शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

नागपूर, वर्धेतील साडेबारा हजार शेतकऱ्यांकडून १० कोटींचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:07 IST

नागपूर : महावितरणकडून शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानास नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून व्यापक प्रतिसाद मिळत ...

नागपूर : महावितरणकडून शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानास नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून व्यापक प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही जिल्ह्यातील १२ हजार ६४१ शेतकऱ्यांकडून आतापर्यंत सुमारे १० कोटी रुपयांचा भरणा केलेला आहे. उर्वरित थकबाकीदार शेतकऱ्यांनी पैसे भरावे यासाठी महावितरणतर्फे दोन्ही जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात संपर्क मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती महावितरणच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली आहे.

नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर तालुक्यातील सर्वाधिक ८१९ शेतकऱ्यांनी ६२ लाख २६ हजार रुपयांचा भरणा करून कृषिपंपाच्या वीज देयकाच्या थकबाकीतून मुक्तता करून घेतली आहे. सावनेरमधील ७९९ शेतकऱ्यांनी ४८ लाख २८ हजार, काटोल ६३४ शेतकऱ्यांनी १९ लाख ७ हजार, नरखेड ५६३ शेतकऱ्यांनी १९ लाख ७३ हजार, पारशिवनी २६८ शेतकऱ्यांनी २१ लाख १५ हजार रुपये, रामटेक २१७ शेतकऱ्यांनी १६ लाख २४ हजार, उमरेडमधील ५२५ शेतकऱ्यांनी ५६ लाख ९५ हजार, भिवापूर ५४६ शेतकऱ्यांनी ५९ लाख १९ हजार, हिंगणा २८९ शेतकऱ्यांनी ३० लाख ३७ हजार, कामठी २५२ शेतकऱ्यांनी ३४ लाख ६ हजाराचा भरणा केला आहे. कुही ४५१ शेतकऱ्यांनी ४८ लाख ९७ हजाराचा, मौदा ५६७ शेतकऱ्यांनी ४४ लाख ९ हजार, नागपूर ७० शेतकऱ्यांनी १ लाख ५५ हजार, नागपूर ग्रामीणमधील ४५६ शेतकऱ्यांनी ३६ लाख ६७ हजार रुपयांचा भरणा केला आहे.

वर्धा जिल्ह्यात वर्धा तालुक्यात १,६२० शेतकऱ्यांनी ४५ लाख ७९ लाख तर सेलू १२८७ शेतकऱ्यांनी ६३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. आर्वी ६५८ शेतकऱ्यांनी २३ लक्ष ९३ हजार, आष्टी ५८७ शेतकऱ्यांनी १४ लाख १८ हजार, देवळी ८२० शेतकऱ्यांनी ३१ लाख ८७, हिंगणघाट १९२ शेतकऱ्यांनी ९ लाख ४८ हजार, कारंजा ४१७ शेतकऱ्यांनी ११ लाख ७७ हजार, समुद्रपूर ९६ शेतकऱ्यांनी ७ लाख ४२ हजार रुपयांचा भरणा केला आहे.