शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील पांजरा नाक्यावरून सोडल्या १०० बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 02:19 IST

वर्धा रोडवरून कधी पायी आणि विविध वाहनांची मदत घेऊन नागपूरला येणाऱ्या परप्रांतीय विद्यार्थी व मजुरांसाठी एसटी महामंडळाने वेगवेगळ्या राज्याच्या सीमेवर सोडण्याची व्यवस्था पांजरा टोल नाक्यावर केली आहे. गुरुवारी महामंडळाने या नाक्यावरून १०० बसेस सोडल्या, ज्यातून जवळपास २००० लोकांना सोडण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा रोडवरून कधी पायी आणि विविध वाहनांची मदत घेऊन नागपूरला येणाऱ्या परप्रांतीय विद्यार्थी व मजुरांसाठी एसटी महामंडळाने वेगवेगळ्या राज्याच्या सीमेवर सोडण्याची व्यवस्था पांजरा टोल नाक्यावर केली आहे. गुरुवारी महामंडळाने या नाक्यावरून १०० बसेस सोडल्या, ज्यातून जवळपास २००० लोकांना सोडण्यात आले.लॉकडाऊन लागल्यापासून पुणे, मुंबईसह हैदराबाद व इतर राज्यात राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांनी पलायन सुरू केले. ट्रक, टेम्पो अशा मिळेल त्या वाहनाने तर कुणी पायीच आपल्या गावाकडे निघाले. प्रचंड हाल सहन करीत हे मजूर मार्गक्रमण करीत असून हे पलायन अद्याप थांबलेले नाही. अनेक मजूर वर्धा महामार्गावरून नागपूरकडे येत आहेत. या मजुरांच्या सुविधेसाठी अनेक संघटनांनी भोजनाची व्यवस्था केली आहे. पांजरा नाक्यावरही अशीच जेवण, पादत्राणे, मास्क आणि आवश्यक वस्तूंची व्यवस्था केली आहे. शिवाय या ठिकाणाहून पायी आलेल्या मजुरांना वेगवेगळ्या वाहनाने त्यांच्या राज्यपर्यंत पोहचविण्यासाठी स्वयंसेवी कार्यकर्त्यांची मदत होत आहे. दरम्यान शहरात अडकलेल्या या मजूर, विद्यार्थ्यांना त्यांच्या गावाकडे नेण्यासाठी एसटी महामंडळाने गणेशपेठ स्थानकावरून बसेस सुरू केल्या. पांजरा नाक्यावर मोठ्या प्रमाणात मजूर गोळा होत असल्याची बाब लक्षात घेत या ठिकाणाहून ११ मे पासून बसेस सुरू करण्यात आल्या.या प्रवाशांना मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार झारखंड या राज्याच्या सीमेवर सोडण्यात येत आहे. महामंडळाच्या महिला अधिकारी यांनी याबाबत माहिती दिली. गुरुवारी प्रति बस २५ ते ३० प्रवाशांना घेऊन जवळपास १०० बसेस सोडण्यात आल्या. जिल्हा प्रशासनातर्फे आरोग्य तपासणीची व्यवस्था या नाक्यावर केली आहे. दरम्यान बंगाल, हिमाचल, दिल्ली ते काश्मीर पर्यंतच्या प्रवाशांसाठी रेल्वेने गाड्या सुरू केल्या आहेत. या राज्यातील जमा झालेल्या प्रवाशांना सिटी बसमार्फत रेल्वे स्थानकावर सोडण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.गरोदर महिलेला रुग्णवाहिकेने पोहचविले

दरम्यान पांजरा नाक्यावर रुग्णवाहिका ठेवण्यात आलेली आहे. गुरुवारी पतीसह या नाक्यावर पोहचलेली पल्लवी बळीराम कांबळे या महिलेसाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. ही २० वर्षीय महिला ७ महिन्याची गरोदर असून पुण्यात कंपनीत काम करणाऱ्या पतीसह राहत होती. गुरुवारी ट्रकवर बसून हे दाम्पत्य सहकारी दाम्पत्यसह नागपूरला पोहचले होते. त्यांना गडचिरोलीला जायचे होते. तिची स्थिती लक्षात घेता सोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱयांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली.अनेक तासापासून ताटकळतदरम्यान मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या मजुरांना त्यांच्या सीमेपर्यंत पोहचण्याची व्यवस्था होत असली तरी त्यापुढे बिहार, बंगाल, राजस्थान, हिमाचल, उत्तराखंड या राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना अनेक तास ताटकळत राहावे लागत आहे. काही लोक मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत जात आहेत व पुढला प्रवास करीत आहेत. मात्र पुढच्या प्रवासाचा भरवसा नसल्याने अनेकजण थांबले आहेत.

टॅग्स :Migrationस्थलांतरणnagpurनागपूर