शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी १० सूत्री उपाययोजना

By admin | Updated: June 15, 2016 03:11 IST

वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांवरील शिक्षणाचे ओझे दिवसेंदिवस वाढत आहे. जितकी मोठी शाळा तितके मोठे दप्तर असे समीकरण आजच्या काळात झाले असल्याचे दिसते.

सेवानिवृत्त प्राध्यापकांनी १७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सुचविले उपाय नागपूर : वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांवरील शिक्षणाचे ओझे दिवसेंदिवस वाढत आहे. जितकी मोठी शाळा तितके मोठे दप्तर असे समीकरण आजच्या काळात झाले असल्याचे दिसते. वयाला न पेलणाऱ्या वजनापेक्षाही दप्तर जड झाले आहे. दप्तराचे ओझे विद्यार्थ्यांसह येणाऱ्या काळात पालकांसाठीही संकट बनू पाहत आहे. विद्यार्थी शिक्षणासाठी शाळेत जातो की दप्तराचा भार वाहण्यासाठी हे कोडे सोडणविण्यासाठी एका शिक्षकाने पुढाकार घेतला आहे. प्राध्यपक म्हणून निवृत्त झालेल्या राजेंद्र दाणी यांनी अभ्यास करून पुस्तकांचे ओझे कसे कमी करता येतील याबाबत आपले निष्कर्ष नोंदविले आहे. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी दहा सूत्री उपाययोजना त्यांनी १७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सुचविल्या आहे. विद्यार्थ्यांच्या वजनाच्या तुलनेत केवळ दहा टक्के दप्तराचे ओझे असावे, असा शासनाचा नियम आहे. परंतु, आवश्यकतेपेक्षा जास्त पुस्तके विद्यार्थ्यांच्या दप्तरात असल्याचे दिसते. एनसीईआरटीने काढलेल्या परिपत्रकानुसार दुसऱ्यावर्गापर्यंत दप्तर घेऊन शाळेत येण्याची सक्ती नाही, तरी देखील पुस्तके, वह्या, डबा, वॉटरबॅग, ड्रॉईंग बुक घेऊन शाळेत मुलांना पाठविले जाते. विद्यार्थ्यांच्या दप्तरात पुस्तकांचे वाढते ओझे हा विषय खरच चिंतेचा झाला आहे. मात्र, या समस्येकडे ना शिक्षकांचे लक्ष आहे ना पालकांचे. विद्यार्थ्यांच्या पाठीवर असणाऱ्या या ओझ्याकडे पालक आणि शिक्षक दोघेही सर्रास दुर्लक्ष करीत आहेत. दप्तराच्या वाढत्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांचे शोषण होत असल्याचे दिसते आहे. दप्तराचे प्रचंड ओझे पाठीवर घेऊन घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास, करणे, तसेच शाळेच्या व घराच्याही पायऱ्या चढणे ही तारेवरच्या कसरत विद्यार्थी करीत आहेत. पुस्तकांचे ओझे कमी करण्याचा एकमेव उपाय म्हणजे अतिरिक्त विषय अभ्यासक्रमातून कमी करणे. ज्या विषयांचा आपल्याला व्यावहारिक जीवनात जास्त उपयोग होत नाही. अशा विषयांना अभ्याक्रमातून कमी करण्यात येणे गरजेचे असल्याचे दाणी यांचे मत आहे. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळेत लॉकर्स असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे ई-लर्निंगचा वापर करणे काळाची गरज आहे. (प्रतिनिधी)