शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील पांजरा नाक्यावरून सोडल्या १०० बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 02:19 IST

वर्धा रोडवरून कधी पायी आणि विविध वाहनांची मदत घेऊन नागपूरला येणाऱ्या परप्रांतीय विद्यार्थी व मजुरांसाठी एसटी महामंडळाने वेगवेगळ्या राज्याच्या सीमेवर सोडण्याची व्यवस्था पांजरा टोल नाक्यावर केली आहे. गुरुवारी महामंडळाने या नाक्यावरून १०० बसेस सोडल्या, ज्यातून जवळपास २००० लोकांना सोडण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा रोडवरून कधी पायी आणि विविध वाहनांची मदत घेऊन नागपूरला येणाऱ्या परप्रांतीय विद्यार्थी व मजुरांसाठी एसटी महामंडळाने वेगवेगळ्या राज्याच्या सीमेवर सोडण्याची व्यवस्था पांजरा टोल नाक्यावर केली आहे. गुरुवारी महामंडळाने या नाक्यावरून १०० बसेस सोडल्या, ज्यातून जवळपास २००० लोकांना सोडण्यात आले.लॉकडाऊन लागल्यापासून पुणे, मुंबईसह हैदराबाद व इतर राज्यात राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांनी पलायन सुरू केले. ट्रक, टेम्पो अशा मिळेल त्या वाहनाने तर कुणी पायीच आपल्या गावाकडे निघाले. प्रचंड हाल सहन करीत हे मजूर मार्गक्रमण करीत असून हे पलायन अद्याप थांबलेले नाही. अनेक मजूर वर्धा महामार्गावरून नागपूरकडे येत आहेत. या मजुरांच्या सुविधेसाठी अनेक संघटनांनी भोजनाची व्यवस्था केली आहे. पांजरा नाक्यावरही अशीच जेवण, पादत्राणे, मास्क आणि आवश्यक वस्तूंची व्यवस्था केली आहे. शिवाय या ठिकाणाहून पायी आलेल्या मजुरांना वेगवेगळ्या वाहनाने त्यांच्या राज्यपर्यंत पोहचविण्यासाठी स्वयंसेवी कार्यकर्त्यांची मदत होत आहे. दरम्यान शहरात अडकलेल्या या मजूर, विद्यार्थ्यांना त्यांच्या गावाकडे नेण्यासाठी एसटी महामंडळाने गणेशपेठ स्थानकावरून बसेस सुरू केल्या. पांजरा नाक्यावर मोठ्या प्रमाणात मजूर गोळा होत असल्याची बाब लक्षात घेत या ठिकाणाहून ११ मे पासून बसेस सुरू करण्यात आल्या.या प्रवाशांना मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार झारखंड या राज्याच्या सीमेवर सोडण्यात येत आहे. महामंडळाच्या महिला अधिकारी यांनी याबाबत माहिती दिली. गुरुवारी प्रति बस २५ ते ३० प्रवाशांना घेऊन जवळपास १०० बसेस सोडण्यात आल्या. जिल्हा प्रशासनातर्फे आरोग्य तपासणीची व्यवस्था या नाक्यावर केली आहे. दरम्यान बंगाल, हिमाचल, दिल्ली ते काश्मीर पर्यंतच्या प्रवाशांसाठी रेल्वेने गाड्या सुरू केल्या आहेत. या राज्यातील जमा झालेल्या प्रवाशांना सिटी बसमार्फत रेल्वे स्थानकावर सोडण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.गरोदर महिलेला रुग्णवाहिकेने पोहचविले

दरम्यान पांजरा नाक्यावर रुग्णवाहिका ठेवण्यात आलेली आहे. गुरुवारी पतीसह या नाक्यावर पोहचलेली पल्लवी बळीराम कांबळे या महिलेसाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. ही २० वर्षीय महिला ७ महिन्याची गरोदर असून पुण्यात कंपनीत काम करणाऱ्या पतीसह राहत होती. गुरुवारी ट्रकवर बसून हे दाम्पत्य सहकारी दाम्पत्यसह नागपूरला पोहचले होते. त्यांना गडचिरोलीला जायचे होते. तिची स्थिती लक्षात घेता सोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱयांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली.अनेक तासापासून ताटकळतदरम्यान मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या मजुरांना त्यांच्या सीमेपर्यंत पोहचण्याची व्यवस्था होत असली तरी त्यापुढे बिहार, बंगाल, राजस्थान, हिमाचल, उत्तराखंड या राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना अनेक तास ताटकळत राहावे लागत आहे. काही लोक मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत जात आहेत व पुढला प्रवास करीत आहेत. मात्र पुढच्या प्रवासाचा भरवसा नसल्याने अनेकजण थांबले आहेत.

टॅग्स :Migrationस्थलांतरणnagpurनागपूर