपती विसर्जनानंतर पीओपीच्या मूर्ती काढून मनपाच्या माध्यमातून त्या मूर्तींची व्हिलेवाट लावण्यात येते.विसर्जनानंतर हा कृत्रिम तलाव बुजवून टाकण्यात येतो. तलावाच्या प्रदूषणाबाबत होत असलेली जनजागृती यामुळे भाविकांचा या कृत्रिम तलावाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या उपक्रमामुळे शहरातील ऐतिहासिक तलावाचे प्रदूषणपासून बचाव झाला असल्याचे सोले म्हणाले.