शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

नागपुरातील पांजरा नाक्यावरून सोडल्या १०० बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 02:19 IST

वर्धा रोडवरून कधी पायी आणि विविध वाहनांची मदत घेऊन नागपूरला येणाऱ्या परप्रांतीय विद्यार्थी व मजुरांसाठी एसटी महामंडळाने वेगवेगळ्या राज्याच्या सीमेवर सोडण्याची व्यवस्था पांजरा टोल नाक्यावर केली आहे. गुरुवारी महामंडळाने या नाक्यावरून १०० बसेस सोडल्या, ज्यातून जवळपास २००० लोकांना सोडण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा रोडवरून कधी पायी आणि विविध वाहनांची मदत घेऊन नागपूरला येणाऱ्या परप्रांतीय विद्यार्थी व मजुरांसाठी एसटी महामंडळाने वेगवेगळ्या राज्याच्या सीमेवर सोडण्याची व्यवस्था पांजरा टोल नाक्यावर केली आहे. गुरुवारी महामंडळाने या नाक्यावरून १०० बसेस सोडल्या, ज्यातून जवळपास २००० लोकांना सोडण्यात आले.लॉकडाऊन लागल्यापासून पुणे, मुंबईसह हैदराबाद व इतर राज्यात राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांनी पलायन सुरू केले. ट्रक, टेम्पो अशा मिळेल त्या वाहनाने तर कुणी पायीच आपल्या गावाकडे निघाले. प्रचंड हाल सहन करीत हे मजूर मार्गक्रमण करीत असून हे पलायन अद्याप थांबलेले नाही. अनेक मजूर वर्धा महामार्गावरून नागपूरकडे येत आहेत. या मजुरांच्या सुविधेसाठी अनेक संघटनांनी भोजनाची व्यवस्था केली आहे. पांजरा नाक्यावरही अशीच जेवण, पादत्राणे, मास्क आणि आवश्यक वस्तूंची व्यवस्था केली आहे. शिवाय या ठिकाणाहून पायी आलेल्या मजुरांना वेगवेगळ्या वाहनाने त्यांच्या राज्यपर्यंत पोहचविण्यासाठी स्वयंसेवी कार्यकर्त्यांची मदत होत आहे. दरम्यान शहरात अडकलेल्या या मजूर, विद्यार्थ्यांना त्यांच्या गावाकडे नेण्यासाठी एसटी महामंडळाने गणेशपेठ स्थानकावरून बसेस सुरू केल्या. पांजरा नाक्यावर मोठ्या प्रमाणात मजूर गोळा होत असल्याची बाब लक्षात घेत या ठिकाणाहून ११ मे पासून बसेस सुरू करण्यात आल्या.या प्रवाशांना मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार झारखंड या राज्याच्या सीमेवर सोडण्यात येत आहे. महामंडळाच्या महिला अधिकारी यांनी याबाबत माहिती दिली. गुरुवारी प्रति बस २५ ते ३० प्रवाशांना घेऊन जवळपास १०० बसेस सोडण्यात आल्या. जिल्हा प्रशासनातर्फे आरोग्य तपासणीची व्यवस्था या नाक्यावर केली आहे. दरम्यान बंगाल, हिमाचल, दिल्ली ते काश्मीर पर्यंतच्या प्रवाशांसाठी रेल्वेने गाड्या सुरू केल्या आहेत. या राज्यातील जमा झालेल्या प्रवाशांना सिटी बसमार्फत रेल्वे स्थानकावर सोडण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.गरोदर महिलेला रुग्णवाहिकेने पोहचविले

दरम्यान पांजरा नाक्यावर रुग्णवाहिका ठेवण्यात आलेली आहे. गुरुवारी पतीसह या नाक्यावर पोहचलेली पल्लवी बळीराम कांबळे या महिलेसाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. ही २० वर्षीय महिला ७ महिन्याची गरोदर असून पुण्यात कंपनीत काम करणाऱ्या पतीसह राहत होती. गुरुवारी ट्रकवर बसून हे दाम्पत्य सहकारी दाम्पत्यसह नागपूरला पोहचले होते. त्यांना गडचिरोलीला जायचे होते. तिची स्थिती लक्षात घेता सोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱयांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली.अनेक तासापासून ताटकळतदरम्यान मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या मजुरांना त्यांच्या सीमेपर्यंत पोहचण्याची व्यवस्था होत असली तरी त्यापुढे बिहार, बंगाल, राजस्थान, हिमाचल, उत्तराखंड या राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना अनेक तास ताटकळत राहावे लागत आहे. काही लोक मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत जात आहेत व पुढला प्रवास करीत आहेत. मात्र पुढच्या प्रवासाचा भरवसा नसल्याने अनेकजण थांबले आहेत.

टॅग्स :Migrationस्थलांतरणnagpurनागपूर