शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

सोनेगाव तलाव १०० टक्के प्रदूषणमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:21 IST

गणपती विसर्जनामुळे तलाव मोठ्या प्रमाणात प्रदूषित होतात. तलाव प्रदूषित झाल्याने त्याचा परिणाम तलावातील जीवजंतूवर होतो, मासे मरतात, दुर्गंधी पसरते.

ठळक मुद्देविसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती : ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणपती विसर्जनामुळे तलाव मोठ्या प्रमाणात प्रदूषित होतात. तलाव प्रदूषित झाल्याने त्याचा परिणाम तलावातील जीवजंतूवर होतो, मासे मरतात, दुर्गंधी पसरते. तलावातील प्रदूषण काढण्यासाठी मनपाची मोठी यंत्रणा कामाला लागली. या सर्व गोष्टी थांबविण्यासाठी आणि भाविकांच्या श्रद्धेलाही तडा जाऊ न देता ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशन या संस्थेने सोनेगाव तलावावर कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे आणि तेही कायमची. त्यामुळे सोनेगाव तलाव १०० टक्के प्रदूषणमुक्त होईल, असा दावा संस्थेचे अध्यक्ष आमदार अनिल सोले यांनी केला. आमदार सोले यांच्या मार्गदर्शनात येथे मूर्ती विसर्जनाचे कार्य सुरू आहे.सोनेगाव तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी घालण्यात आल्याने तलावाच्या सभोवताल टिनाचे कुंपण घालण्यात आले आहे. हा ऐतिहासक तलाव आहे. विसर्जनामुळे हा तलाव प्रदूषित होऊ नये व भाविकांनाही गणपतीचे विसर्जन करताना पारंपरिक पद्धतीने विसर्जन झाले ही भावना व्हावी, या उद्देशाने कृत्रिम तलाव बांधण्यात आला. तलावाच्या काठावर असलेल्या ९० फूट लांब व ३० फूट रुंद आणि १५ फूट खोल असा खड्डा तयार करण्यात आला. या खड्ड्यात तलावातील पाणी साठविण्यात आले. त्याला एका छोट्या तलावाचे रूप देण्यात आले.विसर्जनासाठी कायमची सोय करण्यात आली. दीड दिवसाच्या गणपतीपासून येथे विसर्जनाला सुरुवात झाली आहे.रविवारपर्यंत येथे किमान ६,००० च्या जवळपास गणपतीचे विसर्जन झाले आहे. असे असतानाही या कृत्रिम तलावात निर्माल्याचा सडा पडलेला दिसत नाही. तलावाच्या बाजूला निर्माल्य क लश ठेवण्यात आले आहेत. संस्थेचे सदस्य निर्माल्य संकलनाचे कार्य करीत आहेत. अडीच फुटापर्यंतच्या गणपती विसर्जनाची सोय येथे करण्यात आली आहे. गणपती विसर्जनानंतर पीओपीच्या मूर्ती काढून मनपाच्या माध्यमातून त्या मूर्तींची व्हिलेवाट लावण्यात येते.विसर्जनानंतर हा कृत्रिम तलाव बुजवून टाकण्यात येतो. तलावाच्या प्रदूषणाबाबत होत असलेली जनजागृती यामुळे भाविकांचा या कृत्रिम तलावाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या उपक्रमामुळे शहरातील ऐतिहासिक तलावाचे प्रदूषणपासून बचाव झाला असल्याचे सोले म्हणाले.