शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

नागपूर, वर्धेतील साडेबारा हजार शेतकऱ्यांकडून १० कोटींचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:07 IST

नागपूर : महावितरणकडून शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानास नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून व्यापक प्रतिसाद मिळत ...

नागपूर : महावितरणकडून शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानास नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून व्यापक प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही जिल्ह्यातील १२ हजार ६४१ शेतकऱ्यांकडून आतापर्यंत सुमारे १० कोटी रुपयांचा भरणा केलेला आहे. उर्वरित थकबाकीदार शेतकऱ्यांनी पैसे भरावे यासाठी महावितरणतर्फे दोन्ही जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात संपर्क मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती महावितरणच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली आहे.

नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर तालुक्यातील सर्वाधिक ८१९ शेतकऱ्यांनी ६२ लाख २६ हजार रुपयांचा भरणा करून कृषिपंपाच्या वीज देयकाच्या थकबाकीतून मुक्तता करून घेतली आहे. सावनेरमधील ७९९ शेतकऱ्यांनी ४८ लाख २८ हजार, काटोल ६३४ शेतकऱ्यांनी १९ लाख ७ हजार, नरखेड ५६३ शेतकऱ्यांनी १९ लाख ७३ हजार, पारशिवनी २६८ शेतकऱ्यांनी २१ लाख १५ हजार रुपये, रामटेक २१७ शेतकऱ्यांनी १६ लाख २४ हजार, उमरेडमधील ५२५ शेतकऱ्यांनी ५६ लाख ९५ हजार, भिवापूर ५४६ शेतकऱ्यांनी ५९ लाख १९ हजार, हिंगणा २८९ शेतकऱ्यांनी ३० लाख ३७ हजार, कामठी २५२ शेतकऱ्यांनी ३४ लाख ६ हजाराचा भरणा केला आहे. कुही ४५१ शेतकऱ्यांनी ४८ लाख ९७ हजाराचा, मौदा ५६७ शेतकऱ्यांनी ४४ लाख ९ हजार, नागपूर ७० शेतकऱ्यांनी १ लाख ५५ हजार, नागपूर ग्रामीणमधील ४५६ शेतकऱ्यांनी ३६ लाख ६७ हजार रुपयांचा भरणा केला आहे.

वर्धा जिल्ह्यात वर्धा तालुक्यात १,६२० शेतकऱ्यांनी ४५ लाख ७९ लाख तर सेलू १२८७ शेतकऱ्यांनी ६३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. आर्वी ६५८ शेतकऱ्यांनी २३ लक्ष ९३ हजार, आष्टी ५८७ शेतकऱ्यांनी १४ लाख १८ हजार, देवळी ८२० शेतकऱ्यांनी ३१ लाख ८७, हिंगणघाट १९२ शेतकऱ्यांनी ९ लाख ४८ हजार, कारंजा ४१७ शेतकऱ्यांनी ११ लाख ७७ हजार, समुद्रपूर ९६ शेतकऱ्यांनी ७ लाख ४२ हजार रुपयांचा भरणा केला आहे.